शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
5
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
6
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
7
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
8
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
9
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
10
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
11
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
12
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
13
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
14
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
15
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
16
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
17
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
18
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
19
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
20
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार

देशातील स्वायत्त संस्थांचे अस्तित्व धोक्यात - डॉ. अमोल कोल्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:59 AM

परिवर्तनाच्या लढाईत या सरकारविरोधात मतदान करून देशाची लोकशाही वाचवा. तुमचे हे पवित्र कार्य राष्ट्रीय कर्तव्य समजून पार पाडा आणि आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांना विजयी करण्याचे आवाहन डॉ.अमोल कोल्हे यांनी केले.

पेण : आज देशात परिवर्तनाची लाट आली आहे. ती सरकारविरोधात आहे. या लाटेत तुम्ही सर्वांनी सहभागी होऊन या धर्मांध शक्तींविरोधात लढण्याची ताकद उभी करा. देशाच्या स्वायत्त संस्थांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. देश हुकूमशाहीकडे वाटचाल करतो आहे. संविधान वाचविण्याचा हक्क अधिकार तुम्हाला घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवून दिलेला आहे. तेव्हा या परिवर्तनाच्या लढाईत या सरकारविरोधात मतदान करून देशाची लोकशाही वाचवा. तुमचे हे पवित्र कार्य राष्ट्रीय कर्तव्य समजून पार पाडा आणि आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांना विजयी करण्याचे आवाहन डॉ.अमोल कोल्हे यांनी केले.पेण येथे सुनील तटकरे यांच्या प्रचाराची सभा पेण महात्मा गांधी मंदिराच्या समोरील प्रांगणात पार पडली. कोल्हे यांनी रोखठोक भाषणात मोदी सरकारचा चांगलाच समाचार घेताना २०१४ च्या निवडणुकीत जनतेला दिलेली आश्वासने गेली कुठे असा सवाल करीत मोदी सरकारचे वाभाडे काढले. शिवाजी महाराजांनी रयतेचे कल्याणकारी राज्य केले. आज देशात काय परिस्थिती दिसत आहे ते पाहा. रोजगाराच्या शोधात युवकांना भटकंती करावी लागत आहे. विकासाचे मुद्दे गायब झाले. आता भावनिक आवाहन करण्यात तुमचा दम निघत आहे. पण देशाची जनता सुज्ञ आहे. तिला सारे समजते आहे. दगड भिरकावणारा युवा रायगडच्या मातीत नाही तर तो दगड रचून इतिहास घडविणारा आहे. २०१९ मध्ये मोदी सरकार आले तर देशात पुन्हा निवडणूक होणार नाही. म्हणजे काय तर देशात हुकूमशाही पद्धतीने सरकार चालवण्याची यांची तयारी आहे. हे सर्व बदलण्यासाठी मतदारांमध्ये परिवर्तनाची लाट आली आहे. छपन्न इंचाच्या छातीची भाषा करणाऱ्यांचे दिवस आता संपले आहेत. नोटाबंदी, सर्जिकल स्ट्राइकसह या जवानांच्या बलिदानावर राजकारण चालत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांची ठेव आहे. तीच विचारधारा लढाई जिंकेल. आपण हे सत्य नाकारू शकत नाही.तेव्हा मायबाप जनता जनार्दनांनो सावधान. घटिका जवळ आली आहे. या सरकारला कायम हद्दपार करू या आणि आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांना विजयी करण्याचे आवाहन डॉ. कोल्हे यांनी केले.या वेळी आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे, शेकापचे राष्ट्रीय सरचिटणीस आ.जयंत पाटील, आ.धैर्यशील पाटील, बाळाजीशेठ म्हात्रे, संभाजी ब्रिगेडचे शैलेश चव्हाण, काँग्रेस पेण तालुका अध्यक्ष अशोक मोकल आदींसह शेकाप, काँगे्रस, राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगडsunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेस