शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

देशातील स्वायत्त संस्थांचे अस्तित्व धोक्यात - डॉ. अमोल कोल्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 01:00 IST

परिवर्तनाच्या लढाईत या सरकारविरोधात मतदान करून देशाची लोकशाही वाचवा. तुमचे हे पवित्र कार्य राष्ट्रीय कर्तव्य समजून पार पाडा आणि आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांना विजयी करण्याचे आवाहन डॉ.अमोल कोल्हे यांनी केले.

पेण : आज देशात परिवर्तनाची लाट आली आहे. ती सरकारविरोधात आहे. या लाटेत तुम्ही सर्वांनी सहभागी होऊन या धर्मांध शक्तींविरोधात लढण्याची ताकद उभी करा. देशाच्या स्वायत्त संस्थांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. देश हुकूमशाहीकडे वाटचाल करतो आहे. संविधान वाचविण्याचा हक्क अधिकार तुम्हाला घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवून दिलेला आहे. तेव्हा या परिवर्तनाच्या लढाईत या सरकारविरोधात मतदान करून देशाची लोकशाही वाचवा. तुमचे हे पवित्र कार्य राष्ट्रीय कर्तव्य समजून पार पाडा आणि आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांना विजयी करण्याचे आवाहन डॉ.अमोल कोल्हे यांनी केले.पेण येथे सुनील तटकरे यांच्या प्रचाराची सभा पेण महात्मा गांधी मंदिराच्या समोरील प्रांगणात पार पडली. कोल्हे यांनी रोखठोक भाषणात मोदी सरकारचा चांगलाच समाचार घेताना २०१४ च्या निवडणुकीत जनतेला दिलेली आश्वासने गेली कुठे असा सवाल करीत मोदी सरकारचे वाभाडे काढले. शिवाजी महाराजांनी रयतेचे कल्याणकारी राज्य केले. आज देशात काय परिस्थिती दिसत आहे ते पाहा. रोजगाराच्या शोधात युवकांना भटकंती करावी लागत आहे. विकासाचे मुद्दे गायब झाले. आता भावनिक आवाहन करण्यात तुमचा दम निघत आहे. पण देशाची जनता सुज्ञ आहे. तिला सारे समजते आहे. दगड भिरकावणारा युवा रायगडच्या मातीत नाही तर तो दगड रचून इतिहास घडविणारा आहे. २०१९ मध्ये मोदी सरकार आले तर देशात पुन्हा निवडणूक होणार नाही. म्हणजे काय तर देशात हुकूमशाही पद्धतीने सरकार चालवण्याची यांची तयारी आहे. हे सर्व बदलण्यासाठी मतदारांमध्ये परिवर्तनाची लाट आली आहे. छपन्न इंचाच्या छातीची भाषा करणाऱ्यांचे दिवस आता संपले आहेत. नोटाबंदी, सर्जिकल स्ट्राइकसह या जवानांच्या बलिदानावर राजकारण चालत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांची ठेव आहे. तीच विचारधारा लढाई जिंकेल. आपण हे सत्य नाकारू शकत नाही.तेव्हा मायबाप जनता जनार्दनांनो सावधान. घटिका जवळ आली आहे. या सरकारला कायम हद्दपार करू या आणि आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांना विजयी करण्याचे आवाहन डॉ. कोल्हे यांनी केले.या वेळी आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे, शेकापचे राष्ट्रीय सरचिटणीस आ.जयंत पाटील, आ.धैर्यशील पाटील, बाळाजीशेठ म्हात्रे, संभाजी ब्रिगेडचे शैलेश चव्हाण, काँग्रेस पेण तालुका अध्यक्ष अशोक मोकल आदींसह शेकाप, काँगे्रस, राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगडsunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेस