शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

देशातील स्वायत्त संस्थांचे अस्तित्व धोक्यात - डॉ. अमोल कोल्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 01:00 IST

परिवर्तनाच्या लढाईत या सरकारविरोधात मतदान करून देशाची लोकशाही वाचवा. तुमचे हे पवित्र कार्य राष्ट्रीय कर्तव्य समजून पार पाडा आणि आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांना विजयी करण्याचे आवाहन डॉ.अमोल कोल्हे यांनी केले.

पेण : आज देशात परिवर्तनाची लाट आली आहे. ती सरकारविरोधात आहे. या लाटेत तुम्ही सर्वांनी सहभागी होऊन या धर्मांध शक्तींविरोधात लढण्याची ताकद उभी करा. देशाच्या स्वायत्त संस्थांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. देश हुकूमशाहीकडे वाटचाल करतो आहे. संविधान वाचविण्याचा हक्क अधिकार तुम्हाला घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवून दिलेला आहे. तेव्हा या परिवर्तनाच्या लढाईत या सरकारविरोधात मतदान करून देशाची लोकशाही वाचवा. तुमचे हे पवित्र कार्य राष्ट्रीय कर्तव्य समजून पार पाडा आणि आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांना विजयी करण्याचे आवाहन डॉ.अमोल कोल्हे यांनी केले.पेण येथे सुनील तटकरे यांच्या प्रचाराची सभा पेण महात्मा गांधी मंदिराच्या समोरील प्रांगणात पार पडली. कोल्हे यांनी रोखठोक भाषणात मोदी सरकारचा चांगलाच समाचार घेताना २०१४ च्या निवडणुकीत जनतेला दिलेली आश्वासने गेली कुठे असा सवाल करीत मोदी सरकारचे वाभाडे काढले. शिवाजी महाराजांनी रयतेचे कल्याणकारी राज्य केले. आज देशात काय परिस्थिती दिसत आहे ते पाहा. रोजगाराच्या शोधात युवकांना भटकंती करावी लागत आहे. विकासाचे मुद्दे गायब झाले. आता भावनिक आवाहन करण्यात तुमचा दम निघत आहे. पण देशाची जनता सुज्ञ आहे. तिला सारे समजते आहे. दगड भिरकावणारा युवा रायगडच्या मातीत नाही तर तो दगड रचून इतिहास घडविणारा आहे. २०१९ मध्ये मोदी सरकार आले तर देशात पुन्हा निवडणूक होणार नाही. म्हणजे काय तर देशात हुकूमशाही पद्धतीने सरकार चालवण्याची यांची तयारी आहे. हे सर्व बदलण्यासाठी मतदारांमध्ये परिवर्तनाची लाट आली आहे. छपन्न इंचाच्या छातीची भाषा करणाऱ्यांचे दिवस आता संपले आहेत. नोटाबंदी, सर्जिकल स्ट्राइकसह या जवानांच्या बलिदानावर राजकारण चालत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांची ठेव आहे. तीच विचारधारा लढाई जिंकेल. आपण हे सत्य नाकारू शकत नाही.तेव्हा मायबाप जनता जनार्दनांनो सावधान. घटिका जवळ आली आहे. या सरकारला कायम हद्दपार करू या आणि आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांना विजयी करण्याचे आवाहन डॉ. कोल्हे यांनी केले.या वेळी आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे, शेकापचे राष्ट्रीय सरचिटणीस आ.जयंत पाटील, आ.धैर्यशील पाटील, बाळाजीशेठ म्हात्रे, संभाजी ब्रिगेडचे शैलेश चव्हाण, काँग्रेस पेण तालुका अध्यक्ष अशोक मोकल आदींसह शेकाप, काँगे्रस, राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगडsunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेस