शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ शेतक-यांना नुकसानभरपाई नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:11 IST

खारभूमी विकास खात्याच्या पेण तालुक्यातील जुई-अब्बास खारभूमी योजनेमधील खारढोंबी व खारमाचेला गावाजवळील समुद्र भरती संरक्षक बंधारे (बाहेरकाठे) फुटून दहा गावांतील सुमारे २३०० एकर भातशेतीमध्ये

अलिबाग : खारभूमी विकास खात्याच्या पेण तालुक्यातील जुई-अब्बास खारभूमी योजनेमधील खारढोंबी व खारमाचेला गावाजवळील समुद्र भरती संरक्षक बंधारे (बाहेरकाठे) फुटून दहा गावांतील सुमारे २३०० एकर भातशेतीमध्ये घुसून १३०० शेतकरी कुटुंबांच्या नव्या भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले. गुरुवारी समोर आलेल्या आपत्तीपूर्वी गेल्या मे २०१७ मध्ये देखील सलगच्या उधाणाने जुई अब्बास गावच्या किनाºयावरील समुद्र भरती संरक्षक बंधारा (बाहेरकाठा)फु टून त्या वेळी १८०० एकर भातशेती जमिनीत खारे पाणी घुसून ९५० शेतकºयांना फटका बसला होता. त्या वेळी शासनाकडून नुकसानीचे पंचनामेच करण्यात आले नसल्याने शेतकºयांना नुकसानभरपाई मिळण्याची संधीच राहिली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली.या नुकसानीबाबत शेतकºयांना नुकसानभरपाई मिळावी याकरिता २३ मे २०१७ रोजी पेण उप विभागीय महसूल अधिकारी कार्यालयासमोर शेतकºयांनी उपोषण आंदोलन केल्याची माहिती खार डोंगर मेहनत आघाडीचे प्रमुख पांडुरंग तुरे यांनी दिली. या उपोषण आंदोलनावर तोडगा काढण्याकरिता पेण उप विभागीय महसूल अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी शेतकरी, जेएसडब्ल्यू कंपनीचे अधिकारी, कृषी अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावली होती. मे २०१७ मधील या उधाणाच्या वेळी रायगड जिल्ह्यात ७/१२ उताºयांचे आॅनलाइन संगणकीयकरणाचे काम सुरू असल्याने त्या वेळी नुकसानीचे पंचनामे करता येणार नाहीत. खारे पाणी शेतीत घुसून नापीक झालेल्या जमिनींची स्थळपाहणी आणि पंचनामे करण्याचे काम ३१ जुलै २०१७ नंतर करण्याचे तसेच जुई अब्बास येथे फुटलेल्या संरक्षक बंधाºयाची दुरुस्ती जेएसडब्ल्यू इस्पात कंपनीने करुन देण्याचे लेखी आदेश २४ मे २०१७ रोजीच्या पत्रान्वये दिले. परंतु ३१ जुलै २०१७ नंतर आजतागायत नुकसानी पंचनामे झाले नाहीत आणि फुटलेल्या जुई अब्बास संरक्षक बंधाºयाची दुरुस्ती देखील झाली नसल्याचे तुरे व अन्य शेतकºयांनी सांगितले.जेएसडब्ल्यू बंदर हे या गावांच्या किनारी भागात नाही तर ते खालच्या बाजूला आहे. संरक्षक बंधारा फुटून शेतामध्ये पाणी घुसण्याच्या या प्रकारास जेएसडब्ल्यू कंपनी कोणत्याही प्रकारे जबाबदार नाही. तरी सुद्धा सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून तसेच खारलॅन्ड विभागाकडे निधी उपलब्ध नसल्याने, ६० लाख रुपये खर्च करुन फुटलेल्या बंधाºयाच्या दुरुस्तीचे काम करुन देण्याची तयारी कंपनीने दाखविली होती. परंतु खारमाचेला येथील ग्रामस्थांनी हे काम करु दिले नाही, अशी परिस्थिती असल्याची माहिती जेएसडब्ल्यू कंपनीचे उप महाव्यवस्थापक अरुण शिर्के यांनी दिली.यापूर्वी २ कोटी ५० लाख रुपये खर्च करुन कंपनीने वावे, वडखळ, मसद या गावचे समुद्र संरक्षक बंधारे बांधून दिले आहेत. ग्रामस्थांनी सहकार्य केल्यास कंपनी फुटलेले बंधारे बांधून देण्यास आजही तयार असल्याचे शिर्के यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी