शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

इर्शाळवाडीत दुर्घटनेचा तिसरा दिवस, बचावकार्य सुरु; अजूनही १०७ लोक अडकल्याची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 10:58 IST

इर्शाळवाडी येथील घटनेला आज तीन दिवस झाले. आजही सकाळपासून शोध मोहिमेला सुरुवात झालेली आहे.

खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावातील ४६ घरांपैकी सतरा ते अठरा घरांवर दरड कोसळल्याची घटना २० जुलै रोजी घडली. या वाडीत २३१ नागरिक होते. दुर्घटनेत आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. ६७ नागरिकांना निवारा केंद्रात ठेवले असून, १०७ जण अजूनही बेपत्ता असल्यचं सांगण्यात येतंय. ८ जखमींवर एमजीएम व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

इर्शाळवाडी येथील घटनेला आज तीन दिवस झाले. आजही सकाळपासून शोध मोहिमेला सुरुवात झालेली आहे. प्रशासनाकडून दिवस-रात्र घटनास्थळी काम सुरु आहे. NDRF ची टीम अजूनही ढिगाऱ्याखालील मृतदेह काढण्यात व्यस्त आहे. मुसळधार पावसामुळे यात अडथळे येत आहेत. या गावाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत होतं. गावात जाण्यासाठी रस्ता नाही, वीज देखील नाही, सौरऊर्जेच्या अपुऱ्या प्रकाशात गावाला दिवस काढावे लागत होते. प्राथमिक शिक्षणाचीही सोय नसल्यामुळे पहिलीपासून मुलांना आश्रमशाळेत टाकले जात होते.

पावसाच्याआधी इर्शाळवाडी गाव खाली असलेल्या नम्राचीवाडी या गावात स्थलांतरित झाले होते. मात्र तिथे वनविभागाने त्यांच्यावर कारवाई केली. ती घरे तोडण्यात आली. एकदा नव्हे, तर दोनदा-तीनदा वन विभागाचे आदिवाशींनी बांदलेल्या झोपड्या तोडल्या. त्यामुळे हे गावकरी पुन्हा इर्शाळवाडीमध्ये राहण्यासाठी आले आणि ही घटना घडली. पावसाळा संपेपर्यंत वन जमिनीवर या रहिवाश्यांना राहू दिले अशते, तर आज अनेकांचे प्राण वाचले असते, असे बोलले जात आहे. 

औषध फवारणी

इर्शाळवाडीची दुर्घटना होऊन ३० तासांहून अधिक कालावधी लोटल्याने शुक्रवारी परिसरात दुर्गंधी सुटली. सध्या शोधमोहीम सुरू असल्याने हजारो जण याठिकाणी मदतकार्य करीत आहेत. दुर्गंधीमुळे रोगराई पसरू नये, यासाठी परिसरात आरोग्य विभागातर्फे औषध फवारणी करण्यात आली आहे.

अशी असेल व्यवस्था

मुंबई-पुणे जुन्या महामार्गालगत असलेल्या जागेत ३२ कंटेनर घरांची वसाहत उभारली गेली आहे. वीज आणि पाण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. कंटेनरमध्ये घरात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू, कपडे, गृहोपयोगी वस्तूंसह सोयीयुक्त साहित्य भरून दिले जाणार आहे. तसेच २० शौचालय, २० स्वच्छतागृह सुविधाही उपलब्ध केली आहे. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि शालोपयोगी वस्तूंचा खर्च प्रशासनातर्फे केला जाणार आहे.

अधिकारी सतर्क असल्याने, यंत्रणा वेळेवर घटनास्थळी

हवामान विभागाने जिल्ह्याला मंगळवार, बुधवार दोन दिवस रेड अलर्ट जाहीर केला होता. कोणतीही नैसर्गिक आपत्ती ओढवली तर अधिकारी सतर्क असावेत, यासाठी बुधवारी सर्व अधिकाऱ्यांनी जागे राहण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. अधिकारी जागे राहावेत म्हणून रात्री अकरा आणि एक वाजता व्हीसी ठेवण्यात आली होती. त्यामुळे सर्व अधिकारी सतर्क होते. इर्शाळवाडी येथे दुर्घटना घडल्याचे कळल्यानंतर खालापूर प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.

टॅग्स :Raigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार