शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पथदिवे बंद असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 02:05 IST

पोशीरमध्ये पथदिवे बसवून अवघे एक वर्ष झाले आहे.

- कांता हाबळे नेरळ : पोशीरमध्ये पथदिवे बसवून अवघे एक वर्ष झाले आहे. मात्र, गेल्या महिन्याभरापासून दिवे बंद आहेत, त्यामुळे परिसरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. शिवाय, काही समाजकंटक रात्रीच्या वेळी घरांवर दगडफेक करीत असल्याचेही समोर येत आहे.पोशीर ग्रामपंचायतीने ७३ हजार २२० इतक्या रकमेचे १३५ दिवे खरेदी केले होते. तसेच ते पोलवर बसवण्याकरिता प्रतिदिवा प्रतिपोल १०० रु पये मजुरी याप्रमाणे १३,००० इतका खर्च करून पोशीरमध्ये सर्व प्रभागांत पथदिवे बसविले होते. या पथदिव्यांना दोन वर्षांची वॉरंटीही देण्यात आलेली होती; परंतु हे पथदिवे बसविल्यानंतर महिन्याभरातच बंद पडले. याबाबत ग्रामस्थांनी ग्रामसभेत बंद दिव्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. त्यावर सदर बंद दिवे रिप्लेस करून विद्युत पथदिवे पूर्ववत करण्यात येतील, असा शब्द सरपंच हरिश्चंद्र निरगुडा यांनी ग्रामसभेला दिला होता. त्यानंतर नऊ महिन्यांचा कालावधी लोटला तरी पोशीरमधील पथदिव्यांची स्थिती जैसे थे च आहे. रस्त्यावरील दिवे बंद असल्याने रात्री पोशीरमधील रस्त्यांवर अंधारच अंधार असतो. देवपाड्यातही तीच परिस्थितीआहे.पोशीर गावात काही ठिकाणी गेले काही दिवस आकस्मिक दगडफेकीच्या घटना सातत्याने घडत आहेत. गणेशोत्सवाला अवघा एक महिना उरलेला असताना गावातील रस्त्यांवर अंधार असल्याने हीच स्थिती गणेशोत्सवात राहिली तर गावकऱ्यांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागणार हे निश्चित. पोशीरमधील ग्रामस्थांनी पथदिवे बदलण्याची मागणी केली आहे. मात्र, दहा दिवस झाले तरी अद्याप पथदिवे पूर्ववत करून न बसविल्याने हे दिवे बसविण्यासाठी ग्रामपंचायत अद्याप मुहूर्त शोधत आहे का? असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.पोशीर ग्रामपंचायतीतील मनमानी कारभार अनेकदा चव्हाट्यावर आलेला असताना नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे देखील ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. त्यातच पोशीरमधील या बत्तीगुल प्रकरणामुळे गावात संतापाचे वातावरण पसरले आहे.>पोशीरमधील पथदिव्यांमध्ये पाणी जात असल्याने पथदिवे बंद पडले आहेत, ते बदली करण्यासाठी दिले आहेत. दोन दिवसांत दिवे मिळाल्यानंतर पोलवर बसवण्यात येतील.- हरिश्चंद्र निरगुडा, सरपंच, ग्रा. प. पोशीर>दिवाबत्ती ही मूलभूत सुविधादेखील धड पुरवली जात नाही, त्याकरिता वारंवार आठवण करून द्यावी लागते हे दुर्दैव आहे. दिवे रिप्लेस करण्यासाठी एक वर्ष लागते ही हास्यास्पद बाब आहे.- प्रवीण शिंगटे, ग्रामस्थ, पोशीरपोशीर ग्रामपंचायतीचा कारभार संवेदनाशून्य आहे, त्यामुळेच पोशीरमध्ये अशा घटना घडत आहेत. या कालावधीत काही अपघात अथवा अनुचित प्रकार घडल्यास त्यास ग्रामपंचायत जबाबदार असेल.- मनेष राणे, माजी सदस्य, पोशीर