शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

पथदिवे बंद असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 02:05 IST

पोशीरमध्ये पथदिवे बसवून अवघे एक वर्ष झाले आहे.

- कांता हाबळे नेरळ : पोशीरमध्ये पथदिवे बसवून अवघे एक वर्ष झाले आहे. मात्र, गेल्या महिन्याभरापासून दिवे बंद आहेत, त्यामुळे परिसरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. शिवाय, काही समाजकंटक रात्रीच्या वेळी घरांवर दगडफेक करीत असल्याचेही समोर येत आहे.पोशीर ग्रामपंचायतीने ७३ हजार २२० इतक्या रकमेचे १३५ दिवे खरेदी केले होते. तसेच ते पोलवर बसवण्याकरिता प्रतिदिवा प्रतिपोल १०० रु पये मजुरी याप्रमाणे १३,००० इतका खर्च करून पोशीरमध्ये सर्व प्रभागांत पथदिवे बसविले होते. या पथदिव्यांना दोन वर्षांची वॉरंटीही देण्यात आलेली होती; परंतु हे पथदिवे बसविल्यानंतर महिन्याभरातच बंद पडले. याबाबत ग्रामस्थांनी ग्रामसभेत बंद दिव्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. त्यावर सदर बंद दिवे रिप्लेस करून विद्युत पथदिवे पूर्ववत करण्यात येतील, असा शब्द सरपंच हरिश्चंद्र निरगुडा यांनी ग्रामसभेला दिला होता. त्यानंतर नऊ महिन्यांचा कालावधी लोटला तरी पोशीरमधील पथदिव्यांची स्थिती जैसे थे च आहे. रस्त्यावरील दिवे बंद असल्याने रात्री पोशीरमधील रस्त्यांवर अंधारच अंधार असतो. देवपाड्यातही तीच परिस्थितीआहे.पोशीर गावात काही ठिकाणी गेले काही दिवस आकस्मिक दगडफेकीच्या घटना सातत्याने घडत आहेत. गणेशोत्सवाला अवघा एक महिना उरलेला असताना गावातील रस्त्यांवर अंधार असल्याने हीच स्थिती गणेशोत्सवात राहिली तर गावकऱ्यांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागणार हे निश्चित. पोशीरमधील ग्रामस्थांनी पथदिवे बदलण्याची मागणी केली आहे. मात्र, दहा दिवस झाले तरी अद्याप पथदिवे पूर्ववत करून न बसविल्याने हे दिवे बसविण्यासाठी ग्रामपंचायत अद्याप मुहूर्त शोधत आहे का? असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.पोशीर ग्रामपंचायतीतील मनमानी कारभार अनेकदा चव्हाट्यावर आलेला असताना नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे देखील ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. त्यातच पोशीरमधील या बत्तीगुल प्रकरणामुळे गावात संतापाचे वातावरण पसरले आहे.>पोशीरमधील पथदिव्यांमध्ये पाणी जात असल्याने पथदिवे बंद पडले आहेत, ते बदली करण्यासाठी दिले आहेत. दोन दिवसांत दिवे मिळाल्यानंतर पोलवर बसवण्यात येतील.- हरिश्चंद्र निरगुडा, सरपंच, ग्रा. प. पोशीर>दिवाबत्ती ही मूलभूत सुविधादेखील धड पुरवली जात नाही, त्याकरिता वारंवार आठवण करून द्यावी लागते हे दुर्दैव आहे. दिवे रिप्लेस करण्यासाठी एक वर्ष लागते ही हास्यास्पद बाब आहे.- प्रवीण शिंगटे, ग्रामस्थ, पोशीरपोशीर ग्रामपंचायतीचा कारभार संवेदनाशून्य आहे, त्यामुळेच पोशीरमध्ये अशा घटना घडत आहेत. या कालावधीत काही अपघात अथवा अनुचित प्रकार घडल्यास त्यास ग्रामपंचायत जबाबदार असेल.- मनेष राणे, माजी सदस्य, पोशीर