शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
3
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
4
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
5
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
6
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
7
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
8
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
9
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
10
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
11
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
12
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
13
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
14
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
15
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
16
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
17
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
18
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
19
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
20
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?

पथदिवे बंद असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 02:05 IST

पोशीरमध्ये पथदिवे बसवून अवघे एक वर्ष झाले आहे.

- कांता हाबळे नेरळ : पोशीरमध्ये पथदिवे बसवून अवघे एक वर्ष झाले आहे. मात्र, गेल्या महिन्याभरापासून दिवे बंद आहेत, त्यामुळे परिसरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. शिवाय, काही समाजकंटक रात्रीच्या वेळी घरांवर दगडफेक करीत असल्याचेही समोर येत आहे.पोशीर ग्रामपंचायतीने ७३ हजार २२० इतक्या रकमेचे १३५ दिवे खरेदी केले होते. तसेच ते पोलवर बसवण्याकरिता प्रतिदिवा प्रतिपोल १०० रु पये मजुरी याप्रमाणे १३,००० इतका खर्च करून पोशीरमध्ये सर्व प्रभागांत पथदिवे बसविले होते. या पथदिव्यांना दोन वर्षांची वॉरंटीही देण्यात आलेली होती; परंतु हे पथदिवे बसविल्यानंतर महिन्याभरातच बंद पडले. याबाबत ग्रामस्थांनी ग्रामसभेत बंद दिव्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. त्यावर सदर बंद दिवे रिप्लेस करून विद्युत पथदिवे पूर्ववत करण्यात येतील, असा शब्द सरपंच हरिश्चंद्र निरगुडा यांनी ग्रामसभेला दिला होता. त्यानंतर नऊ महिन्यांचा कालावधी लोटला तरी पोशीरमधील पथदिव्यांची स्थिती जैसे थे च आहे. रस्त्यावरील दिवे बंद असल्याने रात्री पोशीरमधील रस्त्यांवर अंधारच अंधार असतो. देवपाड्यातही तीच परिस्थितीआहे.पोशीर गावात काही ठिकाणी गेले काही दिवस आकस्मिक दगडफेकीच्या घटना सातत्याने घडत आहेत. गणेशोत्सवाला अवघा एक महिना उरलेला असताना गावातील रस्त्यांवर अंधार असल्याने हीच स्थिती गणेशोत्सवात राहिली तर गावकऱ्यांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागणार हे निश्चित. पोशीरमधील ग्रामस्थांनी पथदिवे बदलण्याची मागणी केली आहे. मात्र, दहा दिवस झाले तरी अद्याप पथदिवे पूर्ववत करून न बसविल्याने हे दिवे बसविण्यासाठी ग्रामपंचायत अद्याप मुहूर्त शोधत आहे का? असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.पोशीर ग्रामपंचायतीतील मनमानी कारभार अनेकदा चव्हाट्यावर आलेला असताना नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे देखील ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. त्यातच पोशीरमधील या बत्तीगुल प्रकरणामुळे गावात संतापाचे वातावरण पसरले आहे.>पोशीरमधील पथदिव्यांमध्ये पाणी जात असल्याने पथदिवे बंद पडले आहेत, ते बदली करण्यासाठी दिले आहेत. दोन दिवसांत दिवे मिळाल्यानंतर पोलवर बसवण्यात येतील.- हरिश्चंद्र निरगुडा, सरपंच, ग्रा. प. पोशीर>दिवाबत्ती ही मूलभूत सुविधादेखील धड पुरवली जात नाही, त्याकरिता वारंवार आठवण करून द्यावी लागते हे दुर्दैव आहे. दिवे रिप्लेस करण्यासाठी एक वर्ष लागते ही हास्यास्पद बाब आहे.- प्रवीण शिंगटे, ग्रामस्थ, पोशीरपोशीर ग्रामपंचायतीचा कारभार संवेदनाशून्य आहे, त्यामुळेच पोशीरमध्ये अशा घटना घडत आहेत. या कालावधीत काही अपघात अथवा अनुचित प्रकार घडल्यास त्यास ग्रामपंचायत जबाबदार असेल.- मनेष राणे, माजी सदस्य, पोशीर