शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

...तर ढाकमधील मतदार बहिष्कार टाकतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 00:17 IST

कर्जत विधानसभा मतदारसंघात दुर्गम भागात असलेले ढाक येथील मतदान केंद्र निवडणूक यंत्रणेने दुर्गम भागातून हलवून खाली पायथ्याशी आणले आहे.

कर्जत : १८९ कर्जत विधानसभा मतदारसंघात असलेले ढाक हे दुर्गम भागातील मतदान केंद्र हलविण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या गावाचे अस्तित्व हरवून जाईल, अशी भीती व्यक्त होत आहे. मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी न ठेवल्यास ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.कर्जत विधानसभा मतदारसंघात दुर्गम भागात असलेले ढाक येथील मतदान केंद्र निवडणूक यंत्रणेने दुर्गम भागातून हलवून खाली पायथ्याशी आणले आहे. त्यांच्या ग्रामपंचायतीमधील वदप येथील संजयनगरमध्ये असलेल्या अंगणवाडी केंद्रात नवीन १५६ क्रमांकाचे मतदान केंद्र सुरू होणार आहे. मात्र, निवडणूक यंत्रणेच्या या नवीन बदलाबद्दल आक्षेप ढाक ग्रामस्थांनी घेतला आहे. त्याबाबत ७ आॅक्टोबर रोजी ढाक ग्रामस्थांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, कर्जत तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याकडे आपली फिर्याद मांडली. त्या वेळी ढाक ग्रामस्थ निवृत्ती ढाकवळ, मोहन ठाकरे, मनोज ढाकवळ, दामू ढाकवळ, बळीराम ठाकरे, गोविंद ढाकवळ, पप्पू ठाकरे, राजू ठाकरे आदीसह तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी या सर्व ग्रामस्थांनी आपल्या गावाचे अस्तित्व हरवून जाऊ शकते. आमचे गाव महसुली गाव असूनदेखील त्या ठिकाणी मतदानकेंद्र नसल्याने हा आमच्यावर अन्याय आहे, अशा तक्रारी केल्या.सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम देशमुख यांनी दुर्गम भागातील मतदानकेंद्र आणि इमारतीत पहिल्या मजल्यावरील मतदानकेंद्रे ही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाने हालविण्यात येत आहेत. आपल्या मतदारसंघात विधानसभा निवडणूक होत असलेल्या ठिकाणी जी मतदानकेंद्र इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर असतील तर ती तळमजल्यावर घ्यावीत आणि दुर्गम भागातील मतदानकेंद्रदेखील मतदारांना सोयीचे होईल, अशा ठिकाणी घेण्याचे आदेश होते. त्यानुसार कर्जत विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदारसंघातील खोपोली शहरातील विहारी भागातील तीन आणि वरची खोपोली एक असे चार मतदानकेंद्र हे पहिल्या मजल्यावरून तळमजल्यावर आणले आहे. तर कर्जत तालुक्यात चार मतदानकेंद्र ही दुर्गम भागात असून त्यातील १५६ ढाक हे मतदानकेंद्र खाली पायथ्याशी आणण्याचा निर्णय घेतला आहे.एकू ण१८३ मतदारवदप येथील संजयनगरभागात असलेल्या अंगणवाडी केंद्रात ढाक येथील १८३ मतदार असून निवडणूक यंत्रणेचा हा निर्णय मान्य नसल्याने ग्रामस्थांनी २१ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :karjat-acकर्जतMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019