शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
4
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
5
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
6
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
7
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
8
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
9
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
10
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
11
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
12
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
13
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
14
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
15
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
16
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
17
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
18
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
19
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
20
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले

रायगड, महाड अन् दुर्घटना; रायगडवासीयांची जखम जुनी, घाव नवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 10:06 IST

खालापूरजवळील इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर दासगाव, सावित्री पुलाच्या कटू आठवणी पुन्हा जाग्या

माधवी यादव-पाटील

नवी मुंबई : पावसाचे तांडव, काळीज चिरणाऱ्या दुर्घटना अन् मृतदेहांचे ढिगारे हे अलीकडे रायगड आणि पावसाळ्याचे जणू नवे समीकरणच तयार झाले आहे. दासगाव, सावित्री पूल, तळीये, तारिक गार्डन या जुन्या जखमा अद्याप भरून निघालेल्या नसतानाच बुधवारी, १९ जुलैला पुन्हा एकदा खालापूरजवळील कर्जत तालुक्यात इर्शाळवाडीवर दरड कोसळून अनेक जण ढिगाऱ्याखाली सापडले. रात्रीच्या अंधारात दरडीखाली संपूर्ण गाव गाडले गेले. काही कळण्याआधीच अनेकांना मृत्यूने गाठले.

महाड तालुक्यात २८ वर्षांपूर्वी पारमाची गावात दरड कोसळली होती. त्यानंतर महाड तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागात राहणाऱ्या गावात दरडी कोसळण्याचे सत्र सुरू झाले ते आजअखेर कायम आहे.

 महाड तालुक्याला २००५ ला महापुराने वेढा घातला होता. २६ जुलै २००५ ला तालुक्यातील दासगाव, जुई, कोंडीवते व रोहन या गावात दरडी कोसळल्या होत्या. यामध्ये १९४ जणांचा मृत्यू झाला होता, तर शेकडो बेघर झाले होते. यावेळी एकट्या दासगाव भोईवाड्यात अचानक दरड कोसळली. या दरडीखाली ३८ घरे भुईसपाट झाली. यात ४८ जण मृत्युमुखी पडले. तालुक्यातील सह्याद्री वाडी, हिरकणी वाडी, पारमाची, माझेरी या गावांतून जमिनीला भेगा पडल्या.

 सावित्री आणि काळ नदी २ ऑगस्ट २०१६ या अमावास्येच्या रात्री जणू काळाचे रूप घेऊन धोक्याच्या पातळीबाहेर वाहत होत्या. रात्री साडेअकराला पाण्याचा प्रचंड लोंढा आला आणि पाहता पाहता सावित्री नदीवरील जुना पूल भुईसपाट झाला. मुंबई-गोवा महामार्गावर सावित्री नदीवरील  ब्रिटिशकालीन पूल कोसळून पुलासोबत अनेक जण वाहून गेले. क्षणात अनेकांचे संसारही उद्ध्वस्त झाले. या दुर्घटनेत जयगड-मुंबई आणि राजापूर-बोरिवली या दोन एसटी बस, एक तवेरा या गाड्यांसह ४० जणांना सावित्रीने आपल्या पोटात घेतले.

 २४ ऑगस्ट २०२० ला सायंकाळी ६.३० च्या दरम्यान महाडमधील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात १६ जण मृत्युमुखी पडले, तर नऊ जण जखमी झाले. महाडमधील काजळपुरा परिसरातील ही इमारत आहे. या इमारतीत ४७ फ्लॅट होते, तर इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ७० ते ८० रहिवासी अडकले होते. 

 पोलादपूर तालुक्यातील गोवेले ग्रामपंचायत हद्दीमधील सुतारवाडी येथे २२ जुलै २०२१ ला रात्री दहाच्या सुमारास मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन कोसळलेल्या दरडीखाली सुमारे १६ घरे भुईसपाट झाली. आणखी काही घरे दरडीसोबत उतारावर वाहून गेली. यात सहा जणांचा मृत्यू झाला, तर १३ जण जखमी झाले होते, केवनाळे येथे सहा जणांचा मृत्यू, आठ जखमी झाले. रायगड जिल्ह्यात २२ जुलै २०२१ ला धो धो पाऊस आणि नद्यांना आलेल्या महापुरातून स्वतःचा जीव वाचवणारा प्रत्येक जण उघड्या डोळ्याने घराचे होणारे नुकसान पाहत असताना दुपारी चारच्या सुमारास महाड तालुक्यातील एका गावावर दरड कोसळली अन् तळीये हे डोंगराखाली गडप झाले. तब्बल ८७ लोकांचा जीव गेला.  

टॅग्स :RaigadरायगडRaigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरणmahad-acमहाड