शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

रायगड, महाड अन् दुर्घटना; रायगडवासीयांची जखम जुनी, घाव नवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 10:06 IST

खालापूरजवळील इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर दासगाव, सावित्री पुलाच्या कटू आठवणी पुन्हा जाग्या

माधवी यादव-पाटील

नवी मुंबई : पावसाचे तांडव, काळीज चिरणाऱ्या दुर्घटना अन् मृतदेहांचे ढिगारे हे अलीकडे रायगड आणि पावसाळ्याचे जणू नवे समीकरणच तयार झाले आहे. दासगाव, सावित्री पूल, तळीये, तारिक गार्डन या जुन्या जखमा अद्याप भरून निघालेल्या नसतानाच बुधवारी, १९ जुलैला पुन्हा एकदा खालापूरजवळील कर्जत तालुक्यात इर्शाळवाडीवर दरड कोसळून अनेक जण ढिगाऱ्याखाली सापडले. रात्रीच्या अंधारात दरडीखाली संपूर्ण गाव गाडले गेले. काही कळण्याआधीच अनेकांना मृत्यूने गाठले.

महाड तालुक्यात २८ वर्षांपूर्वी पारमाची गावात दरड कोसळली होती. त्यानंतर महाड तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागात राहणाऱ्या गावात दरडी कोसळण्याचे सत्र सुरू झाले ते आजअखेर कायम आहे.

 महाड तालुक्याला २००५ ला महापुराने वेढा घातला होता. २६ जुलै २००५ ला तालुक्यातील दासगाव, जुई, कोंडीवते व रोहन या गावात दरडी कोसळल्या होत्या. यामध्ये १९४ जणांचा मृत्यू झाला होता, तर शेकडो बेघर झाले होते. यावेळी एकट्या दासगाव भोईवाड्यात अचानक दरड कोसळली. या दरडीखाली ३८ घरे भुईसपाट झाली. यात ४८ जण मृत्युमुखी पडले. तालुक्यातील सह्याद्री वाडी, हिरकणी वाडी, पारमाची, माझेरी या गावांतून जमिनीला भेगा पडल्या.

 सावित्री आणि काळ नदी २ ऑगस्ट २०१६ या अमावास्येच्या रात्री जणू काळाचे रूप घेऊन धोक्याच्या पातळीबाहेर वाहत होत्या. रात्री साडेअकराला पाण्याचा प्रचंड लोंढा आला आणि पाहता पाहता सावित्री नदीवरील जुना पूल भुईसपाट झाला. मुंबई-गोवा महामार्गावर सावित्री नदीवरील  ब्रिटिशकालीन पूल कोसळून पुलासोबत अनेक जण वाहून गेले. क्षणात अनेकांचे संसारही उद्ध्वस्त झाले. या दुर्घटनेत जयगड-मुंबई आणि राजापूर-बोरिवली या दोन एसटी बस, एक तवेरा या गाड्यांसह ४० जणांना सावित्रीने आपल्या पोटात घेतले.

 २४ ऑगस्ट २०२० ला सायंकाळी ६.३० च्या दरम्यान महाडमधील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात १६ जण मृत्युमुखी पडले, तर नऊ जण जखमी झाले. महाडमधील काजळपुरा परिसरातील ही इमारत आहे. या इमारतीत ४७ फ्लॅट होते, तर इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ७० ते ८० रहिवासी अडकले होते. 

 पोलादपूर तालुक्यातील गोवेले ग्रामपंचायत हद्दीमधील सुतारवाडी येथे २२ जुलै २०२१ ला रात्री दहाच्या सुमारास मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन कोसळलेल्या दरडीखाली सुमारे १६ घरे भुईसपाट झाली. आणखी काही घरे दरडीसोबत उतारावर वाहून गेली. यात सहा जणांचा मृत्यू झाला, तर १३ जण जखमी झाले होते, केवनाळे येथे सहा जणांचा मृत्यू, आठ जखमी झाले. रायगड जिल्ह्यात २२ जुलै २०२१ ला धो धो पाऊस आणि नद्यांना आलेल्या महापुरातून स्वतःचा जीव वाचवणारा प्रत्येक जण उघड्या डोळ्याने घराचे होणारे नुकसान पाहत असताना दुपारी चारच्या सुमारास महाड तालुक्यातील एका गावावर दरड कोसळली अन् तळीये हे डोंगराखाली गडप झाले. तब्बल ८७ लोकांचा जीव गेला.  

टॅग्स :RaigadरायगडRaigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरणmahad-acमहाड