शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

मुंबई-गोवा महामार्ग वर्षभरात पूर्ण करणार, नितीन गडकरींनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 09:47 IST

Mumbai-Goa highway: म्हसळा-दिघी-पोर्ट राष्ट्रीय महामार्ग, इंदापूर तळा आगरदांडा महामार्ग, पुणे-रायगड जिल्हा सीमा ते माणगाव राष्ट्रीय महामार्ग, कासू ते इंदापूर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन रस्ते वाहतूक आणि महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते इंदापूर येथे झाले.

माणगाव : म्हसळा-दिघी-पोर्ट राष्ट्रीय महामार्ग, इंदापूर तळा आगरदांडा महामार्ग, पुणे-रायगड जिल्हा सीमा ते माणगाव राष्ट्रीय महामार्ग, कासू ते इंदापूर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन रस्ते वाहतूक आणि महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते इंदापूर येथे झाले. यावेळी मुंबई-गोवा महामार्ग येत्या वर्षभरात पूर्ण करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. कोकणातील १८ सागरी महामार्ग बांधून पूर्ण केले आहेत. आदिती तटकरे यांनी मागणी केलेल्या सागरी महामार्गाचा भारतमाला २ मध्ये समावेश करून पूर्ण करू. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत. त्यांच्या गडकिल्ल्यांच्या बाबतीतील सर्व प्रस्ताव मंजूर केले आहेत. सरकारी जमीन वापरून ट्रक टर्मिनल्स उभारण्यात येतील. पुणे ते जेएनपीटी रेल्वे नेण्याची गरज आहे. कोळी बांधवांसाठी १०० नॉटिकल आत जाणारे तंत्रज्ञान विकसित केलेले आहे. ते कोकणातील कोळी बांधवांना दिल्यास ब्लू इकॉनॉमिकमुळे कोकणात समृद्धता येणार आहे. कोकणाच्या विकासात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देणार नसून मुंबई-गोवा महामार्गासाठी १८ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येत असल्याचे आश्वासनही गडकरी यांनी दिले आहे.या सोहळ्याला पालकमंत्री आदिती तटकरे, खा. सुनील तटकरे, आ. अनिकेत तटकरे, आ. भरत गोगावले, आ. रवींद्र पाटील, आ. रवींद्र चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय मुख्य अभियंता तथा क्षेत्रीय अधिकारी राजीव सिंह, राज्य महामार्गाचे मुख्य अभियंता संतोष शेलार, राष्ट्रीय महामार्गाच्या अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड उपस्थित होते. गडकरी नव्हे हे तर रोडकरी - तटकरेनितीन गडकरी म्हणजे दिल्लीतील महाराष्ट्राचा अभिमान आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे गडकरी यांच्यामुळेच पूर्णत्वास गेला.  अनेक रस्त्यांना गडकरींच्या माध्यमातून महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. एवढेच नाही तर निधीही उपलब्ध करून कामे पूर्ण केली आहेत. यामुळे गडकरींची  ओळख गडकरी म्हणून नव्हे तर रोडकरी म्हणून देखील निर्माण झाली आहे, अशा शब्दात खासदार सुनील तटकरे यांनी कौतुक केले.

‘महामार्गाचे काम १२ वर्षे रखडले याचे दु:ख’ पनवेल : मुंबई-गोवा महामार्ग ही कोकणची लाइफलाइन आहे. २०१० पासून सुरू झालेले काम २०२२ म्हणजेच १२ वर्षांतही पूर्ण झाले नसल्याचे दुःख असल्याची कबुली केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी दिली.२९३५ कोटी किमतीच्या ४५ किमी लांबीच्या जेएनपीटी बंदर  जोडरस्ता प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा तसेच १२०० कोटींच्या ५.८८८ किमी लांबीच्या कळंबोली जंक्शन व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पूर्वेकडील प्रवेशद्वाराचा भूमिपूजन सोहळा पनवेलमध्ये पार पडला, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गडकरी बोलत होते.  नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला वाॅटर टॅक्सीने जोडण्याचा मानस आहे. याकरिता पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पुढाकार घ्यावा. एकत्रित चर्चा करून यामधून नक्कीच जलमार्गाला चालना देणारा पर्याय उभा करू, असेही गडकरी यांनी सांगितले.कोकणातील जागा संपादित करणे हे जगाच्या पातळीवर सर्वात अवघड काम असल्याचे गडकरी यांनी आपल्या मिश्कील शैलीत सांगितले. एका जमिनीत अनेकांचे वाद उद्भवतात. विशेष म्हणजे या वादावरून राजकारण्यांचे शिष्टमंडळ आमच्याकडे येतात असे म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीhighwayमहामार्गkonkanकोकण