शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

मुंबई-गोवा महामार्ग वर्षभरात पूर्ण करणार, नितीन गडकरींनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 09:47 IST

Mumbai-Goa highway: म्हसळा-दिघी-पोर्ट राष्ट्रीय महामार्ग, इंदापूर तळा आगरदांडा महामार्ग, पुणे-रायगड जिल्हा सीमा ते माणगाव राष्ट्रीय महामार्ग, कासू ते इंदापूर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन रस्ते वाहतूक आणि महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते इंदापूर येथे झाले.

माणगाव : म्हसळा-दिघी-पोर्ट राष्ट्रीय महामार्ग, इंदापूर तळा आगरदांडा महामार्ग, पुणे-रायगड जिल्हा सीमा ते माणगाव राष्ट्रीय महामार्ग, कासू ते इंदापूर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन रस्ते वाहतूक आणि महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते इंदापूर येथे झाले. यावेळी मुंबई-गोवा महामार्ग येत्या वर्षभरात पूर्ण करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. कोकणातील १८ सागरी महामार्ग बांधून पूर्ण केले आहेत. आदिती तटकरे यांनी मागणी केलेल्या सागरी महामार्गाचा भारतमाला २ मध्ये समावेश करून पूर्ण करू. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत. त्यांच्या गडकिल्ल्यांच्या बाबतीतील सर्व प्रस्ताव मंजूर केले आहेत. सरकारी जमीन वापरून ट्रक टर्मिनल्स उभारण्यात येतील. पुणे ते जेएनपीटी रेल्वे नेण्याची गरज आहे. कोळी बांधवांसाठी १०० नॉटिकल आत जाणारे तंत्रज्ञान विकसित केलेले आहे. ते कोकणातील कोळी बांधवांना दिल्यास ब्लू इकॉनॉमिकमुळे कोकणात समृद्धता येणार आहे. कोकणाच्या विकासात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देणार नसून मुंबई-गोवा महामार्गासाठी १८ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येत असल्याचे आश्वासनही गडकरी यांनी दिले आहे.या सोहळ्याला पालकमंत्री आदिती तटकरे, खा. सुनील तटकरे, आ. अनिकेत तटकरे, आ. भरत गोगावले, आ. रवींद्र पाटील, आ. रवींद्र चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय मुख्य अभियंता तथा क्षेत्रीय अधिकारी राजीव सिंह, राज्य महामार्गाचे मुख्य अभियंता संतोष शेलार, राष्ट्रीय महामार्गाच्या अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड उपस्थित होते. गडकरी नव्हे हे तर रोडकरी - तटकरेनितीन गडकरी म्हणजे दिल्लीतील महाराष्ट्राचा अभिमान आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे गडकरी यांच्यामुळेच पूर्णत्वास गेला.  अनेक रस्त्यांना गडकरींच्या माध्यमातून महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. एवढेच नाही तर निधीही उपलब्ध करून कामे पूर्ण केली आहेत. यामुळे गडकरींची  ओळख गडकरी म्हणून नव्हे तर रोडकरी म्हणून देखील निर्माण झाली आहे, अशा शब्दात खासदार सुनील तटकरे यांनी कौतुक केले.

‘महामार्गाचे काम १२ वर्षे रखडले याचे दु:ख’ पनवेल : मुंबई-गोवा महामार्ग ही कोकणची लाइफलाइन आहे. २०१० पासून सुरू झालेले काम २०२२ म्हणजेच १२ वर्षांतही पूर्ण झाले नसल्याचे दुःख असल्याची कबुली केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी दिली.२९३५ कोटी किमतीच्या ४५ किमी लांबीच्या जेएनपीटी बंदर  जोडरस्ता प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा तसेच १२०० कोटींच्या ५.८८८ किमी लांबीच्या कळंबोली जंक्शन व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पूर्वेकडील प्रवेशद्वाराचा भूमिपूजन सोहळा पनवेलमध्ये पार पडला, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गडकरी बोलत होते.  नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला वाॅटर टॅक्सीने जोडण्याचा मानस आहे. याकरिता पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पुढाकार घ्यावा. एकत्रित चर्चा करून यामधून नक्कीच जलमार्गाला चालना देणारा पर्याय उभा करू, असेही गडकरी यांनी सांगितले.कोकणातील जागा संपादित करणे हे जगाच्या पातळीवर सर्वात अवघड काम असल्याचे गडकरी यांनी आपल्या मिश्कील शैलीत सांगितले. एका जमिनीत अनेकांचे वाद उद्भवतात. विशेष म्हणजे या वादावरून राजकारण्यांचे शिष्टमंडळ आमच्याकडे येतात असे म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीhighwayमहामार्गkonkanकोकण