शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

मुंबई-गोवा महामार्ग वर्षभरात पूर्ण करणार, नितीन गडकरींनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 09:47 IST

Mumbai-Goa highway: म्हसळा-दिघी-पोर्ट राष्ट्रीय महामार्ग, इंदापूर तळा आगरदांडा महामार्ग, पुणे-रायगड जिल्हा सीमा ते माणगाव राष्ट्रीय महामार्ग, कासू ते इंदापूर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन रस्ते वाहतूक आणि महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते इंदापूर येथे झाले.

माणगाव : म्हसळा-दिघी-पोर्ट राष्ट्रीय महामार्ग, इंदापूर तळा आगरदांडा महामार्ग, पुणे-रायगड जिल्हा सीमा ते माणगाव राष्ट्रीय महामार्ग, कासू ते इंदापूर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन रस्ते वाहतूक आणि महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते इंदापूर येथे झाले. यावेळी मुंबई-गोवा महामार्ग येत्या वर्षभरात पूर्ण करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. कोकणातील १८ सागरी महामार्ग बांधून पूर्ण केले आहेत. आदिती तटकरे यांनी मागणी केलेल्या सागरी महामार्गाचा भारतमाला २ मध्ये समावेश करून पूर्ण करू. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत. त्यांच्या गडकिल्ल्यांच्या बाबतीतील सर्व प्रस्ताव मंजूर केले आहेत. सरकारी जमीन वापरून ट्रक टर्मिनल्स उभारण्यात येतील. पुणे ते जेएनपीटी रेल्वे नेण्याची गरज आहे. कोळी बांधवांसाठी १०० नॉटिकल आत जाणारे तंत्रज्ञान विकसित केलेले आहे. ते कोकणातील कोळी बांधवांना दिल्यास ब्लू इकॉनॉमिकमुळे कोकणात समृद्धता येणार आहे. कोकणाच्या विकासात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देणार नसून मुंबई-गोवा महामार्गासाठी १८ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येत असल्याचे आश्वासनही गडकरी यांनी दिले आहे.या सोहळ्याला पालकमंत्री आदिती तटकरे, खा. सुनील तटकरे, आ. अनिकेत तटकरे, आ. भरत गोगावले, आ. रवींद्र पाटील, आ. रवींद्र चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय मुख्य अभियंता तथा क्षेत्रीय अधिकारी राजीव सिंह, राज्य महामार्गाचे मुख्य अभियंता संतोष शेलार, राष्ट्रीय महामार्गाच्या अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड उपस्थित होते. गडकरी नव्हे हे तर रोडकरी - तटकरेनितीन गडकरी म्हणजे दिल्लीतील महाराष्ट्राचा अभिमान आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे गडकरी यांच्यामुळेच पूर्णत्वास गेला.  अनेक रस्त्यांना गडकरींच्या माध्यमातून महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. एवढेच नाही तर निधीही उपलब्ध करून कामे पूर्ण केली आहेत. यामुळे गडकरींची  ओळख गडकरी म्हणून नव्हे तर रोडकरी म्हणून देखील निर्माण झाली आहे, अशा शब्दात खासदार सुनील तटकरे यांनी कौतुक केले.

‘महामार्गाचे काम १२ वर्षे रखडले याचे दु:ख’ पनवेल : मुंबई-गोवा महामार्ग ही कोकणची लाइफलाइन आहे. २०१० पासून सुरू झालेले काम २०२२ म्हणजेच १२ वर्षांतही पूर्ण झाले नसल्याचे दुःख असल्याची कबुली केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी दिली.२९३५ कोटी किमतीच्या ४५ किमी लांबीच्या जेएनपीटी बंदर  जोडरस्ता प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा तसेच १२०० कोटींच्या ५.८८८ किमी लांबीच्या कळंबोली जंक्शन व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पूर्वेकडील प्रवेशद्वाराचा भूमिपूजन सोहळा पनवेलमध्ये पार पडला, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गडकरी बोलत होते.  नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला वाॅटर टॅक्सीने जोडण्याचा मानस आहे. याकरिता पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पुढाकार घ्यावा. एकत्रित चर्चा करून यामधून नक्कीच जलमार्गाला चालना देणारा पर्याय उभा करू, असेही गडकरी यांनी सांगितले.कोकणातील जागा संपादित करणे हे जगाच्या पातळीवर सर्वात अवघड काम असल्याचे गडकरी यांनी आपल्या मिश्कील शैलीत सांगितले. एका जमिनीत अनेकांचे वाद उद्भवतात. विशेष म्हणजे या वादावरून राजकारण्यांचे शिष्टमंडळ आमच्याकडे येतात असे म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीhighwayमहामार्गkonkanकोकण