शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

पावसाने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू; मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 23:59 IST

भाताचे नुकसान : विजांच्या कडकडाटासह पाऊस

दासगाव : यंदा परतीच्या पावसाने गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण कोकणाला विजेच्या कडकडाटासह झोडपून काढले आहे. या पावसामुळे भातशेतीचे मोठ्या  प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, चार दिवस कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्याप्रमाणे गेल्या दोन दिवसांपासून कोकणात विजेच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. महाड तालुक्यातदेखील पावसाचा मोठ्या प्रमाणात जोर असून, गेले तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका शेतकऱ्यांना बसला आहे. 

दासगाव येथील रमेश भिकू राणे या एकाच शेतकऱ्याची जवळपास तीन एकर जमिनीमधील भातशेती जमीनदोस्त झाली असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अशा प्रकारे महाड तालुक्यात अनेक शेतकरी आहेत की ज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांचे पोटच यावर अवलंबून आहे, त्या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने लवकरच नुकसानीचे पंचनामे करून मदत जाहीर करण्याची गरज निर्माण झाली आहे.

माझ्या तीन एकर शेतीमध्ये भातलागवड केलेली आहे. दरवर्षी या शेतीमधून दहा खंडी भातपीक निघते. माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच भातपिकावर अवलंबून आहे. परतीच्या पावसामुळे संपूर्ण शेती जमीनदोस्त झाली आहे. माझे जवळपास दोन लाखांचे नुकसान झाले आहे. माझ्या कुटुंबावर उपासमारीची पाळी येऊ नये यासाठी शासनाकडून पंचनामे करून मदत मिळावी, अशी अपेक्षा आहे. - रमेश भिकू राणे, शेतकरी दासगाव.

रायगडमधील शेतकरी चिंतातुर

पश्चिम बंगालच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सुरू झालेल्या अतिवृष्टीने रायगडातील शेतीला फटका बसला आहे. पावसाने बहरलेली उभी भातपिके कोलमडून पडली असून, हाताशी आलेले पीक पडल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. दरम्यान, हवामान खात्याने १७ ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने शेतकरी अधिक चिंताग्रस्त झाला आहे. या वर्षी जिल्ह्यात १ लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी भातशेती लावली आहे. जिल्ह्यात पडलेल्या पावसाने भातशेती चांगलीच बहरली होती. त्यामुळे शेतकऱ्याला चांगले पीक येऊन हाताशी पैसेही मिळणार होते. मात्र अवेळी पडत असलेल्या पावसाने भातशेतीचे अतोनात नुकसान होत आहे. त्यातच वादळामुळे सुरू झालेल्या अतिवृष्टीने भातशेतीचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात भातशेती चांगलीच बहरली असताना काही भागात कापणीही सुरू झाली आहे. त्यामुळे कापलेल्या भाताचे भारे शेतकऱ्यांनी बांधून ठेवले आहेत. तर काही शेतकरी दसऱ्यानंतर भातकापणीला सुरुवात करतात. मात्र, पावसाने कापलेली भातपिके भिजली असून उभे असलेले पीकही पडले आहे. त्यामुळे भातपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच १७ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी