शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू; मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 23:59 IST

भाताचे नुकसान : विजांच्या कडकडाटासह पाऊस

दासगाव : यंदा परतीच्या पावसाने गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण कोकणाला विजेच्या कडकडाटासह झोडपून काढले आहे. या पावसामुळे भातशेतीचे मोठ्या  प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, चार दिवस कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्याप्रमाणे गेल्या दोन दिवसांपासून कोकणात विजेच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. महाड तालुक्यातदेखील पावसाचा मोठ्या प्रमाणात जोर असून, गेले तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका शेतकऱ्यांना बसला आहे. 

दासगाव येथील रमेश भिकू राणे या एकाच शेतकऱ्याची जवळपास तीन एकर जमिनीमधील भातशेती जमीनदोस्त झाली असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अशा प्रकारे महाड तालुक्यात अनेक शेतकरी आहेत की ज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांचे पोटच यावर अवलंबून आहे, त्या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने लवकरच नुकसानीचे पंचनामे करून मदत जाहीर करण्याची गरज निर्माण झाली आहे.

माझ्या तीन एकर शेतीमध्ये भातलागवड केलेली आहे. दरवर्षी या शेतीमधून दहा खंडी भातपीक निघते. माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच भातपिकावर अवलंबून आहे. परतीच्या पावसामुळे संपूर्ण शेती जमीनदोस्त झाली आहे. माझे जवळपास दोन लाखांचे नुकसान झाले आहे. माझ्या कुटुंबावर उपासमारीची पाळी येऊ नये यासाठी शासनाकडून पंचनामे करून मदत मिळावी, अशी अपेक्षा आहे. - रमेश भिकू राणे, शेतकरी दासगाव.

रायगडमधील शेतकरी चिंतातुर

पश्चिम बंगालच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सुरू झालेल्या अतिवृष्टीने रायगडातील शेतीला फटका बसला आहे. पावसाने बहरलेली उभी भातपिके कोलमडून पडली असून, हाताशी आलेले पीक पडल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. दरम्यान, हवामान खात्याने १७ ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने शेतकरी अधिक चिंताग्रस्त झाला आहे. या वर्षी जिल्ह्यात १ लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी भातशेती लावली आहे. जिल्ह्यात पडलेल्या पावसाने भातशेती चांगलीच बहरली होती. त्यामुळे शेतकऱ्याला चांगले पीक येऊन हाताशी पैसेही मिळणार होते. मात्र अवेळी पडत असलेल्या पावसाने भातशेतीचे अतोनात नुकसान होत आहे. त्यातच वादळामुळे सुरू झालेल्या अतिवृष्टीने भातशेतीचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात भातशेती चांगलीच बहरली असताना काही भागात कापणीही सुरू झाली आहे. त्यामुळे कापलेल्या भाताचे भारे शेतकऱ्यांनी बांधून ठेवले आहेत. तर काही शेतकरी दसऱ्यानंतर भातकापणीला सुरुवात करतात. मात्र, पावसाने कापलेली भातपिके भिजली असून उभे असलेले पीकही पडले आहे. त्यामुळे भातपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच १७ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी