शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

Taliye Village: 'महाराष्ट्र दिनी' मिळणार तळीयेवासियांना नवी घरं; आणखी ६ महिने प्रतिक्षा करावी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 09:57 IST

तळीये गावात दरड कोसळल्यामुळे बेघर झालेल्या गावकऱ्यांचे 1 मे रोजी पुनवर्सन होणार असून, त्याच दिवशी येथील नागरिकांना घराच्या चाव्या देणार असल्याची माहिती शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे

मुंबई : वादळामुळे झालेल्या अतिवृष्टीत रायगड जिल्ह्यातील तळीये  गावातील 32 घरे दरडीखाली गाडली गेली होती. या गावाचे पुनर्वसन म्हाडाकडून करण्यात येणार आहे असं सरकार प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. घरच दरडीखाली गेल्यामुळे या गावातील लोक हे तात्पुरत्या निवार्‍या खाली आजूबाजूला राहात होती. त्यामुळे या गावातील लोकांचे पुनर्वसन प्रशासन कधी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आता लवकरच या गावातील लोकांचे पुनवर्सन होणार आहे. 

कधी होणार घरं ?

तळीये गावात दरड कोसळल्यामुळे बेघर झालेल्या गावकऱ्यांचे 1 मे रोजी पुनवर्सन होणार असून, त्याच दिवशी येथील नागरिकांना घराच्या चाव्या देणार असल्याची माहिती शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पालकमंत्री, आमदार, तळीये गावचे सरपंच-उपसरपंच तसेच म्हाडाचे अधिकारी यांची बैठक झाली असून, 1 मे रोजी घराच्या चाव्या देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे. 

कशाप्रकारे  घरं बांधणार ?

पाऊस गेला की आम्ही जिथे घर बांधली जाणार आहेत तिथे सपाटीकरण करणार आहोत. एवढेच नाही तर तीन गुंठे जागेत 600 स्केअर फुटाचे घर आम्ही देत असल्याचे गोगावले यांनी सांगितले. तसेच गावात केलेल्या पंचनाम्यानुसार योग्य त्या सोयीसुविधा देखील करण्यात येणार आहेत. अनेक वर्ष टिकतील अशी घरं प्रशासनाकडून तळीये गावकऱ्यांना मिळणार आहेत.

तसेच तळीये गावाचा पुनर्विकास करताना गावात अंगणवाडी, शाळा आणि आरोग्याची सुविधा म्हणून हॉस्पिटल ही बांधले जाणार आहे. सध्या तळीये गावाच्या पुनर्विकासातील घरं गुजरातच्या भूज येथील सिटेक कंपनीमध्ये तयार केली जात आहेत. काही दिवसात ही घरं मुंबईत आणली जाणार आहेत. नव्या तंत्रज्ञानाची ही घरे असणार आहेत. ज्या प्रकारे कोकणात वातावरण आहे. त्या सर्व वातावरणात ही घर टिकतील अशा स्वरूपाचे घर बनवण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :landslidesभूस्खलनJitendra Awhadजितेंद्र आव्हाड