शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

Taliye Village: 'महाराष्ट्र दिनी' मिळणार तळीयेवासियांना नवी घरं; आणखी ६ महिने प्रतिक्षा करावी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 09:57 IST

तळीये गावात दरड कोसळल्यामुळे बेघर झालेल्या गावकऱ्यांचे 1 मे रोजी पुनवर्सन होणार असून, त्याच दिवशी येथील नागरिकांना घराच्या चाव्या देणार असल्याची माहिती शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे

मुंबई : वादळामुळे झालेल्या अतिवृष्टीत रायगड जिल्ह्यातील तळीये  गावातील 32 घरे दरडीखाली गाडली गेली होती. या गावाचे पुनर्वसन म्हाडाकडून करण्यात येणार आहे असं सरकार प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. घरच दरडीखाली गेल्यामुळे या गावातील लोक हे तात्पुरत्या निवार्‍या खाली आजूबाजूला राहात होती. त्यामुळे या गावातील लोकांचे पुनर्वसन प्रशासन कधी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आता लवकरच या गावातील लोकांचे पुनवर्सन होणार आहे. 

कधी होणार घरं ?

तळीये गावात दरड कोसळल्यामुळे बेघर झालेल्या गावकऱ्यांचे 1 मे रोजी पुनवर्सन होणार असून, त्याच दिवशी येथील नागरिकांना घराच्या चाव्या देणार असल्याची माहिती शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पालकमंत्री, आमदार, तळीये गावचे सरपंच-उपसरपंच तसेच म्हाडाचे अधिकारी यांची बैठक झाली असून, 1 मे रोजी घराच्या चाव्या देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे. 

कशाप्रकारे  घरं बांधणार ?

पाऊस गेला की आम्ही जिथे घर बांधली जाणार आहेत तिथे सपाटीकरण करणार आहोत. एवढेच नाही तर तीन गुंठे जागेत 600 स्केअर फुटाचे घर आम्ही देत असल्याचे गोगावले यांनी सांगितले. तसेच गावात केलेल्या पंचनाम्यानुसार योग्य त्या सोयीसुविधा देखील करण्यात येणार आहेत. अनेक वर्ष टिकतील अशी घरं प्रशासनाकडून तळीये गावकऱ्यांना मिळणार आहेत.

तसेच तळीये गावाचा पुनर्विकास करताना गावात अंगणवाडी, शाळा आणि आरोग्याची सुविधा म्हणून हॉस्पिटल ही बांधले जाणार आहे. सध्या तळीये गावाच्या पुनर्विकासातील घरं गुजरातच्या भूज येथील सिटेक कंपनीमध्ये तयार केली जात आहेत. काही दिवसात ही घरं मुंबईत आणली जाणार आहेत. नव्या तंत्रज्ञानाची ही घरे असणार आहेत. ज्या प्रकारे कोकणात वातावरण आहे. त्या सर्व वातावरणात ही घर टिकतील अशा स्वरूपाचे घर बनवण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :landslidesभूस्खलनJitendra Awhadजितेंद्र आव्हाड