शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

अनधिकृत वाळू उत्खनन रोखून, वाळू माफियांना पायबंद घालण्यासाठी कडक कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 9:18 PM

जिल्ह्यात वाळूचे अनधिकृत उत्खनन रोखून वाळू माफियांना पायबंद बसावा यासाठी महसूल प्रशासन कडक कारवाई करीत आहे.

रायगड - जिल्ह्यात वाळूचे अनधिकृत उत्खनन रोखून वाळू माफियांना पायबंद बसावा यासाठी महसूल प्रशासन कडक कारवाई करीत आहे. त्यासाठी मेरिटाईम बोर्ड, पोलीस, परिवहन विभाग आणि वन विभाग हे महसूल विभागासोबत या कारवाईत सहभागी होतील, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी शनिवारी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत बोलताना दिले आहेत.

बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, अपर जिल्हाधिकारी भारत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, अलिबाग उप वनसंरक्षक मनिष कुमार, प्रांतांधिकारी, तहसिलदार, पोलीस विभाग, प्रादेशिक परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पकडलेले सक्शन पंप व बोटी नष्ट करण्याचे आदेशजिल्हा प्रशासनाने आता पर्यंत 13 कोटीं रुपयांचा वाळू लिलाव केला आहे. उर्वरित वाळूचा लिलाव करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यामध्ये अनधिकृत वाळू उत्खनन होणार नाही याकरीता जिल्हा प्रशासन दक्षता घेत आहे. अनधिकृत वाळू उत्खनन करण्यार्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल. पकडलेले सक्शन पंप व बोटी नष्ट करण्यात येतील. ज्या बोटींवर नंबर नाहीत अशा बोटींवर कारवाई करण्यात येईल.या कारवाईसाठी मेरीटाईम बोर्डाकडून 10 ते 12 जणांचा गट तयार करु न नावाडी उपलब्ध करु न देण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिका-यांनी यावेळी दिल्या.