शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

खाडीपट्ट्यातील प्रदूषणाचा मुद्दा पेटला , म्हाप्रळ-पंढरपूर मार्गावर दोन तास रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 01:28 IST

महाड औद्योगिक वसाहतीमधून घातक रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी पाइपलाइन वारंवार ओव्हरफ्लो होत आहे. महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात नेहमी होणा-या घातक रसायन सांडपाण्याच्या गळतीवर वारंवार तक्रार होवून देखील औद्योगिक वसाहत

दासगाव : महाड औद्योगिक वसाहतीमधून घातक रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी पाइपलाइन वारंवार ओव्हरफ्लो होत आहे. महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात नेहमी होणा-या घातक रसायन सांडपाण्याच्या गळतीवर वारंवार तक्रार होवून देखील औद्योगिक वसाहत अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्र या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत आहेत. बुधवारी या विभागात गोळे गाव हद्दीत व रावढळ गाव हद्दीत अचानक ही पाइपलाइन लिकेज होवून मोठ्या प्रमाणात घातक रासायनिक सांडपाणी वाहू लागले. अनेक नागरिकांनी याची तक्रार करून देखील कोणी अधिकारी याकडे फिरकला नसल्याने या विभागात सकाळपासूनच वातावरण तापले. दुपारी ५ तासांनंतर या ठिकाणी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी पोहोचल्यानंतर नागरिकांनी त्यांना घेराव घातला. याची माहिती माजी आ. माणिक जगताप यांना मिळाल्याने तेही त्या ठिकाणी पोहोचले व नागरिकांसोबत दोन तास रस्त्यावर बसून रास्ता रोको करत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली.जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत रास्ता रोको थांबणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठांकडून फोनवरून कारवाईचे आश्वासनानंतर रास्ता रोको थांबविण्यात आला.गेली ३० वर्षे महाड औद्योगिक वसाहत ही महाडकर नागरिकांना डोकेदुखी बनली आहे. संपूर्ण महाड तालुका या औद्योगिक क्षेत्रामुळे प्रदूषित झाला आहे. या औद्योगिक वसाहतीमधून सोडण्यात येणारा सावित्री खाडीला घातक रसायनयुक्त पाणी याची नेहमी पाइपलाइन ओव्हर फ्लो होऊन फुटत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात शेती नापीक झाली असून वेगवेगळ्या आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. बुधवारी महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील रावढळ या गाव हद्दीत हीच घातक रसायनयुक्त सांडपाण्याच्या पाइपलाइनला गळती लागली, तसेच दुसºया पाइपलाइनला गोठे गाव हद्दीत गळती लागली. रावढळ गाव हद्दीत गळती होणाºया पाइपलाइनचे घातक रसायनयुक्त सांडपाणी थेट नागेश्वरी नदीत मिसळू लागले. या नदीवर एक छोटासा बंधारा असून वरच्या बाजूस बामणे, सापे, अप्पर तुडील, भेलोशी, नरवन, आद्रे, खुटील या गावांच्या पिण्याच्या पाण्याची जॅकवेल आहे. सकाळी ९ वा. लिकेज झालेली पाइपलाइनची तक्रार देवून महाड औद्योगिक वसाहत क्षेत्रामधून एकही अधिकारी याकडे फिरकला नसल्याने दुपारी या विभागातील नागरिकांचा संताप वाढला व शेकडो नागरिक विरोधात रस्त्यावर उतरले. याची माहिती माजी आ. माणिक जगताप यांना मिळताच त्यांनी त्या ठिकाणी जावून पाच तासांनंतर त्या ठिकाणी पोहोचलेल्या प्रदूषण मंडळाचे अधिकारी माने तसेच महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शंकर जासक यांना विचारणा करता अद्याप कारवाई काय झाली याची माहिती घेत नागरिकांसोबत रस्त्यावर ठाण मांडून तब्बल दोन तास रास्ता रोको करत संबंधित अधिकाºयांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या रास्ता रोकोमध्ये खाडीपट्टा विभागातील शेकडोंनी भाग घेतला होता.स्थानिकांना नोकºया नाहीतया रास्ता रोकोदरम्यान माणिक जगताप यांनी कारखानदारांवर आरोप करत स्थानिक लोकांना नोकºया दिल्या जात नाही. सध्या ८० टक्के परप्रांतीय कारखानदारांमध्ये काम करत असून २० टक्के फक्त स्थानिक कामगार काम करत आहेत. कारखानदार काहीना काही कारण दाखवत स्थानिक कामगारांना नोकºया देत नसल्याचा आरोप यावेळी केला. मात्र यापुढे ही बाब सहन केली जाणार नाही. या विरोधात आंदोलनाचा इशाराही दिला.वसुंधरा अ‍ॅवॉर्डवर आक्षेपकाही महिन्यापूर्वीच सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्राला वसुंधरा अ‍ॅवॉर्ड मिळाला आहे. यावर माणिक जगताप यांनी आक्षेप घेत प्रदूषणमुक्त झाला आहे. मग खाडीपट्ट्यात होणारे प्रदूषण कुठले.महाड औद्योगिक वसाहतीतील प्रिव्ही आॅर्गनिक्स हा कारखाना मोठा प्रदूषणकारी असून त्याचा मॅनेजरच सामाईक सांडपाणी केंद्राचा अध्यक्ष आहे. त्यामुळे या सर्व प्रदूषणाला कारणीभूतच हा कारखाना आहे. चोर पण हेच, चोºया करणारे पण हेच अशी टीका जगताप यांनी करत वसुंधरा अ‍ॅवॉर्ड मिळाला कसा यावर संशय व्यक्त केला.सध्या या विभागात मोठ्या प्रमाणात रोगराई पसरली असून प्रत्येक गावात १० पेशंट कॅन्सरचे असून टीबी, दमा इतर आजाराने हा विभाग ग्रासला असून या प्रदूषणामुळेच हे आजार उद्भवले असल्याचा आरोप माजी आ. माणिक जगताप यांनी यावेळी केला.