शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

आरसीएफ थळच्या रेल्वे मार्गावर अलिबाग पॅसेंजर सुरू करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 23:03 IST

प्रवीण ठाकूर यांची मागणी : खड्ड्यांच्या जंजाळामधून जनतेची सुटका करण्यासाठी पंतप्रधानांना पत्र

अलिबाग : काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष व रायगड बार कौन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रवीण ठाकूर यांनी आरसीएफ थळच्या अस्तित्वात असलेल्या रेल्वे मार्गावर अलिबाग पॅसेंजर (प्रवासी वाहतूक) सुरू करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री पीयूष गोयल व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केली असल्याने या मागणीची दखल केंद्र व राज्य शासन कशी घेतात याकडे रायगडवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोनच दिवसांपूर्वीच्या त्यांच्या मुंबई दौऱ्यामध्ये देशात पायाभूत सुविधांसाठी पाच वर्षांत १०० लाख कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून त्याचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला देण्याचीही ग्वाही दिली आहे. अलिबागचा समावेश मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणामध्ये करण्यात आलेला असल्याने अलिबागसाठी प्रवासी रेल्वे सुरू करण्यासाठी शासनामार्फत तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी अ‍ॅड.प्रवीण ठाकूर यांनी केली आहे. पेण- अलिबाग रेल्वे सुरू करण्याबाबत गेल्या पाच वर्षात अनेक वेळा घोषणा करण्यात आल्या, परंतु प्रत्यक्षात काहीच कार्यवाही होत नसल्याने ठाकूर यांनी खंत व्यक्त केली आहे.

रायगड जिल्ह्याचे अलिबाग हे मुख्यालय असून १९८५ पासून अलिबागपासून ८ कि.मी. अंतरावर रेल्वेमार्ग चालू झालेला आहे, परंतु आजतागायत तेथून केवळ माल वाहतूक तीही आर.सी.एफ. कंपनीकरिता होत आहे. मात्र आजतागायत तेथे प्रवासी वाहतूक सुविधा झालेली नाही. गेली ३० वर्षे सर्वसामान्य माणूस या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू होईल याची आतुरतेने वाट पहात आहे. प्रवीण ठाकूर यांनीही याबाबत २०१४ पासून वारंवार मंत्र्यांना पत्र पाठवून विनंत्या केल्या आहेत. रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करीत नसल्याने लोकांमध्ये नाराजी आहे.रेल्वे सुरू झाल्यास होणारे फायदेअलिबाग पॅसेंजर रेल (प्रवासी वाहतूक) सुरू झाल्यास अलिबागजवळील चोंढी या ठिकाणी प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने प्लॅटफॉर्म, स्टेशन करणे सहज शक्य आहे, तसे झाल्यास सर्वसामान्य माणसाला कमी खर्चात, कमी वेळेत मुंबईत जाणे सोपे होईल. अलिबागलगतचा भाग पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. पर्यटकांना देखील रेल्वे वाहतुकीमुळे फायदा होईल. रस्ते वाहतुकीचा प्रश्न (ट्रॅफिक) कमी होईल व बाराही महिने प्रवाशांना व्यवस्थित प्रवास करता येईल. अलिबाग मुंबईपासून रस्त्याने ११० कि.मी. तर समुद्रामार्गे २ तासांच्या अंतरावर आहे. पेण येथे रेल्वे स्टेशन आहे, तेथून रेल्वेने २० मिनिटांत अलिबागला येता येईल. पोयनाड, कामार्ले, चोंढी असे स्टॉप करता येतील. सदर प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू झाली तर व्यापारी, शेतकरी, नोकरदार, विद्यार्थ्यांना देखील फार फायदा होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :railwayरेल्वे