शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

रात्रीच्या वस्तीच्या ठिकाणी एसटीचालक, वाहकांचे ‘हाल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 00:01 IST

ग्रामीण भागातील जीवनवाहिनी समजली जाणारी एसटी आजही प्रवाशांना आपलीशी वाटत आहे.

निखिल म्हात्रे अलिबाग : ग्रामीण भागातील जीवनवाहिनी समजली जाणारी एसटी आजही प्रवाशांना आपलीशी वाटत आहे. खेडोपाड्यात, डोंगराच्या कुशीत दुर्गम भागात सुखरूप प्रवाशांना घेऊन जाणारी ही लालपरी आजही त्याच उमेदीने प्रवाशांच्या सेवेसाठी झटत आहे; परंतु एसटी बस सेवा देणाऱ्या चालक आणि वाहकांना रात्रीच्या वस्तीच्या ठिकाणी राहण्यासाठी गैरसोय होत असल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. चालक-वाहकांच्या विश्रांतीच्या ठिकाणी चांगल्या दर्जाच्या सुविधा पुरवण्याची गरज आहे. मात्र, या महत्त्वाच्या घटकाकडे प्रशासन आणि सरकारकडून सातत्याने दुर्लक्षच होत असल्याने नाराजीचा सूर आहे.एसटी बस ज्या गावात रात्रीच्या वस्तीला असते, त्या ठिकाणच्या ग्रामपंचायत प्रशासनाने चालक, वाहकांची राहण्याची सोय करणे गरजेचे असते. काही ठिकाणी शाळेत व इतर ठिकाणी राहण्याची सुविधा केली जाते. अथवा नातेवाइकांकडे झोपण्याची सोय चालक, वाहकांची होत असते. मात्र, अनेक वेळेला चालक, वाहक यांना झोपण्यासाठी एसटी बसचाच आधार घ्यावा लागतो. त्यामुळे एसटी बसचालक व वाहक यांच्या या असुविधेकडे एसटी प्रशासन तसेच स्थानिक प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. रात्रीच्या वस्तीच्या ठिकाणी चालक, वाहकांना राहण्याची सुविधा ही गावातील स्थानिक प्रशासनाने करणे गरजेचे आहे. याबाबत आम्ही जिल्हा परिषद प्रशासनाकडे पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र, स्थानिक प्रशासनाकडून योग्य ती पावले उचलली जात नाहीत. पुन्हा याबाबत आम्ही पत्रव्यवहार करू, अशी प्रतिक्रि या रायगड विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली.अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. या ठिकाणच्या एसटी आगारातील चालक-वाहकांची राहण्याची व्यवस्था आहे. मात्र, त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात सोयी-सुविधांची वानवा आहे. नोकरी करायची असल्याने निमूटपणे चालक-वाहक तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत असल्याचे चित्र दिसत आहे.प्रवासी वाहतूक करण्याच्या सुविधा आधुनिक काळात वाढल्या आहेत. रिक्षा, मिनीडोअर, प्रवासी कार यामुळे प्रवाशांना त्वरित प्रवास करण्याच्या सुविधा निर्माण झालेल्या आहेत. मात्र, या प्रवासी वाहतूक सुविधा ठरावीक वेळेपर्यंत प्रवाशांना दिल्या जातात. राज्य परिवहन महामंडळ आजही अहोरात्र प्रवाशांना योग्य सुविधा देत आहेत. यासाठी चालक, वाहक हे इमाने इतबारे काम करत आहेत. एसटी बस ही गावागावांत शेवटच्या ठिकाणापर्यंत प्रवाशांना त्याच्या इच्छित स्थळी सुरक्षित सोडण्याची सुविधा देत असते. चालक व वाहक हे खेडेगावात शेवटची बस घेऊन जाऊन त्या ठिकाणी रात्रीची वस्ती करत असतात. त्या ठिकाणीही कोणत्याच सुविधा नसल्याने त्यांना रात्र खितपत काढावी लागत आहे.।एसटीतच काढावी लागते रात्रजिल्ह्यात साधारण १५० ते २०० एसटी बसचालक, वाहक हे शेवटच्या स्थानकावर रात्रीच्या वस्तीला असतात. मात्र, वस्तीला घेऊन गेलेल्या चालक व वाहकांना वस्तीच्या ठिकाणी बस सोडून दुसरीकडे जाऊन आराम करण्याची सुविधा मिळत नाही, त्यामुळे चालक व वाहकांना एसटीमध्येच आराम करावा लागतो. एसटी बसमध्ये झोपत असले तरी मच्छरांचा त्रास, बिना पंख्याचा वारा, अशा असुविधेमध्ये चालक-वाहकांना रात्र काढावी लागते. स्वच्छतागृहाचीही पंचायत होत असते. त्यामुळे चालक व वाहकांना रात्रीच्या वस्तीला गेल्यावर असुविधेला सामोरे जावे लागते.।चालक-वाहकांना चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत. प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी ते सातत्याने झटत असतात. चालक-वाहकांसाठी जिल्ह्यात अस्तित्वात असणाºया आगारातील विश्रांतिगृहाची अवस्था बिकट आहे. त्यामध्ये त्यांना राहावे लागते. तसेच वस्तीवर गेलेल्यांना तीही सुविधा मिळत नाही, हे अतिशय वाईट आहे. प्रशासन आणि सरकारने यामध्ये तातडीने लक्ष घालून त्यांना चांगल्या दर्जाच्या सुविधा कशा मिळतील, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. चांगल्या सुविधा मिळाल्या तरच त्यांची कार्यक्षमताही वाढण्यास मदत होईल.-डॉ. सचिन पाटील,अध्यक्ष, रिसोर्स सेंटर फॉर ह्युमन डेव्हलपमेंट