शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

आतापर्यंत जनआशीर्वाद यात्रेचा ४ हजार ५०० किमीपेक्षा जास्त प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 23:46 IST

जनआशीर्वाद यात्रा शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडच्या भूमीत अवतीर्ण झाली आहे.

पेण : जनआशीर्वाद यात्रा शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडच्या भूमीत अवतीर्ण झाली आहे. रायगडावर शिवसेनेचा भगवा कायम फडकत राहिलेला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा फडकत असल्याने रायगड शिवसेनेसाठी अवघड नाही, तुम्ही निश्चिंत रहा, पुढचं काय होणार आहे ते बघून घेवू. जनआशीर्वाद यात्रेत मी महाराष्टÑातील तमाम जनतेशी संवाद साधीत असून आतापर्यंत ४ हजार ५०० किमीपेक्षा जास्त प्रवास करून ९० विधानसभा मतदारसंघात जनता जनार्दनाचे आशीर्वाद घेतलेले आहेत. सगळ्याच ठिकाणी मला शिवसेनेच्या भगव्याचे दर्शन घडले. शेतकरी, कष्टकरी, कामगार, बेरोजगार, प्रदूषणमुक्त महाराष्टÑ, पर्यावरण प्रफुल्लित महाराष्टÑ घडविण्यासाठी मला सर्वांची साथ हवी आहे, असे प्रतिपादन शिवसेना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पेण येथील जनसंपर्क यात्रेप्रसंगी जनतेशी संवाद साधताना केले.युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जनसंपर्क यात्रा पेणमध्ये दुपारी २ वाजता दाखल झाली. पेणच्या आगरी समाज विकास मंच या सभागृहात आदित्य ठाकरे यांनी पेणच्या जनतेशी सुसंवाद साधला. याप्रसंगी आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, कोणाला निवडून आणायचे कोणाचे सरकार येणार हा विषय बाजूला ठेवून शिवसेना ८० टक्के समाजकारण करते, वर्षातील ३६५ दिवस माझा शिवसैनिक हे समाजसेवेचे व्रत नित्यनेमाने पाळतो. राजकारणाच्यावेळी राजकारण हे तेवढ्यापुरतेच सीमित राहते. शिवसेनेमध्ये कोणी आमदार होतो, कोणी खासदार, कोणी मंत्री होतो, परंतु या सर्वांपेक्षा माझा शिवसैनिक मोठा आहे. शिवसैनिक आणि शिवबंधनाचा धागा हा शिवसेनेचे जीव की प्राण आहे. त्या शिवसैनिकांना व जनतेला भेटण्यासाठीच माझी ही जनआशीर्वाद यात्रा असल्याने त्यांनी सांगितले. जनआशीर्वाद यात्रा ही मी तीर्थयात्रा समजतो यामुळेच मला या यात्रेत महाराष्टÑातील आबालवृद्धांचे आशीर्वाद लाभलेले आहेत. तुम्ही माझ्याकडे जी निवेदने दिलीत त्या समस्या दूर करण्यासाठीच व नवा महाराष्टÑ घडविण्याचा संकल्प या जनआशीर्वाद यात्रेचा मूळ हेतू आहे. याच चांगल्या कामासाठी मला सर्वांचीच सोबत हवी आहे. चला पुढे जाऊ या आणि नवा महाराष्टÑ घडवूया असे ते शेवटी सांगितले.याप्रसंगी उपस्थितांमध्ये शिवसेनेचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी, महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी, युवासेनेचे पदाधिकारी याशिवाय आ. सचिन अहिर, बबन पाटील, जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा प्रमुख किशोर जैन, उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिकांची उपस्थिती होती.>रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी सभारायगड जिल्ह्यातील माणगाव, कर्जत, मोहपाडा, अलिबाग, पनवेल येथे जनआशीर्वाद यात्रा दाखल झाली होती, यावेळी आदित्य ठाकरे यांनी ठिकठिकाणी सभा घेऊन जनतेशी संवाद साधला. यावेळी भावनिक आवाहन त्यांनी के ले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019