शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
2
IND vs ENG: लॉर्ड्स कसोटीपूर्वी इंग्लंडचा मोठा डाव, खेळपट्टीच बदलून टाकली, कुणाला मिळणार मदत?
3
Glen Industries IPO च्या GMP मध्ये तुफान तेजी; आतापर्यंत ४३ पट झाला सबक्राइब, पाहा डिटेल्स
4
संजय शिरसाट यांना आयकर नोटीस; विट्स हॉटेल लिलावाच्या चौकशी आदेशानंतर दुसरा धक्का
5
जुना मित्र पुन्हा कामाला आला! रशिया १० लाख भारतीयांना रोजगार देणार, कधीपर्यंत अर्ज करता येणार?
6
"मुंबई, महाराष्ट्रात मराठी माणसाला घर नाकारलं तर..."; मंत्री शंभूराज देसाईंची महत्त्वाची घोषणा
7
उत्तरेत सुरू झाला, महाराष्ट्रात श्रावण कधीपासून? पाहा, यंदा किती श्रावणी सोमवार अन् महत्त्व
8
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
9
Sindoor Bridge: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंदूर उड्डाणपुलाचे उद्घाटन
10
एका शब्दावरून निवडणूक आयोग अडकला, सर्वोच्च न्यायालयात मतदार पुनरावलोकनावरील सुनावणीवेळी झाली कोंडी
11
Airtel Recharge Plan: २०० रुपयांपेक्षा स्वस्तातील एअरटेलचे हे प्लान्स आहेत बेस्ट, WiFi असलेल्या लोकांना होणार मोठा फायदा
12
YouTube'ने नियम बदलले! आता अशा कंटेंटसाठी पैसे मिळणार नाहीत, जाणून घ्या संपूर्ण माहिती
13
सेबीने जेन स्ट्रीट प्रकरण जाणूनबुजून लांबवले? माधवी बुच यांचा 'स्फोटक' खुलासा, आता सत्य काय?
14
चिंताजनक! ४० दिवसांत हार्ट अटॅकने २३ जणांचा मृत्यू; 'या' राज्यात खळबळ, रुग्णालयात प्रचंड गर्दी
15
सोनम-राजाला विसरलास का? घरमालकाच्या प्रेमात वेड्या झालेल्या पत्नीने थेट पतीलाच दिली धमकी
16
बीकेसीच्या रिक्षावाल्यानंतर आता कारवाली; कारमध्ये बसून कमावतेय तासाला ₹३५००...
17
Food Recipe: जेवणात तोंडी लावायला नसेल काही, तेव्हा करा ही चटपटीत दही तिखारी!
18
Smart Coworking IPO सबस्क्रिप्शनसाठी खुला; गुंतवणूकीपूर्वी इश्यू प्राईज, GMP सह जाणून घ्या डिटेल्स
19
सारा तेंडुलकर अन् शुबमन गिल पुन्हा एकत्र; कार्यक्रमाचा VIDEO झाला व्हायरल; चर्चांना उधाण
20
२७ नोव्हेंबरपर्यंत शनि वक्री: ९ राशींना १३८ दिवस लाभ, पद-पैसा; भरघोस भरभराट, भाग्योदय काळ!

श्रीवर्धन, म्हसळ्यात मासेमारी धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 23:41 IST

तितली वादळाचा परिणाम; व्यवसायात घट झाल्याने संकटात भर

- संतोष सापते श्रीवर्धन : श्रीवर्धन-म्हसळा तालुक्यातील कोळी समाजाला ‘तितली’ वादळाचा प्रचंड आर्थिक फटका बसला आहे. अरबी समुद्रातील भूगर्भीय हालचालींमुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामानात बदल झाला आहे. त्यामुळे समुद्रातील मासळी उत्पन्न कमी झाले आहे. परिणामी, मासळी व्यावसायिकांना आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे.गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी जून महिन्यात अपेक्षेप्रमाणे पर्जन्यमान झाले; परंतु समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जुलै महिन्यापासून पाऊस अचानक कमी होत आॅगस्ट महिन्यात पूर्णपणे बंद झाला. कोळी समाजाला बारमाही उत्पन्नाचा कुठलाही स्रोत उपलब्ध नाही. बोटबांधणीसाठी येणाऱ्या खर्चासाठी सरकारी मदत मिळत नसल्याचे कोळी बांधवांनी सांगितले आहे. मच्छीमारी व्यवसायात लाखो रुपयांची गुंतवणूक प्रत्येक वर्षाला कोळी बांधव करतात. या वर्षी भूगर्भीय हालचालींचे पडसाद मासळी उत्पन्नावर पडले आहेत. ‘तितली’ वादळाच्या कालावधीत असंख्य खलाशी बोटीवरील काम सोडून गेल्याचे निदर्शनास येते आहे, तसेच उपलब्ध मनुष्यबळाचा खर्च बोटमालकाला करावा लागत आहे. पावसाचा अभाव व नैसर्गिक कारणास्तव समुद्रातील मासळीचे घटलेले उत्पन्न मच्छीमारी व्यवसायाला त्रासदायक ठरत आहे, त्यामुळे कोळी समाजात प्रचंड नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे.श्रीवर्धन तालुक्यातील जीवना बंदर, भरडखोल, दिघी बंदर, आदगाव, रोहिणी, आडी तसेच म्हसळ्यातील वाशी येथे मच्छीमारी केली जाते.रोजंदारीवर काम करणारा मोठा वर्ग मासळी व्यवसायावर अवलंबून असल्याने संबंधित लोकांवर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यात महिलांचे प्रमाण जास्त आहे. कोळी समाजात शिक्षणाचे प्रमाण नगण्य असल्याने इतर रोजगाराचे साधन उपलब्ध होणे अशक्य आहे.शासन मदतनिधी तरतुदीची अपेक्षाश्रीवर्धनमध्ये कोळी समाजाची लोकसंख्या अंदाजे २२,०५०च्या जवळपास आहे. श्रीवर्धन तालुक्यातील जीवना कोळीवाडा, मूळगाव कोळीवाडा, दिघी, कुडगाव, आदगाव, बागमांडला, भरडखोल, दिवेआगार तसेच म्हसळा तालुक्यात रोहिणी, तुरुबाडी, वाशी या ठिकाणी कोळी समाजाचे वास्तव्य आहे. मासळी व्यवसायात कोळी समाजाच्या समवेत मुस्लीम समाजातील काही घटकांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, कोळी समाजासाठी शासनाच्या मदतनिधीची तरतूद व्हावी, अशी अपेक्षा श्रीवर्धनमधील जनता करत आहे.या पूर्वीच्या आघाडी सरकारने श्रीवर्धन तालुक्यातील कोळी समाजासाठी विशेष पॅकेजची तरतूद केली होती. त्यामुळे आमच्या अनेक समस्या कमी झाल्या होत्या. डिझेल सबसीडी मिळाली होती. विद्यमान सरकारने कोळी समाजाकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे.- मोहन वाघे, रहिवासी,श्रीवर्धन जीवना कोळीवाडाया वर्षी मासळीचा दुष्काळ पडला आहे. बोटीच्या मालकाचा डिझेल खर्चसुद्धा भागत नाही. खलाशी व तांडेल यांचा पगार देणे अवघड झाले आहे. सरकारने मदत करावी ही अपेक्षा आहे.- चंद्रकांत वाघे, अध्यक्ष, कोळी समाज, श्रीवर्धनकोळी समाजाच्या प्रश्नांना आम्ही नेहमीच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या वर्षी कोळी समाजाच्या निर्माण झालेल्या समस्येचे निराकरण करण्याचा निश्चित प्रयत्न करू. श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यांतील कोळी समाजाला आघाडी सरकारच्या काळात सुनील तटकरे यांनी विशेष पॅकेज दिले होते.- अदिती तटकरे, अध्यक्ष,जिल्हापरिषद रायगडकोळी बांधवांची विद्यमान परिस्थिती अतिशय खराब आहे. पतपेढीकडून घेतलेले खर्च फेडण्याचा कोळी समाजाच्या समोर प्रश्न निर्माण झाला आहे. आम्ही कोळी समाजाचे प्रश्न सरकार दरबारी सादर करून त्यांना न्याय देण्याचा निश्चित प्रयत्न करू.- श्याम भोकरे,उपजिल्हाप्रमुख, शिवसेना

टॅग्स :fishermanमच्छीमारRaigadरायगड