शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

'महाराष्ट्राशी संबंध नाही, आरोप खोटा'; राहुल गांधींनी दाखवलेला नंबर निघाला उत्तर प्रदेशातल्या अंजनीचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 14:27 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेमध्ये दाखवण्यात आलेल्या फोन क्रमांक असलेली व्यक्ती समोर आली आहे.

Rahul Gandhi Press Conference: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मत चोरीच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा पत्रकार परिषदेत घेत स्फोटक आरोप केले आहेत. यावेळी राहुल गांधी यांनी मत चोरीचा आरोप करत धक्कादायक दावे केले. पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत कर्नाटक आणि महाराष्ट्रात कोणीतरी जाणूनबुजून मतदार याद्यांमध्ये फेरफार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र या आरोपांमुळे उत्तर प्रदेशातील  एका व्यक्तीला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींविरोधात आपण तक्रार दाखल करणार असल्याचे या व्यक्तीने म्हटलं.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी सध्या मत चोरीच्या मुद्द्यावर निवडणूक आयोगाला धारेवर धरलं आहे. गुरुवारी राहुल गांधी यांनी दिल्लीतील काँग्रेसच्या इंदिरा भवन मुख्यालयात पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग अनेक राज्यांमधील मतदारांना लक्ष्य करत असल्याचा आरोप केला. राहुल गांधींनी स्क्रीनवर काही नंबर दाखवून म्हटले की यांची मते रद्द करुन निवडणूक भारतीय लोकशाही उद्ध्वस्त करणाऱ्यांना संरक्षण देत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. मात्र राहुल गांधींनी स्क्रीनवर जो एक नंबर दाखवला तो प्रयागराजमधील एका व्यक्तीचा आहे. आता त्या नंबरवर सतत येणाऱ्या कॉलमुळे ती व्यक्ती अडचणीत आली असून त्याने पोलिसांची मदत घेण्याचे ठरवलं आहे.

राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर प्रयागराज जिल्ह्यातील मेजा येथील रहिवासी अंजनी मिश्रा यांच्या फोनवर सातत्याने कॉल्स येत आहेत.मी मेजा येथे राहतो. मला अचानक खूप फोन येऊ लागले. एका कॉलरने मला सांगितले की माझा नंबर व्हायरल झाला आहे, जो बनावट मतदार यादीच्या प्रकरणात आला आहे. मग त्याने एक स्क्रीनशॉट शेअर केला. मी पाहिले तेव्हा तो माझा नंबर होता. राहुल गांधींनी माझा नंबर चुकीच्या  पद्धतीने दाखवला आणि आता मला अडचणींचा सामना करावा लागतोय. माझ्याकडे हा नंबर १५ वर्षांपासून आहे, असं अंजनी मिश्राने सांगितले.

"राहुल गांधींनी आरोप केला की महाराष्ट्रात मते चोरीला गेली आणि माझे मतदार ओळखपत्र हटवण्यात आले, जे खरे नाही. मी एक-दोन दिवसांसाठी महाराष्ट्रात गेलो असेल, पण मी महाराष्ट्रात वारंवार येत नाही. त्यामुळे माझे मतदार ओळखपत्र महाराष्ट्रात तयार किंवा हटवता येत नाही. हा पूर्णपणे खोटा आरोप आहे," असेही मिश्रा म्हणाले.

दरम्यान, कर्नाटकातील अलांड विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीतून ६,०१८ मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. महाराष्ट्रातील राजुरा विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत अशाच प्रकारे ६,८५० मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार मतदार यादीत घोळ करणाऱ्यांना संरक्षण देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. कर्नाटक सीआयडी या प्रकरणाची चौकशी करत आहे, पण निवडणूक आयोग आवश्यक माहिती देत ​​नाही, ज्यामुळे तपास पूर्ण होत नाही, असंही राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेश