शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

वादळी पावसाचा महाडला तडाखा, वीर, दासगावमध्ये घरांचे नुकसान, विजेचे खांब कोसळल्याने सात गावे रात्रभर अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 06:27 IST

रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास संपूर्ण महाड तालुक्यात वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या वादळामध्ये वीर गावातील तीन घरांचे तर दासगावमध्ये एक घराचे नुकसान झाले. वीर ते दाभोळ या गावापर्यंत ठिकठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने सात गावांतील अनेक वाड्यांना रात्रभर अंधारात राहावे लागले.

दासगाव /महाड : रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास संपूर्ण महाड तालुक्यात वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या वादळामध्ये वीर गावातील तीन घरांचे तर दासगावमध्ये एक घराचे नुकसान झाले. वीर ते दाभोळ या गावापर्यंत ठिकठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने सात गावांतील अनेक वाड्यांना रात्रभर अंधारात राहावे लागले.रविवारी अचानक महाड तालुक्यामध्ये विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळाला तडाखा एवढा मोठा होता की, संपूर्ण तालुका हादरून गेला होता, तर काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जोराच्या वाºयामुळे अनेक ठिकाणी झाडे तसेच विजेचे खांब जमीनदोस्त झाली. याचा फटका मोठ्या प्रमाणात नागरिकांना सहन करावा लागला. तालुक्यातील वीर गावामध्ये वामन भोईर, नजमुन्नीस अधिकारी व पांडुरंग भोईर या तिघांच्या घरावर मोठी सागवानाची झाडे कोसळली. यामध्ये वामन भोईर यांचे घर संपूर्ण जमीनदोस्त झाले, तर इतर दोन घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच दासगावमध्ये देखील शंकर निवाते यांच्या घरावर सागवानाचे झाड कोसळून घराचे नुकसान झाले. या नुकसानीचा दासगाव सजेचे तलाठी संदेश पानसारे यांनी पंचनामा केला असून अंदाजे दासगाव आणि वीर या दोन्ही ठिकाणचा घरांचे अंदाजे नुकसान एक लाख सात हजार आठशे असल्याचे सांगितले. मात्र या चौघांमध्ये वामन भोईर यांचे जास्त नुकसान झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे दोन्ही ठिकाणच्या चारही घरांवर सागवानाचेच झाड कोसळल्याचे दिसून येत आहे.रविवारी झालेल्या वादळी वाºयामुळे वीर गावामध्ये विजेचे खांब कोसळले तर वीरपासून दाभोळ या गावहद्दीपर्यंत विजेचे अनेक खांब जमीनदोस्त झाले. याचाफटका केंबुर्ली, वहूर, दासगाव, वीर, टोळ, सापा, दाभोळ या अंतरात असलेल्या अनेक वाड्यांना बसला व या गावांना रात्र अंधारात काढावी लागली.सव आदिवासी वाडीत तीन बक-या गेल्या वाहूनविजेच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटात कोसळलेल्या पावसामुळे सव येथे घरांची पडझड झाली असून सव आदिवासी वाडीतील एका घरात नाल्याचे पाणी घुसल्याने पाण्याच्या प्रवाहाबरोबर तीन बकºया वाहून गेल्या. सव आदिवासी वाडीतील संतोष वाघमारे, चंदन वाघमारे, शेवंता वाघमारे, व शंकर वाघमारे यांच्या घरांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. या वादळामुळे तालुक्यात अन्य अनेक घरांचे छप्पर उडून गेले तर काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. काही ठिकाणी झाडे देखील उन्मळून पडलेली आहेत. वादळी पावसामुळे महाड शहरासह तालुक्यात वीज पुरवठा खंडित झाला होता.महाड येथे सर्वाधिक ९६.७० मिमी पाऊस अलिबाग : रायगड जिल्ह्यातील महाड व माणगाव तालुक्यांना पावसाने झोडपून काढले. सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात रायगड जिल्ह्यात सर्वाधिक ९६.७० मिमी पावसाची नोंद महाड येथे झाली तर त्या खालोखाल ९३ मिमी पावसाची नोंद माणगाव येथे झाली आहे. जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी पोलादपूर येथे २७ मिमी, सुधागड येथे २१, तळा येथे १८, म्हसळा १७ मिमी तर मुरु ड, कर्जत, खालापूर, रोहा, श्रीवर्धन व माथेरान येथे केवळ दोन मिमी पावसाची नोंद झाली आहे. अलिबाग, पेण, पनवेल व उरण येथे शून्य पावसाची नोंद झाली असली तरी वेगवान वा-यांमुळे काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत.रात्री उशिरा तीव्र जलढग महाबळेश्वर व सातारा या दिशेने सरकल्याने रायगड जिल्ह्यात आज पावसाचा जोर नव्हता. तुरळक ठिकाणी मात्र पावसाच्या सरी पडल्याची माहिती जिल्हा आपत्ती निवारण कक्षाच्या सूत्रांनी दिली आहे.