शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
3
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
4
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
5
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
6
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
7
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
8
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
9
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
10
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
11
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
12
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
13
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
14
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
15
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
16
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
17
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
18
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
19
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
20
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा

सातबारा अद्ययावत कार्यक्रमामुळे तलाठी गावातून गायब, सर्व्हर मंद असल्याने अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 03:53 IST

संपूर्ण राज्यात सुरू असलेल्या सातबारा अद्ययावत कार्यक्रमामुळे तलाठी महाड शहरात एकाच ठिकाणी बसत असल्याने ग्रामीण भागातून तलाठी गायब झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या चार वर्षांपासून हे काम सुरू असून अद्याप हे काम पूर्ण न झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

दासगाव : संपूर्ण राज्यात सुरू असलेल्या सातबारा अद्ययावत कार्यक्रमामुळे तलाठी महाड शहरात एकाच ठिकाणी बसत असल्याने ग्रामीण भागातून तलाठी गायब झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या चार वर्षांपासून हे काम सुरू असून अद्याप हे काम पूर्ण न झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. मात्र इंटरनेट आणि दूरध्वनी सुविधा नसल्याने तालुक्यातील अनेक कार्यालये उघडलीच गेली नाहीत. याचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. एकीकडे हा कार्यक्र म शासनाला पूर्ण करावयाचा आहे तर दुसरीकडे याचे संगणकीय सर्व्हर मंदावत आहे यामुळे सातबारा अद्ययावत करण्यास वेळ जात आहे, शिवाय कर्मचारी तुटवडा असल्याने याचा फटका देखील नागरिकांना बसत आहे.महाड तालुक्यात सातबारा अद्ययावत करणे कार्यक्र म गेली दोन वर्षांपासून सुरू आहे. शहरातील माता रमाबाई विहार याठिकाणी सर्व तलाठी कर्मचाºयांना एकत्रित बसवले आहे. याठिकाणी नेट सुविधा उपलब्ध करून दिली असल्याने जवळपास २६ तलाठी याठिकाणी काम करत आहेत. यामध्ये ६ मंडळ अधिकाºयांचा देखील समावेश आहे. आॅनलाइन सातबारा अपग्रेड करणे, रीएडिट करणे अशी कामे यावर केली जात आहेत. महाड तालुक्यातील ३६ तलाठी सजा आहेत त्यापैकी २६ तलाठी काम करत आहेत. दिवसभर हे काम सुरु असल्याने आणि शासनाचे आदेश असल्याने प्रत्यक्ष तलाठी कार्यालयात काम करणे या कर्मचाºयांना शक्य नाही. शिवाय या कार्यालयातील सर्व कोतवाल देखील याठिकाणी नेमण्यात आले आहेत. यामुळे तालुक्यातील अनेक गावातील तलाठी कार्यालये ओस पडली आहेत. यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांना पैसे आणि वेळ वाया घालवत महाडमध्ये दाखल्यांसाठी यावे लागत आहे. महाड तालुक्यातील अनेक गावे ही दुर्गम भागात आहेत. त्या ठिकाणाहून महाडमध्ये यायचे तर पैसे आणि वेळ वाया घालवावा लागत आहे. काही तलाठी त्यांच्या सजेमध्ये काही वेळ काम करून पुन्हा महाडमध्ये सातबारा दुरु स्ती कार्यक्र माच्या ठिकाणी येत आहेत. मात्र अन्य शहरातून कामासाठी येणाºया नागरिकांना यामुळे फेºया माराव्या लागत आहेत.तलाठी कार्यालये दुर्गम भागात असल्याने नेट सुविधा नाही. अनेक कार्यालयांना तर वीज पुरवठा देखील नाही. यामुळे या कार्यालयात संगणकीय काम होत नाही. सध्या महसूल संदर्भातील सर्व कामे आॅनलाइन होत आहेत. यामुळे तलाठी कार्यालये बंद ठेवली जात आहेत. त्यातच कमी तलाठी कर्मचारी आणि गावांची संख्या अधिक यामुळे एका तलाठ्याकडे किमान दोन ते तीन गावांचा कारभार दिला आहे. कोंझर गावातील तलाठी कार्यालय तर गेली दोन वर्षे बंद अवस्थेत आहे.संके तस्थळ मंद : गावातून ना नेट सुविधा ना दूरध्वनी यामुळे सातबारा अद्ययावत काम शहरात एकाच ठिकाणी होत आहे. याकरिता शासन या तलाठी कर्मचाºयाने प्रतिदिन किती काम केले आहे, याचा आॅनलाइन अहवाल तपासत आहे. मात्र याठिकाणी ज्या वेबवर हे काम केले जात आहे ते संकेतस्थळ कायम मंदावत आहे. यामुळे तलाठी कर्मचाºयाला एक सातबारा अपडेट करण्यासाठी दिवस जात आहे. संपूर्ण जिल्ह्याला आणि राज्याला एकच सर्व्हर असल्याने ही स्थिती आहे. हे काम डिसेंबर पूर्वी पूर्ण करावयाचे आहे मात्र सतत उद्भवत असलेल्या नेट समस्येमुळे हे काम लांबत आहे.महाडमध्ये १८३ गावे आहेत. त्यापैकी ३५ गावांची सातबारा दुरु स्ती पूर्ण झाली आहे. आॅनलाइन कामासाठी इंटरनेट सुविधा, सर्व्हरमध्ये निर्माण होणारे अडथळे यामुळे जलद गतीने सातबाºयामध्येदुरु स्ती शक्य नाही. -प्रदीप कु डाळ, निवासी नायब तहसीलदार

टॅग्स :Raigadरायगड