शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

दासगावमधील टपाल कार्यालयातील सेवा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 23:18 IST

खंडित इंटरनेट सेवेचा फटका

दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावरील दासगाव गावातील पोस्ट कार्यालय गेल्या वर्षभरापासून इंटरनेट सुविधेमुळे त्रस्त आहे. चौपदरीकरण कामात वारंवार इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांची लाइन तुटत असल्याचे कारण दिले जात असल्याने पोस्ट कार्यालयातील कर्मचारी आणि ग्राहक देखील हैराण झाले आहेत. याबाबत कठोर कारवाई केली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.महाडजवळील दासगाव हे एक मुख्य गाव आहे. या गावात असलेल्या पोस्ट कार्यालयातील सुविधेचा परिसरातील गावांना फायदा होत आहे. टपाल पाठवणे, आर्थिक गुंतवणूक, विमा काढणे आदी सुविधा उपलब्ध असल्याने दासगाव पोस्ट कार्यालयात कायम गर्दी असते. मात्र, गेल्या वर्षभरापासून याठिकाणी इंटरनेट सुविधेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे गेल्या वर्षभरापासून याठिकाणी इंटरनेट सुविधेचे तीनतेरा वाजत आहेत. एकीकडे शासन सर्व व्यवहार आॅनलाइन पद्धतीने करण्याकडे आग्रह धरत असताना दुसरीकडे मात्र इंटरनेट सुविधेचा बोजवारा उडवला आहे. ग्रामीण भागात आणि सर्व शासकीय कार्यालयात भारत संचार निगम लिमिटेड या भारत सरकारच्या कंपनीचे नेट वापरले जाते. मात्र, शासनाच्या या इंटरनेट सुविधेचे महामार्ग चौपदरीकरण कामाने वाट लावली आहे. यामुळे आॅनलाइन कामे आॅफलाइन झाली आहेत.दासगावमधील टपाल कार्यालयात वीर, दाभोळ, कोकरे, दासगाव, सापे या गावातील लोकांची कामे होतात. टपाल सेवा, पासपोर्ट, बचत खात्यांचे व्यवहार आदी सुविधा खंडित इंटरनेटमुळे ठप्प झाली आहेत. याबाबत दासगाव टपाल कार्यालयाने वारंवार तक्र ारी केल्या. मात्र, याकडे भारत संचार निगम लिमिटेडचे महाड कार्यालय दुर्लक्ष करत आहे. वारंवार तोडल्या जाणाºया लाइनबाबत साधी कारवाई देखील झालेली नाही. यामुळे दासगावमधील टपाल कार्यालयाचे कर्मचारी आणि टपाल कार्यालयात येणारे नागरिक देखील या सेवेने हैराण झाले आहेत. खेडोपाड्यातून येणारे नागरिक खंडित इंटरनेट सुविधेमुळे वारंवार फेºया मारत आहेत. टपाल कार्यालयात खासगी इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्याने केवळ बीएसएनएलच्या लाइनवरच अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, बीएसएनएलचे अधिकारी याबाबत गंभीरपणे कार्यवाही करत नाहीत.महामार्ग कामात इंटरनेट सुविधा खंडित होत आहे. लवकरच याबाबत कार्यवाही करून इंटरनेट सुविधा पूर्ववत केली जाईल.- बी.पी. रावत, जनरल मॅनेजर, बीएसएनएलदासगाव टपाल कार्यालयात गेल्या वर्षभरापासून इंटरनेट सुविधा खंडित होत आहे, यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, टपाल ग्राहकांच्या संतापाला आम्हाला तोंड द्यावे लागत आहे- के. आर. शिलवंत,पोस्ट मास्तर, दासगावदासगावमधील बीएसएनएलचे एक्सचेंज वहूरमध्ये स्थलांतर केल्यापासून दासगावमध्ये इंटरनेट सुविधा ठप्प झाली आहे. यामुळे पोस्ट आॅफिसमधील ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे, ही सुविधा लवकर पूर्ववत न झाल्यास नागरिक रस्त्यावर उतरणार.- दिलीप उकिर्डे,सरपंच दासगाव

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसRaigadरायगड