शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
2
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
3
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
4
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
5
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
6
आता काय बॉउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
7
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
8
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
9
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
10
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
11
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
12
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
13
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
14
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
15
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
16
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
17
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न
18
“भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक, महायुती सरकारने...”: दीपक केसरकर
19
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप
20
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!

दासगावमधील टपाल कार्यालयातील सेवा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 23:18 IST

खंडित इंटरनेट सेवेचा फटका

दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावरील दासगाव गावातील पोस्ट कार्यालय गेल्या वर्षभरापासून इंटरनेट सुविधेमुळे त्रस्त आहे. चौपदरीकरण कामात वारंवार इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांची लाइन तुटत असल्याचे कारण दिले जात असल्याने पोस्ट कार्यालयातील कर्मचारी आणि ग्राहक देखील हैराण झाले आहेत. याबाबत कठोर कारवाई केली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.महाडजवळील दासगाव हे एक मुख्य गाव आहे. या गावात असलेल्या पोस्ट कार्यालयातील सुविधेचा परिसरातील गावांना फायदा होत आहे. टपाल पाठवणे, आर्थिक गुंतवणूक, विमा काढणे आदी सुविधा उपलब्ध असल्याने दासगाव पोस्ट कार्यालयात कायम गर्दी असते. मात्र, गेल्या वर्षभरापासून याठिकाणी इंटरनेट सुविधेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे गेल्या वर्षभरापासून याठिकाणी इंटरनेट सुविधेचे तीनतेरा वाजत आहेत. एकीकडे शासन सर्व व्यवहार आॅनलाइन पद्धतीने करण्याकडे आग्रह धरत असताना दुसरीकडे मात्र इंटरनेट सुविधेचा बोजवारा उडवला आहे. ग्रामीण भागात आणि सर्व शासकीय कार्यालयात भारत संचार निगम लिमिटेड या भारत सरकारच्या कंपनीचे नेट वापरले जाते. मात्र, शासनाच्या या इंटरनेट सुविधेचे महामार्ग चौपदरीकरण कामाने वाट लावली आहे. यामुळे आॅनलाइन कामे आॅफलाइन झाली आहेत.दासगावमधील टपाल कार्यालयात वीर, दाभोळ, कोकरे, दासगाव, सापे या गावातील लोकांची कामे होतात. टपाल सेवा, पासपोर्ट, बचत खात्यांचे व्यवहार आदी सुविधा खंडित इंटरनेटमुळे ठप्प झाली आहेत. याबाबत दासगाव टपाल कार्यालयाने वारंवार तक्र ारी केल्या. मात्र, याकडे भारत संचार निगम लिमिटेडचे महाड कार्यालय दुर्लक्ष करत आहे. वारंवार तोडल्या जाणाºया लाइनबाबत साधी कारवाई देखील झालेली नाही. यामुळे दासगावमधील टपाल कार्यालयाचे कर्मचारी आणि टपाल कार्यालयात येणारे नागरिक देखील या सेवेने हैराण झाले आहेत. खेडोपाड्यातून येणारे नागरिक खंडित इंटरनेट सुविधेमुळे वारंवार फेºया मारत आहेत. टपाल कार्यालयात खासगी इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्याने केवळ बीएसएनएलच्या लाइनवरच अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, बीएसएनएलचे अधिकारी याबाबत गंभीरपणे कार्यवाही करत नाहीत.महामार्ग कामात इंटरनेट सुविधा खंडित होत आहे. लवकरच याबाबत कार्यवाही करून इंटरनेट सुविधा पूर्ववत केली जाईल.- बी.पी. रावत, जनरल मॅनेजर, बीएसएनएलदासगाव टपाल कार्यालयात गेल्या वर्षभरापासून इंटरनेट सुविधा खंडित होत आहे, यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, टपाल ग्राहकांच्या संतापाला आम्हाला तोंड द्यावे लागत आहे- के. आर. शिलवंत,पोस्ट मास्तर, दासगावदासगावमधील बीएसएनएलचे एक्सचेंज वहूरमध्ये स्थलांतर केल्यापासून दासगावमध्ये इंटरनेट सुविधा ठप्प झाली आहे. यामुळे पोस्ट आॅफिसमधील ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे, ही सुविधा लवकर पूर्ववत न झाल्यास नागरिक रस्त्यावर उतरणार.- दिलीप उकिर्डे,सरपंच दासगाव

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसRaigadरायगड