शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

दासगावमधील टपाल कार्यालयातील सेवा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 23:18 IST

खंडित इंटरनेट सेवेचा फटका

दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावरील दासगाव गावातील पोस्ट कार्यालय गेल्या वर्षभरापासून इंटरनेट सुविधेमुळे त्रस्त आहे. चौपदरीकरण कामात वारंवार इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांची लाइन तुटत असल्याचे कारण दिले जात असल्याने पोस्ट कार्यालयातील कर्मचारी आणि ग्राहक देखील हैराण झाले आहेत. याबाबत कठोर कारवाई केली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.महाडजवळील दासगाव हे एक मुख्य गाव आहे. या गावात असलेल्या पोस्ट कार्यालयातील सुविधेचा परिसरातील गावांना फायदा होत आहे. टपाल पाठवणे, आर्थिक गुंतवणूक, विमा काढणे आदी सुविधा उपलब्ध असल्याने दासगाव पोस्ट कार्यालयात कायम गर्दी असते. मात्र, गेल्या वर्षभरापासून याठिकाणी इंटरनेट सुविधेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे गेल्या वर्षभरापासून याठिकाणी इंटरनेट सुविधेचे तीनतेरा वाजत आहेत. एकीकडे शासन सर्व व्यवहार आॅनलाइन पद्धतीने करण्याकडे आग्रह धरत असताना दुसरीकडे मात्र इंटरनेट सुविधेचा बोजवारा उडवला आहे. ग्रामीण भागात आणि सर्व शासकीय कार्यालयात भारत संचार निगम लिमिटेड या भारत सरकारच्या कंपनीचे नेट वापरले जाते. मात्र, शासनाच्या या इंटरनेट सुविधेचे महामार्ग चौपदरीकरण कामाने वाट लावली आहे. यामुळे आॅनलाइन कामे आॅफलाइन झाली आहेत.दासगावमधील टपाल कार्यालयात वीर, दाभोळ, कोकरे, दासगाव, सापे या गावातील लोकांची कामे होतात. टपाल सेवा, पासपोर्ट, बचत खात्यांचे व्यवहार आदी सुविधा खंडित इंटरनेटमुळे ठप्प झाली आहेत. याबाबत दासगाव टपाल कार्यालयाने वारंवार तक्र ारी केल्या. मात्र, याकडे भारत संचार निगम लिमिटेडचे महाड कार्यालय दुर्लक्ष करत आहे. वारंवार तोडल्या जाणाºया लाइनबाबत साधी कारवाई देखील झालेली नाही. यामुळे दासगावमधील टपाल कार्यालयाचे कर्मचारी आणि टपाल कार्यालयात येणारे नागरिक देखील या सेवेने हैराण झाले आहेत. खेडोपाड्यातून येणारे नागरिक खंडित इंटरनेट सुविधेमुळे वारंवार फेºया मारत आहेत. टपाल कार्यालयात खासगी इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्याने केवळ बीएसएनएलच्या लाइनवरच अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, बीएसएनएलचे अधिकारी याबाबत गंभीरपणे कार्यवाही करत नाहीत.महामार्ग कामात इंटरनेट सुविधा खंडित होत आहे. लवकरच याबाबत कार्यवाही करून इंटरनेट सुविधा पूर्ववत केली जाईल.- बी.पी. रावत, जनरल मॅनेजर, बीएसएनएलदासगाव टपाल कार्यालयात गेल्या वर्षभरापासून इंटरनेट सुविधा खंडित होत आहे, यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, टपाल ग्राहकांच्या संतापाला आम्हाला तोंड द्यावे लागत आहे- के. आर. शिलवंत,पोस्ट मास्तर, दासगावदासगावमधील बीएसएनएलचे एक्सचेंज वहूरमध्ये स्थलांतर केल्यापासून दासगावमध्ये इंटरनेट सुविधा ठप्प झाली आहे. यामुळे पोस्ट आॅफिसमधील ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे, ही सुविधा लवकर पूर्ववत न झाल्यास नागरिक रस्त्यावर उतरणार.- दिलीप उकिर्डे,सरपंच दासगाव

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसRaigadरायगड