शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

बीएमसीटीमध्ये कामगार भरतीसाठी ७०० अर्र्जांची निवड

By admin | Updated: June 1, 2017 05:16 IST

बीएमसीटीमध्ये कामगार भरतीसाठी ७०० अर्र्जांची निवडजेएनपीटी बंदराअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या सर्वात मोठ्या लांबीच्या आणि क्षमतेच्या चौथ्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्स

लोकमत न्यूज नेटवर्कउरण : जेएनपीटी बंदराअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या सर्वात मोठ्या लांबीच्या आणि क्षमतेच्या चौथ्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्स (बीएमसीटी) या अत्याधुनिक बंदरासाठी ५ जूनपासून कामगार भरती प्रक्रिया पुन्हा सुरु होणार आहे. आॅपरेशन, इंजिनिअरिंग आदि विभागासाठी पदविका आणि पदवीधारक प्रशिक्षणार्थींची भरती तीन टप्प्यात केली जाणार असून पहिल्या टप्प्यासाठी आलेल्या ७००० अर्जांमधून ७०० अर्जांची निवड करण्यात आली असल्याची माहिती कंपनी अधिकाऱ्यांनी दिली.जेएनपीटीच्या इतर सर्व कंटेनर टर्मिनल्समध्ये प्रशिक्षणार्थीसाठी वयाची अट कमाल २५ वर्षे ठेवण्यात आली आहे. मात्र बीएमसीटीने कामगार भरतीची मर्यादा ३० वर्षापर्यंत वाढविली आहे. या अत्याधुनिक टर्मिनलमध्ये वापरण्यात येणाऱ्या एका सिंगल क्वाय क्रेन्सची किंमत ८ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स इतकी आहे. यशस्वी अर्जदारांना बंदरावरील अद्ययावत उपकरणांची हाताळणी आणि देखभाल करता येणार आहे. या उद्योग क्षेत्रामध्ये पाळल्या जाणाऱ्या कार्यपध्दतीचे पालन करण्यासाठी बीएमसीटीला उच्च दर्जाचे तंत्रज्ञान आणि तांत्रिक कौशल्याची गरज आहे. या पदांसाठी पात्रता म्हणून पदवी, पदविकाधारक असण्याची ही अट जेएनपीटीच्या इतर कंटेनर टर्मिनल्ससाठी ठेवण्यात आलेला पात्रतेपक्षा वेगळी नसल्याचा दावाही प्रकल्पाकडून केला जात आहे. बीएमसीटीमध्ये होणाऱ्या कामगार भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये निवड झालेल्या ७०० उमेदवारांना पारखून घेण्यासाठी गुंतागुंतीची आणि आधुनिक उपकरणे हाताळण्यासाठी अद्ययावत पध्दतीचा अवलंब करुन चाचण्या घेण्यात येणार आहेत. निवड झालेले सर्वच उमेदवार प्रकल्पबाधित आहेत. ही प्रक्रिया ५ जूनपासून एका खास चाचणी स्थळावर सुरु होणार आहे. उमेदवारांच्या चाचणीसाठी वापरण्यात येणारी पध्दत आंतरराष्ट्रीय मानकांवर पारदर्शक असणार आहे. या टप्प्यातून पार होत तिसऱ्या टप्प्यापर्यंत पोहचलेल्या उमेदवाराच्या मुलाखतीनंतरच अंतिम कामगार भरती केली जाणार असल्याचे प्रकल्पाकडून सांगण्यात येत आहे.बीएमसीटीमध्ये निर्माण होणाऱ्या प्रत्येक नोकरीमागे प्रकल्प परिसरातील किमान १० नोकऱ्या तयार होणार असून संबंधित इतर उद्योग क्षेत्रांमध्येही नोकऱ्या तयार होतात. केवळ बीएमसीटी नव्हे तर कंत्राटदारांच्या आणि इतर उद्योगक्षेत्रांमधूनही हजारो नोकऱ्या तयार होणार असल्याचा दावा कंपनी अधिकाऱ्याकडून केला जात आहे. बीएमसीटी आपली कार्यक्षमता दुपटीने विस्तारित असताना, या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यामध्ये किमान ५०० तर २०२१ पर्यंत तयार होणाऱ्या टप्प्याच्या अखेरीस याहून ही अधिक पटीने नोकऱ्या निर्माण होतील, अशी अपेक्षाही अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.ट्रकचालक, टॅलीमेनचा समावेशच्या नोकऱ्या विविध गटातील, विविध पात्रता धारण करणाऱ्या व अनुभवाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर असलेल्या लोकांसाठीही असणार आहेत. आवश्यक ती पात्रता बाळगणाऱ्या प्रकल्पबाधित उमेदवारांना बीएमसीटीकडून प्राधान्य देण्यात येणार आहे. बीएमसीटीच्या कंत्राटदारांनाही तसेच करण्याचा सल्ला दिला जाणार असून या नोकऱ्यांमध्ये ट्रक चालक, टॅलीमेन व लेशिन वर्कर्सचा समावेश आहे. बीएमसीटीने कामगार भरतीमध्ये पारदर्शकता धोरणाला अनुसरुन सर्वच राजकीय पक्षांशी संपर्क साधून भरती प्रक्रियेची स्पष्टपणे कल्पना दिली आहे. टर्मिनलचे काम वेळापत्रकानुसार सुरु होण्याचे महत्त्वही राजकीय पक्षांना समजावून दिले असल्याचे प्रकल्पाचे म्हणणे आहे. चौथे कंटेनर टर्मिनल सुरु होत असल्याने सध्या अत्यंत गरजेच्या साधनांची वाढ साधणे शक्य होणार असून त्यातून परिसरात रोजगारनिर्मितीही होणार आहे.च्मागील काही वर्षांत जेएनपीटी बंदरावर उतरणाऱ्या मालाच्या प्रमाणात फारशी वाढ होत नाही. त्याऐवजी गुजरातमधील बंदरावर मालाचा ओघ वाढला असून त्यामुळे उरणमधील नोकऱ्या आणि आर्थिक भरभराटीचे गणित कोलमडले आहे. भारतातील सर्वात मोठे कंटेनर टर्मिनल बंदर यशस्वी झाल्यास बीएमसीटीच्या माध्यमातून या भागातील सर्व प्रकारातील पात्रता असलेल्या व विविध वयोगटातील लोकांसाठी अनेक नोकऱ्या तयार होतील असा दावाही प्रकल्पाने केला आहे.