शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जे स डब्ल्युच्या जहाजातून अडकलेल्यांना काढण्यास सर्च ऑपरेशन सुरू; कोस्ट गार्ड हेलिकॉप्टरने सुरू केले ऑपरेशन

By राजेश भोस्तेकर | Updated: July 26, 2024 13:47 IST

रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट हवामान विभागाने दिल्याने मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत.

अलिबाग : अलिबागच्या कुलाबा किल्ला परिसरात गुरुवारी २५ जुलै रोजी अलिबाग येथून जयगड पोर्टकडे जे एस डब्ल्यू कंपनीचे मालवाहू जहाज भरकटले होते. नांगर टाकून हे जहाज थांबवले होते. साधारण १८ तासाहून अधिक काळ यात १४ खलाशी अडकले होती. या खलाशीना सुखरूप काढण्याचे सर्च ऑपरेशन सुरू झाले आहे. कोस्ट गार्ड च्या हेलिकॉप्टर चोपरच्या सहाय्याने हे ऑपरेशन सुरू झाले आहे. 

रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट हवामान विभागाने दिल्याने मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. समुद्रही खवळलेला असल्याने अलिबाग येथून जयगड पोर्टवर माल घेऊन निघालेली जे एस डब्लू कंपनीची मालवाहू बार्ज भरकटल्याने कुलाबा किल्ल्याजवळ अडकला आहे. यात कोणतीही दुर्घटना घडलेली नसली तरी बार्ज आणि त्यातील अडकलेल्या १४ जणांना काढण्यासाठी जिल्हा प्रशासन, कोस्ट गार्ड आणि कंपनी प्रशासनातर्फे प्रयत्न सुरू केले आहेत. बोटीचा नांगर टाकून बोट ही समुद्रात थांबविण्यात आलेली होती.

जहाज मधील १४ खलाशी हे १८ तासाहून अधिक काळ अडकले होते. सकाळी नऊ वाजल्यानंतर कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरने सर्च ऑपरेशन सुरू करून खलाशी यांना सुखरूप काढण्यात येत आहे. खलाशी याना समुद्र किनारी आणल्यानंतर कंपनी प्रशासनातर्फे पाणी, खाण्याच्या वस्तू दिल्या जात आहे. जिल्हा पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासन ही या सर्च ऑपरेशन मध्ये सहभागी झाले आहे.