शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

आक्षी येथील शिलालेखाचे जतन करा; ग्रामस्थांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 00:45 IST

मराठीतील देशातील पहिला शिलालेख; ग्रामपंचायतीमार्फत पुरातत्त्व विभाग, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

- निखिल म्हात्रे अलिबाग : तालुक्यातील आक्षी येथे असलेल्या देशातील मराठी भाषेतील पहिल्या शिलालेखाचे जतन करण्यासाठी ग्रामपंचायत आग्रही आहे. मात्र, पुरातत्त्व विभागाकडून या बाबीकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने शिलालेख आजही रस्त्याच्या कडेला इतिहासाची साक्ष देत आहे. शिलालेखाला सुरक्षित ठिकाणी ठेवून त्याचे जतन करण्यास परवानगी मिळावी, यासाठी ग्रामपंचायतीमार्फत पुरातत्त्व विभाग, जिल्हाधिकारी आणि रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे; परंतु कोणत्याच यंत्रणेला या शिलालेखाबाबत अभिमान नसल्याने नाराजीचा सूर आहे.आक्षी गावामध्ये दोन शिलालेख आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हे शिलालेख उघड्यावर असल्याने त्यांनी अनेक उन्हाळे व पावसाळे पाहिले आहेत. शिलालेखावरील मजकूर अस्पष्ट होऊ नये, यासाठी ग्रामपंचायत प्रशासन प्रयत्न करीत आहे. या शिलालेखाचा अभ्यास करण्यासाठी विविध ठिकाणाहून अभ्यासक येत असतात. मात्र, त्यांना रस्त्यावरच उभे राहून या शिलालेखाचे परीक्षण करावे लागत आहे. रस्त्यावर सतत असणाºया रहदारीमुळे अभ्यासकांना अभ्यास करताना अडचणी येत आहेत. आक्षी स्तंभलेख ते समुद्रकिनाºयावरील जाणाºया रस्त्याच्या बाजूलाच इलेक्ट्रिकच्या डीपीखाली उभा आहे. तेथे जागाही अपुरी असल्याने त्या परिसरात ग्रामपंचायतीला सुशोभीकरणही करता येत नाही. मात्र, या शिलालेखाचा परिसर नेहमीच ग्रामपंचायत प्रशासनाकडून स्वच्छ ठेवण्यात येत आहे. याबरोबरच शिलालेखाची माहिती देणारे फलकही लावण्यात आले आहेत. याबाबत रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.सुशोभीकरणाची गरजमराठी भाषेतील पहिला शिलालेख असल्याने शासनाने त्याचे संवर्धन करण्यासाठी परवानगी देणे गरजेचे आहे.शासनाने परवानगी दिल्यास या शिलालेखाचे तत्काळ सुशोभीकरण करण्यात येईल. त्यामुळे शासनाने आमच्या मागणीची दखल घेऊन सुशोभीकरणाला परवानगी द्यावी, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.आक्षी गावातील शिलालेख हे मराठी भाषेतील पहिले शिलालेख असल्याने त्याची जबाबदारी आमच्यावर आहे. त्याच्या सुशोभीकरणासाठी साईनगर परिसरात दगडांचे कोरीव काम करून बांधकाम करण्यात आले आहे.पुरातत्त्व विभागाची परवानगी मिळाली तर या शिलालेखाचे जतन करणे शक्य होणार आहे. यासाठी ग्रामपंचायतीमार्फत सुशोभीकरणाची परवानगी मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय रायगड, जिल्हा परिषद रायगड, पुरातत्त्व विभागाकडे लोखी पत्राद्वारे मागणी केली आहे, असे ग्रामपंचायतीचे सरपंच नंदकुमार वाळंज यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.