शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

आक्षी येथील शिलालेखाचे जतन करा; ग्रामस्थांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 00:45 IST

मराठीतील देशातील पहिला शिलालेख; ग्रामपंचायतीमार्फत पुरातत्त्व विभाग, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

- निखिल म्हात्रे अलिबाग : तालुक्यातील आक्षी येथे असलेल्या देशातील मराठी भाषेतील पहिल्या शिलालेखाचे जतन करण्यासाठी ग्रामपंचायत आग्रही आहे. मात्र, पुरातत्त्व विभागाकडून या बाबीकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने शिलालेख आजही रस्त्याच्या कडेला इतिहासाची साक्ष देत आहे. शिलालेखाला सुरक्षित ठिकाणी ठेवून त्याचे जतन करण्यास परवानगी मिळावी, यासाठी ग्रामपंचायतीमार्फत पुरातत्त्व विभाग, जिल्हाधिकारी आणि रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे; परंतु कोणत्याच यंत्रणेला या शिलालेखाबाबत अभिमान नसल्याने नाराजीचा सूर आहे.आक्षी गावामध्ये दोन शिलालेख आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हे शिलालेख उघड्यावर असल्याने त्यांनी अनेक उन्हाळे व पावसाळे पाहिले आहेत. शिलालेखावरील मजकूर अस्पष्ट होऊ नये, यासाठी ग्रामपंचायत प्रशासन प्रयत्न करीत आहे. या शिलालेखाचा अभ्यास करण्यासाठी विविध ठिकाणाहून अभ्यासक येत असतात. मात्र, त्यांना रस्त्यावरच उभे राहून या शिलालेखाचे परीक्षण करावे लागत आहे. रस्त्यावर सतत असणाºया रहदारीमुळे अभ्यासकांना अभ्यास करताना अडचणी येत आहेत. आक्षी स्तंभलेख ते समुद्रकिनाºयावरील जाणाºया रस्त्याच्या बाजूलाच इलेक्ट्रिकच्या डीपीखाली उभा आहे. तेथे जागाही अपुरी असल्याने त्या परिसरात ग्रामपंचायतीला सुशोभीकरणही करता येत नाही. मात्र, या शिलालेखाचा परिसर नेहमीच ग्रामपंचायत प्रशासनाकडून स्वच्छ ठेवण्यात येत आहे. याबरोबरच शिलालेखाची माहिती देणारे फलकही लावण्यात आले आहेत. याबाबत रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.सुशोभीकरणाची गरजमराठी भाषेतील पहिला शिलालेख असल्याने शासनाने त्याचे संवर्धन करण्यासाठी परवानगी देणे गरजेचे आहे.शासनाने परवानगी दिल्यास या शिलालेखाचे तत्काळ सुशोभीकरण करण्यात येईल. त्यामुळे शासनाने आमच्या मागणीची दखल घेऊन सुशोभीकरणाला परवानगी द्यावी, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.आक्षी गावातील शिलालेख हे मराठी भाषेतील पहिले शिलालेख असल्याने त्याची जबाबदारी आमच्यावर आहे. त्याच्या सुशोभीकरणासाठी साईनगर परिसरात दगडांचे कोरीव काम करून बांधकाम करण्यात आले आहे.पुरातत्त्व विभागाची परवानगी मिळाली तर या शिलालेखाचे जतन करणे शक्य होणार आहे. यासाठी ग्रामपंचायतीमार्फत सुशोभीकरणाची परवानगी मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय रायगड, जिल्हा परिषद रायगड, पुरातत्त्व विभागाकडे लोखी पत्राद्वारे मागणी केली आहे, असे ग्रामपंचायतीचे सरपंच नंदकुमार वाळंज यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.