शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

१२ कोटींचे सांबरकुंड धरण दोन हजार कोटींवर; ४० वर्षे अलिबागकरांना फक्त आश्वासनांचे पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 07:57 IST

अजूनही हे धरण कागदावरच असून आगामी विधानसभा निवडणुकांत हा मुद्दा पुन्हा गाजण्याची शक्यता

अलिबाग : गेली चाळीस वर्षे प्रत्येक निवडणुकीत प्रस्तावित सांबरकुंड धरणाच्या ‘आश्वासना’चे पाणी अलिबागकरांना पाजले जात असून सुरुवातीला बारा कोटींच्या खर्चाचे हे धरण आता दोन हजार कोंटींच्या घरात पोहोचले आहे. अजूनही हे धरण कागदावरच असून आगामी विधानसभा निवडणुकांत हा मुद्दा पुन्हा गाजण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

अलिबाग तालुक्यातील रामराज, महान परिसरात सांबरकुंड मध्यम प्रकल्प प्रस्तावित आहे. रायगड जिल्ह्यात एकूण २८ धरणे असून त्यांची जलसाठा साठवणूक क्षमता ६५ दलघमी इतकी आहे. असली तरी अनेक धरणे जुनी झाल्याने गाळात रुतली आहेत. दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातील लोकसंख्या आता २६ लाखांवर पोहोचल्याने जलसाठा अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे नवीन धरणाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून जोर धरू लागली आहे. अलिबागकरांची तहान भागवण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या सांबरकुंड धरणाची मागणी निवडणुका आल्या की चर्चेत येते. मुळात हे धरण भूसंपादन प्रक्रियेतच अडकून पडले आहे. मागील पाच वर्षांत दोन सरकारे आली. त्यांनीही ही प्रक्रिया पूर्ण करून तातडीने धरण पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. पण दोन्ही सरकारांकडून निराशा पदरी पडल्याचे मत व्यक्त होत आहे.

सांबरकुंड धरणाबाबत शेतकऱ्यांसोबत अनेक बैठका झाल्या. धरणग्रस्तांचा धरणाला विरोध नाही. मात्र, वाढीव मोबदला हवा हा मुद्दा आहे. त्याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर केलेला आहे - मुकेश चव्हाण, प्रांताधिकारी, अलिबाग.

धरणग्रस्तांच्या मागणीवर तोडगा निघेना

सांबरकुंड धरणग्रस्त यांना मिळणारा मोबदला २०१३ च्या निवड्यानुसार मंजूर झाला असून तो घेण्यास धरणग्रस्तांचा विरोध आहे. 

नव्या भूसंपादन कायद्यानुसार मोबदला द्यावा, अशी त्यांची मागणी आहे. मात्र या मागणीचा प्रस्ताव हा शासन दरबारी धूळखात पडून आहे. 

टॅग्स :alibaugअलिबागDamधरण