शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

१२ कोटींचे सांबरकुंड धरण दोन हजार कोटींवर; ४० वर्षे अलिबागकरांना फक्त आश्वासनांचे पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 07:57 IST

अजूनही हे धरण कागदावरच असून आगामी विधानसभा निवडणुकांत हा मुद्दा पुन्हा गाजण्याची शक्यता

अलिबाग : गेली चाळीस वर्षे प्रत्येक निवडणुकीत प्रस्तावित सांबरकुंड धरणाच्या ‘आश्वासना’चे पाणी अलिबागकरांना पाजले जात असून सुरुवातीला बारा कोटींच्या खर्चाचे हे धरण आता दोन हजार कोंटींच्या घरात पोहोचले आहे. अजूनही हे धरण कागदावरच असून आगामी विधानसभा निवडणुकांत हा मुद्दा पुन्हा गाजण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

अलिबाग तालुक्यातील रामराज, महान परिसरात सांबरकुंड मध्यम प्रकल्प प्रस्तावित आहे. रायगड जिल्ह्यात एकूण २८ धरणे असून त्यांची जलसाठा साठवणूक क्षमता ६५ दलघमी इतकी आहे. असली तरी अनेक धरणे जुनी झाल्याने गाळात रुतली आहेत. दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातील लोकसंख्या आता २६ लाखांवर पोहोचल्याने जलसाठा अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे नवीन धरणाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून जोर धरू लागली आहे. अलिबागकरांची तहान भागवण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या सांबरकुंड धरणाची मागणी निवडणुका आल्या की चर्चेत येते. मुळात हे धरण भूसंपादन प्रक्रियेतच अडकून पडले आहे. मागील पाच वर्षांत दोन सरकारे आली. त्यांनीही ही प्रक्रिया पूर्ण करून तातडीने धरण पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. पण दोन्ही सरकारांकडून निराशा पदरी पडल्याचे मत व्यक्त होत आहे.

सांबरकुंड धरणाबाबत शेतकऱ्यांसोबत अनेक बैठका झाल्या. धरणग्रस्तांचा धरणाला विरोध नाही. मात्र, वाढीव मोबदला हवा हा मुद्दा आहे. त्याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर केलेला आहे - मुकेश चव्हाण, प्रांताधिकारी, अलिबाग.

धरणग्रस्तांच्या मागणीवर तोडगा निघेना

सांबरकुंड धरणग्रस्त यांना मिळणारा मोबदला २०१३ च्या निवड्यानुसार मंजूर झाला असून तो घेण्यास धरणग्रस्तांचा विरोध आहे. 

नव्या भूसंपादन कायद्यानुसार मोबदला द्यावा, अशी त्यांची मागणी आहे. मात्र या मागणीचा प्रस्ताव हा शासन दरबारी धूळखात पडून आहे. 

टॅग्स :alibaugअलिबागDamधरण