शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रायगड जिल्ह्यात जीवघेण्या व्हायरसची अफवा, परप्रांतीयांमधून संक्रमण होत असल्याची चर्चा, नागरिक भयभीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 20:22 IST

Raigad News: आक्षी-साखर गावामध्ये माणस मरत आहेत, अशी अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये भातीचे वातावरण आहे.

रायगड - अलिबाग तालुक्यात गॅस्ट्राेने दाेघांचा बळी घेतला तर अन्य १८ जण सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. यामध्ये परप्रांतीयांचा समावेश असल्याने यांनीच काेणता तरी वेगळा राेग आणल्याने आक्षी-साखर गावामध्ये माणस मरत आहेत, अशी अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये भातीचे वातावरण आहे. (Rumors of deadly virus in Akshi Village Raigad district, talk of infection from foreigners, citizens scared)

आक्षी-साखर परिसरामध्ये मासेमारी व्यवसाय जाेरात चालताे. या ठिकाणी परप्रांतीय नागरिक माेठ्या संख्येने स्थानिकांच्या बाेटीवर कामाला आहेत. काेराेनाचे सावट, विविध नैसर्गिक वादळांचा फटका बसल्याने मासेमारी व्यवसाय डबघाईला आला आहे. पावसाळ्यात मासेमारी व्यवसाय बंद असताे. आता ताे बऱ्यापैकी सुरू झाला आहे. त्यामुळे परप्रांतात गेलेले मजूर पुन्हा परतले आहेत. १९ ते २१ सप्टेंबर या कालावधीत तब्बल २० रुग्ण गॅस्ट्राेच्या आजाराने त्रस्त झाले. त्यांच्यावर अलिबागच्या सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात येत असताना दाेघांचा मृत्यू झाला हाेता. या प्रकारानंतर २३ सप्टेंबर राेजी सकाळपासूनच आक्षी-साखरमध्ये काेणता तरी राेग आला असून त्यामुळे माणसे मरत आहेत, असल्याची अफवा पसरल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, तसेच परप्रांतातील मजुरांमध्ये या रोगाचे संक्रमण झाल्याच्या चर्चांना उधाण आले.

बाेटीवर काम करण्यासाठी दरवर्षी नवीन माणसे येत असतात. कधी-कधी त्यांना हवामान आणि बाेटीवरील वास्तव्य रुचत नाही. काही आपल्या गावी परत जातात. गावात कसलाच व्हायरस आलेला नाही. नागरिकांनी अफवा पसरवू नका आणि अफवांवर विश्वासही ठेवू नका.-कैलास चाैलकर, काेळी समाज, माजी अध्यक्ष

गावात कसलाही व्हायरस आलेला नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. गावात काहींना त्रास झाला. तशी घटना मुंबई येथील मडमध्येही घडली आहे.-आनंद बुरांडे, उपसरपंच, आक्षीगावात काेणताही नवीन रुग्ण सापडला नाही अथवा काेणाचा मृत्यूही झालेला नाही. व्हायरस पसरल्याची अफवा आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका. आपल्या तब्येतीची काळजी घ्या.- डाॅ. अभिजित घासे, आराेग्य अधिकारी, अलिबाग 

टॅग्स :RaigadरायगडHealthआरोग्य