शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
4
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
5
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
6
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
7
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
8
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
9
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
10
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
11
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
12
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
13
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
14
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
15
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
16
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
17
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
18
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
19
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

अलिबाग, मुरुडमधील रस्त्यांची चाळण

By admin | Updated: October 7, 2016 05:30 IST

अलिबाग, रेवदंडा आणि मुरुडमधील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि मुरु ड या दोन तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था

 बोर्ली-मांडला /मुरुड : अलिबाग, रेवदंडा आणि मुरुडमधील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि मुरु ड या दोन तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना रस्त्याऐवजी खड्ड्यांतून मार्ग काढण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे. ५० किमीच्या प्रवासासाठी तब्बल चार तासांचा अवधी लागत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.अलिबाग ते मुरु ड या रस्त्यासाठी कोट्यवधी रु पयांचा निधी खर्च करूनसुद्धा हा निधी पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जात आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याला याचे सोयरसुतक नाही. अलिबाग हे रायगड जिल्ह्याच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे. या ठिकाणी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, रायगड जिल्हा परिषद आदी अनेक शासकीय निमशासकीय कार्यालये तसेच महाविद्यालये आहेत. या ठिकाणी विविध कामासाठी जिल्हाभरातील नागरिक येत असतात. ठिकठिकाणी डांबर व खडीने खड्डे भरून त्याची मलमपट्टी करण्यात आली, मात्र जून महिन्यात वरुणराजाचे आगमन होताच संपूर्ण रस्त्यावर पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे सर्वत्र खड्डे पडण्यास सुरवात झाली. मुसळधार पावसामुळे तसेच अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे लहान लहान खड्ड्यांनी धोक्याचे स्वरूप घेतले आहे. अलिबाग ते रेवदंडा या रस्त्याची तर अक्षरश: चाळण झाली आहे. यामुळे येथून प्रवास करणे जिकिरीचे आहे. अलिबाग-रेवदंडा मार्गावरील आक्षी ते नागाव खारगल्ली त्याचप्रमाणे बेलकडे फाटा ते सहाण मार्गे नागाव हा रस्ता खड्ड्यांमुळे दिसेनासा झाला आहे. दिवसेंदिवस हा रस्ता बिकट होऊन जीवघेणा बनत आहे. वर्षापूर्वी अलिबाग-रेवदंडा रस्त्यासाठी दहा कोटी रु पये मंजूर झाले असल्याचे अलिबाग बांधकाम प्रभारी अभियंता प्रल्हाद जाधव यांनी सांगितले. त्याप्रमाणे आमदार सुभाष पाटील यांच्या निधीतून कोट्यवधी रु पये खर्च करून मुरु ड तालुक्यातील साळाव ते मुरु ड दरम्यान धोकादायक असणाऱ्या रस्त्याचे रु ंदीकरण तसेच काही ठिकाणी रस्त्यावर असणारे खड्डे बुजवून कार्पेट टाकण्यात आले होते मात्र जूनच्या पहिल्याच पावसात रस्त्यावरील कार्पेट निघून जाऊन त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. नव्याने ॅयासाठी निविदा काढून रस्त्याच्या कामाला डिसेंबरमध्ये सुरु वात केली जाईल, असे जाधव म्हणाले.(वार्ताहर)पालकमंत्र्यांनी रायगडमधील रस्त्यांची पाहणी करावीच्नागोठणे : रायगड जिल्ह्यात कोठेही गेलो तरी स्थानिकांना आणि प्रवाशांना खड्ड्यांच्या त्रासाला सामोरे जायची वेळ वाहनचालकांवर येत आहे. रायगडचे पालकमंत्री प्रकाश महेता यांनी मुंबईतून एकदा वेळ काढून रायगडच्या पंधराही तालुक्यात फिरण्यासाठी रस्ते पाहणीचा विशेष दौरा शक्य असल्यास संबंधित खात्याच्या मंत्री महोदयांसमवेत आयोजित करावा, अशी मागणी माजी सरपंच तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते फरमान दफेदार यांनी केली आहे. रायगड जिल्ह्याला सध्या खड्डेमय रस्त्यांनी वेढले आहे.च्खड्ड्यांच्या विळख्यातून मुंबई-गोवा महामार्गही सुटलेला नाही. सध्या वडखळपासून अलिबागमार्गे मुरुडकडे जाणाऱ्या रस्त्यालाही ग्रहण लागले आहे. येथून प्रवास करताना वाहनचालकांच्या नाकी नऊ येत आहे. जिल्ह्यात कोठेही जायचे असेल, तर खड्डेमय रस्त्यांमुळे इच्छित स्थळी वेळेत जाता येत नाही. पावसामुळे रस्त्यावरील खड्डे भरता येत नाहीत, हे कारण सांगितले जात असले तरी पावसाने उघडीप दिल्यानंतर सुद्धा खड्डे भरायची तसदी घेतली जात नसल्याचे दफेदार यांचे म्हणणे आहे.