शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
2
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
3
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4
केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
5
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
6
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
7
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
8
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
9
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया
10
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
11
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
12
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
13
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
14
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
15
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
16
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
17
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
18
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
19
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
20
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर

अलिबाग, मुरुडमधील रस्त्यांची चाळण

By admin | Updated: October 7, 2016 05:30 IST

अलिबाग, रेवदंडा आणि मुरुडमधील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि मुरु ड या दोन तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था

 बोर्ली-मांडला /मुरुड : अलिबाग, रेवदंडा आणि मुरुडमधील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि मुरु ड या दोन तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना रस्त्याऐवजी खड्ड्यांतून मार्ग काढण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे. ५० किमीच्या प्रवासासाठी तब्बल चार तासांचा अवधी लागत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.अलिबाग ते मुरु ड या रस्त्यासाठी कोट्यवधी रु पयांचा निधी खर्च करूनसुद्धा हा निधी पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जात आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याला याचे सोयरसुतक नाही. अलिबाग हे रायगड जिल्ह्याच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे. या ठिकाणी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, रायगड जिल्हा परिषद आदी अनेक शासकीय निमशासकीय कार्यालये तसेच महाविद्यालये आहेत. या ठिकाणी विविध कामासाठी जिल्हाभरातील नागरिक येत असतात. ठिकठिकाणी डांबर व खडीने खड्डे भरून त्याची मलमपट्टी करण्यात आली, मात्र जून महिन्यात वरुणराजाचे आगमन होताच संपूर्ण रस्त्यावर पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे सर्वत्र खड्डे पडण्यास सुरवात झाली. मुसळधार पावसामुळे तसेच अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे लहान लहान खड्ड्यांनी धोक्याचे स्वरूप घेतले आहे. अलिबाग ते रेवदंडा या रस्त्याची तर अक्षरश: चाळण झाली आहे. यामुळे येथून प्रवास करणे जिकिरीचे आहे. अलिबाग-रेवदंडा मार्गावरील आक्षी ते नागाव खारगल्ली त्याचप्रमाणे बेलकडे फाटा ते सहाण मार्गे नागाव हा रस्ता खड्ड्यांमुळे दिसेनासा झाला आहे. दिवसेंदिवस हा रस्ता बिकट होऊन जीवघेणा बनत आहे. वर्षापूर्वी अलिबाग-रेवदंडा रस्त्यासाठी दहा कोटी रु पये मंजूर झाले असल्याचे अलिबाग बांधकाम प्रभारी अभियंता प्रल्हाद जाधव यांनी सांगितले. त्याप्रमाणे आमदार सुभाष पाटील यांच्या निधीतून कोट्यवधी रु पये खर्च करून मुरु ड तालुक्यातील साळाव ते मुरु ड दरम्यान धोकादायक असणाऱ्या रस्त्याचे रु ंदीकरण तसेच काही ठिकाणी रस्त्यावर असणारे खड्डे बुजवून कार्पेट टाकण्यात आले होते मात्र जूनच्या पहिल्याच पावसात रस्त्यावरील कार्पेट निघून जाऊन त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. नव्याने ॅयासाठी निविदा काढून रस्त्याच्या कामाला डिसेंबरमध्ये सुरु वात केली जाईल, असे जाधव म्हणाले.(वार्ताहर)पालकमंत्र्यांनी रायगडमधील रस्त्यांची पाहणी करावीच्नागोठणे : रायगड जिल्ह्यात कोठेही गेलो तरी स्थानिकांना आणि प्रवाशांना खड्ड्यांच्या त्रासाला सामोरे जायची वेळ वाहनचालकांवर येत आहे. रायगडचे पालकमंत्री प्रकाश महेता यांनी मुंबईतून एकदा वेळ काढून रायगडच्या पंधराही तालुक्यात फिरण्यासाठी रस्ते पाहणीचा विशेष दौरा शक्य असल्यास संबंधित खात्याच्या मंत्री महोदयांसमवेत आयोजित करावा, अशी मागणी माजी सरपंच तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते फरमान दफेदार यांनी केली आहे. रायगड जिल्ह्याला सध्या खड्डेमय रस्त्यांनी वेढले आहे.च्खड्ड्यांच्या विळख्यातून मुंबई-गोवा महामार्गही सुटलेला नाही. सध्या वडखळपासून अलिबागमार्गे मुरुडकडे जाणाऱ्या रस्त्यालाही ग्रहण लागले आहे. येथून प्रवास करताना वाहनचालकांच्या नाकी नऊ येत आहे. जिल्ह्यात कोठेही जायचे असेल, तर खड्डेमय रस्त्यांमुळे इच्छित स्थळी वेळेत जाता येत नाही. पावसामुळे रस्त्यावरील खड्डे भरता येत नाहीत, हे कारण सांगितले जात असले तरी पावसाने उघडीप दिल्यानंतर सुद्धा खड्डे भरायची तसदी घेतली जात नसल्याचे दफेदार यांचे म्हणणे आहे.