शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

लहरी हवामानामुळे भातशेतीला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 23:20 IST

कृषी विभाग सतर्क; रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता

- गणेश प्रभाळे दिघी : श्रीवर्धन तालुक्यासह जिल्ह्यात मंगळवार २४ सप्टेंबरपासून अचानक सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगडवासीयांची तारांबळ उडाली. यामुळे भातपिकाला नुकसानीचा तडाखा बसत आहे.यावर्षी जुलै महिन्यापासून समाधानकारक पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील भातशेती चांगल्या स्थितीत आहे. यामुळे उत्पन्न चांगले मिळेल म्हणून शेतकरी खूश होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू झालेल्या परतीच्या पावसाने तालुक्यात भातशेतीची दाणादाण उडाली आहे. पुढील पंधरवड्यात तयार होणारी भातशेती कापणीयोग्य असताना विजांच्या कडकडाटासह जोरदार पडणाऱ्या पावसामुळे उभे पीक धोक्यात आले आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. सप्टेंबर महिना अर्धाअधिक संपत आला तरी पाऊस थांबण्याची चिन्हे नाहीत. दिवसभरात व सायंकाळच्या सुमारास वर्दी देणारा परतीचा पाऊस सतत पडत असल्याने भातपिकाला नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव तसेच महाड तालुक्यातील चांगल्या भातशेतीला परतीच्या पावसाने धोका निर्माण केला आहे. समाधानकारक पावसामुळे भातशेती पसवून लोंबी वर आली आहे. अनेक ठिकाणी शेती कापण्यायोग्य झाली आहे. अशा परिस्थितीत परतीच्या पावसाने पिकलेली भातशेती आडवी करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसºया बाजूला वन्यप्राण्यांकडून अशा शेतीचे नुकसान केले जात आहे. वानर, डुक्कर शेतीमध्ये घुसून नुकसान करत आहेत. त्यामुळे बळीराजा धास्तावला होताच. त्या जोडीला परतीच्या पावसाने काही ठिकाणची भातशेती धोक्यात आली आहे.यावर्षी जुलै महिन्यापासून समाधानकारक पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील भातशेती चांगल्या स्थितीत आहे. यामुळे उत्पन्न चांगले मिळेल. सध्या समाधानकारक पावसामुळे भातशेती पसवून लोंबीवर आली आहे. भाताबरोबर असलेले बाजूचे गवत काढण्याचे (बेरणी) काम सुरू आहे. पुढील पंधरवड्यानंतरही भातशेती कापणीयोग्य होईल. मात्र, सध्या पडणाºया पावसाचा जोर कायम राहिल्यास आम्हा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल.- चंद्रकांत धुमाळ, मेंदडी कोंड, म्हसळालहरी हवामानामुळे भातशेतीवर रोगाच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसताच शेतकºयांना फवारणी करण्याची सूचना देतो. अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाल्यास भरपाई मिळण्यासाठी तशी माहिती अहवाल वरिष्ठांना देण्यात आला आहे.- शिवाजी भांडवलकर, तालुका कृषी अधिकारी, श्रीवर्धन