शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
2
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
3
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
4
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
5
धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ 
6
‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल
7
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
8
ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
9
जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...
10
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
11
Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
12
फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अ‍ॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
13
Video - "मी GPS लावला होता..."; हॉटेलमध्ये बायकोला रंगेहाथ पकडल्यावर ढसाढसा रडला नवरा
14
जागावाटपावरून महायुतीत तणाव! मुंबईत शिंदेसेनेला हव्यात १०० हून अधिक जागा, भाजपाचा प्लॅन बी तयार
15
वसंत मोरे मनसे कार्यालयात जाणार; ठाकरे बंधू युतीमुळे पुण्यात पदाधिकाऱ्यांमधील रुसवे फुगवे दूर
16
IPL ऑक्शनच्या दिवशीच परफेक्ट ऑडिशन! व्यंकटेश अय्यरचा SMAT स्पर्धेतील टी-२० सामन्यात मोठा धमाका
17
पश्चिम बंगालमध्ये लाखो मतदारांची नावं वगळली, SIRच्या मसुदा यादीतून धक्कादायक आकडेवारी समोर 
18
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
19
ICICI Prudential IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आज अखेरची संधी; GMP ₹३०० च्या पार, धमाकेदार लिस्टिंगचे संकेत
20
पीएम नरेंद्र मोदी जॉर्डनच्या दौऱ्यावर; भारतासाठी का महत्वाचा आहे हा देश? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

राजनाल्याचे पाणी शेतीसाठी मिळण्याची शक्यता कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:43 IST

टंचाईमुळे घेतला निर्णय; दोन हजार हेक्टर शेती ओलितापासून वंचित

कर्जत : तालुक्यातील पूर्व भाग हा राजनाला कालव्यामुळे ओलिताखाली आला आणि सधन झाला; पण यंदा पाण्याची कमतरता लक्षात घेता, कालव्याचे पाणी शेतीसाठी सोडण्याची शक्यता कमी आहे. त्यासाठी पाटबंधारे विभागाने आयोजित केलेल्या गावबैठका अवघ्या दोन तासांत उरकल्या.राज्यावरील दुष्काळाची भीती लक्षात घेता, आहे ते पाणी वाचवण्याचा निर्णय पाटबंधारे विभाग घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील राजनाला कालव्याचे पाणी सोडण्याबाबत आयोजित केलेल्या शेतकरी गाव बैठका पाटबंधारे विभागाने अक्षरश: गुंडाळल्या. पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. वैजनाथ, कडाव आणि गौरकामथ या तिन्ही बैठका केवळ १५ मिनिटांत आटोपण्यात आल्याने सर्व शेतकरी आक्र मक झाले.पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी शेतकºयांचे म्हणणे एकूण न घेता, १५ मिनिटांत बैठक संपवली. दरवर्षी १५ डिसेंबरपर्यंत पाणी सोडण्यात येईल, असे नेहमीचे उत्तर देऊन बोळवण केली; पण प्रत्यक्षात त्या तारखेला पाणी सोडले जात नाही, त्यामुळे शेतकºयांनी शेती करायची तरी कशी? त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी राजनालाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने अनेक ठिकाणी राजनाला खचला आहे. भगदाड पडले आहे, काही ठिकाणी गळती लागली आहे. तर ठोंबरवाडीमधील पाणी तलावात जाऊन ते पाणी रस्त्यावर, शेतामध्ये जाऊन नासाडी होत आहे.राजनाला कालवा हा आमच्या भागातील शेतकºयांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यामुळे शेतकºयांना विश्वासात न घेता कोणताही निर्णय पाटबंधारे विभाग घेऊ शकत नाही.- तानाजी चव्हाण, प्रगत शेतकरीआम्ही १५ डिसेंबर रोजी पाणी सोडत आहोत, असा गैरसमज शेतकºयांत पसरविण्यात आला आहे.- शशिकांत दाभेरे,उपअभियंता

टॅग्स :WaterपाणीFarmerशेतकरी