शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

सुधारित आराखडा तीन वर्षे रखडला

By admin | Updated: August 1, 2015 23:25 IST

शहराची टीपी (टाऊन प्लॅनिंग) स्किम मंजूर होऊन जवळपास सहा वर्षे होत आली आहेत. तरीही ही योजना पनवेल नगरपरिषदेकडे आजतागायत हस्तांतरित करण्यात आलेली नाही.

पनवेल : शहराची टीपी (टाऊन प्लॅनिंग) स्किम मंजूर होऊन जवळपास सहा वर्षे होत आली आहेत. तरीही ही योजना पनवेल नगरपरिषदेकडे आजतागायत हस्तांतरित करण्यात आलेली नाही. नगरविकास विभागाकडे या योजनेची फाईल धूळखात पडली आहे. हे कारण असले तरी याकरिता आवश्यक असलेला सुधारित आराखडाही गेल्या अडीच तीन वर्षांपासून रखडला आहे. याकरिता पालिकेने जवळपास ८५ लाख रुपये खर्च केले असले तरी अद्याप फक्त वीस टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.पनवेल शहराकरिता १७ एप्रिल १९६४ रोजी अधिसूचना जाहीर होऊन पहिली टीपी स्किम मंजूर झाली. त्यावेळी शहराची लोकसंख्या आणि नागरीकरण मर्यादित होते. गेल्या काही वर्षांत पनवेल शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली, त्यात आणखी भर पडणार आहे. शहरातील जुने वाडे आणि चाळी जमीनदोस्त करून त्या जागेवर टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या आहेत. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे दुकान, मॉल्स यांचाही विस्तार झाला आहेच. त्याचबरोबर व्यापारी संस्था, राष्ट्रीयकृत, खाजगी व सहकारी बँका आणि खाजगी कार्यालयांची संख्या वाढली आहे. त्यामुळेच शहरातील रस्ते, गटारे यांसारख्या सुविधांचा विस्तार आणि विकास करण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता नवीन टीपी स्किम प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला होता. आणि १३ आॅगस्ट २००९ रोजी अधिसूचना काढली. मात्र अधिसूचना काढण्यापलीकडे नगरविकास विभागाने काहीही केलेले नाही. नोव्हेंबर २०१२ पासून कामाला सुरुवातयाकरिता नगरचनाकार श्रीकांत देव यांच्या नेतृत्वाखाली अनुपमा कुमवणी, तेजल सुताडे, अरुण सुरवसे असे एकूण चार जण काम करीत आहेत. नोव्हेंबर २०१२ साली सुधारित आराखड्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र ते आजतागायत पूर्ण झालेले नाही. या कामाकरिता देव यांना जूनपर्यंत २२ लाखांपेक्षा जास्त रक्कम अदा करण्यात आली आहे. त्याचबरोबर कुमवणी यांना १५ लाख २१ हजार ६८८ रुपये देण्यात आले आहेत. उर्वरितांना अनुक्र मे ३ आणि २ लाख रुपये पालिकेने दिले आहेत. जवळपास ५० लाख रुपये वेतनापोटीच खर्च झाले आहेत. त्याचबरोबर इतर खर्च असे एकूण ८५ लाख रुपये खर्च झाला आहे. मात्र त्या तुलनेत काम काहीच झाले नसल्याची खंत लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.सुधारित आराखडा तयार करण्याचे काम गेली कित्येक महिने सुरू आहे. जे आजपर्यंत पूर्ण झाले नाही ते कधी होणार याबाबत कोणालाही काहीच माहिती नाही. मात्र यावर जवळपास ८५ लाख रुपये खर्च झाले असून लवकरच ही रक्कम कोटीच्या घरात जाईल, याबाबत प्रशासनाला काहीच पडलेले नाही. पैसे खर्च होऊ द्या पण त्या बदल्यात काम झाले पाहिजे, असे माझे म्हणणे आहे. आजच्या घडीला माझ्या माहितीप्रमाणे फक्त १० ते २० टक्के काम झाले आहे. - जयंत पगडे, नगरसेवक.