शहरं
Join us  
Trending Stories
1
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
2
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
3
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
4
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
5
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
6
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
7
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
8
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
9
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
10
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
11
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
12
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली
13
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
14
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
15
Navratri 2025: देवीचे वाहन सिंह आणि लक्ष्मीचे घुबड का? त्यामागे आहे महत्त्वपूर्ण कारण!
16
सोने-चांदीच्या दरात आज मोठी उलथापालथ; Gold झालं स्वस्त, पण चांदी अवाक्याच्या बाहेर
17
"पाकिस्तानचा संघ एवढा भारी आहे की..."; IND vs PAK FINAL आधी कर्णधार सलमानने भारताला डिवचले
18
VIRAL :'सोनार बनवणार नाही, चोर चोरणार नाही'! ट्रेनमध्ये विक्रेत्याचा शायराना अंदाज; तरुणाची स्टाईल पाहून पब्लिक झाली फॅन!
19
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
20
४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?

सुधारित आराखडा तीन वर्षे रखडला

By admin | Updated: August 1, 2015 23:25 IST

शहराची टीपी (टाऊन प्लॅनिंग) स्किम मंजूर होऊन जवळपास सहा वर्षे होत आली आहेत. तरीही ही योजना पनवेल नगरपरिषदेकडे आजतागायत हस्तांतरित करण्यात आलेली नाही.

पनवेल : शहराची टीपी (टाऊन प्लॅनिंग) स्किम मंजूर होऊन जवळपास सहा वर्षे होत आली आहेत. तरीही ही योजना पनवेल नगरपरिषदेकडे आजतागायत हस्तांतरित करण्यात आलेली नाही. नगरविकास विभागाकडे या योजनेची फाईल धूळखात पडली आहे. हे कारण असले तरी याकरिता आवश्यक असलेला सुधारित आराखडाही गेल्या अडीच तीन वर्षांपासून रखडला आहे. याकरिता पालिकेने जवळपास ८५ लाख रुपये खर्च केले असले तरी अद्याप फक्त वीस टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.पनवेल शहराकरिता १७ एप्रिल १९६४ रोजी अधिसूचना जाहीर होऊन पहिली टीपी स्किम मंजूर झाली. त्यावेळी शहराची लोकसंख्या आणि नागरीकरण मर्यादित होते. गेल्या काही वर्षांत पनवेल शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली, त्यात आणखी भर पडणार आहे. शहरातील जुने वाडे आणि चाळी जमीनदोस्त करून त्या जागेवर टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या आहेत. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे दुकान, मॉल्स यांचाही विस्तार झाला आहेच. त्याचबरोबर व्यापारी संस्था, राष्ट्रीयकृत, खाजगी व सहकारी बँका आणि खाजगी कार्यालयांची संख्या वाढली आहे. त्यामुळेच शहरातील रस्ते, गटारे यांसारख्या सुविधांचा विस्तार आणि विकास करण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता नवीन टीपी स्किम प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला होता. आणि १३ आॅगस्ट २००९ रोजी अधिसूचना काढली. मात्र अधिसूचना काढण्यापलीकडे नगरविकास विभागाने काहीही केलेले नाही. नोव्हेंबर २०१२ पासून कामाला सुरुवातयाकरिता नगरचनाकार श्रीकांत देव यांच्या नेतृत्वाखाली अनुपमा कुमवणी, तेजल सुताडे, अरुण सुरवसे असे एकूण चार जण काम करीत आहेत. नोव्हेंबर २०१२ साली सुधारित आराखड्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र ते आजतागायत पूर्ण झालेले नाही. या कामाकरिता देव यांना जूनपर्यंत २२ लाखांपेक्षा जास्त रक्कम अदा करण्यात आली आहे. त्याचबरोबर कुमवणी यांना १५ लाख २१ हजार ६८८ रुपये देण्यात आले आहेत. उर्वरितांना अनुक्र मे ३ आणि २ लाख रुपये पालिकेने दिले आहेत. जवळपास ५० लाख रुपये वेतनापोटीच खर्च झाले आहेत. त्याचबरोबर इतर खर्च असे एकूण ८५ लाख रुपये खर्च झाला आहे. मात्र त्या तुलनेत काम काहीच झाले नसल्याची खंत लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.सुधारित आराखडा तयार करण्याचे काम गेली कित्येक महिने सुरू आहे. जे आजपर्यंत पूर्ण झाले नाही ते कधी होणार याबाबत कोणालाही काहीच माहिती नाही. मात्र यावर जवळपास ८५ लाख रुपये खर्च झाले असून लवकरच ही रक्कम कोटीच्या घरात जाईल, याबाबत प्रशासनाला काहीच पडलेले नाही. पैसे खर्च होऊ द्या पण त्या बदल्यात काम झाले पाहिजे, असे माझे म्हणणे आहे. आजच्या घडीला माझ्या माहितीप्रमाणे फक्त १० ते २० टक्के काम झाले आहे. - जयंत पगडे, नगरसेवक.