शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

रेवस-करंजा बोटसेवा सुरक्षेच्या कारणास्तव बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 01:45 IST

जिल्हा प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा : समुद्रात सहा मीटर उंचीच्या लाटांची शक्यता; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

अलिबाग : अरबी समुद्रात चक्रिवादळाची निर्मिती झाल्याने बुधवार व गुरुवारी सहा मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली असून कोकण किनारपट्टीतील पालघर, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे व रत्नागिरी समुद्रकिनाऱ्यावरील मच्छीमारांना समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश देखील जिल्हा प्रशासनांना देण्यात आले. या पार्श्वभूमीवर किनारी भागातील सर्व गावांत सतर्कतेचा इशारा देऊन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आपत्ती निवारण कक्षाच्या सूत्रांनी दिली आहे.

वादळाच्या इशाºयाच्या पार्श्वभूमीवर, रेवस बंदरावर धोका दर्शविणारा तीन नंबरचा बावटा लावण्यात आला होता. रेवस येथे मोठ्या लाटादेखील अनुभवास आल्या. परिणामी, अलिबाग तालुक्यातील रेवस आणि उरण तालुक्यातील करंजा या दरम्यान पावसाळ््यातही चालू असणारी प्रवासी बोट सेवा बुधवारी सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आली होती. परिणामी, या प्रवासी सागरी मार्गाने उरण, पनवेल येथे दररोज नोकरीकरिता ये-जा करणारे व अन्य प्रवासी यांची मोठी गैरसोय झाली. या सर्व प्रवाशांना अलिबाग-पेण-पनवेल असा प्रवास करून उरण व मुंबईत पोहोचावे लागले.२४ तासांत मोठ्या पावसाची शक्यताच्रायगड जिल्ह्यात येत्या २४ तासांत मोठ्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाजहवामान खात्याने वर्तविला असून त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील संबंधित सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

टॅग्स :alibaugअलिबागRaigadरायगडWaterपाणीRainपाऊस