शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना : योजनेचा लाभच मिळत नसल्याने संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 01:35 IST

शासनाच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ न मिळाल्याने आडी गवळवाडीवरील शेतकऱ्यांनी महाड तहसीलदारांना निवेदन दिले आहे.

दासगाव - शासनाच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ न मिळाल्याने आडी गवळवाडीवरील शेतकऱ्यांनी महाड तहसीलदारांना निवेदन दिले आहे. तलाठी आणि ग्रामसेवक हे एकमेकांकडे बोट दाखवत शेतकऱ्यांना उत्तरे देत नसल्याने अखेर शेतक-यांनी हे निवेदन दिले आहे. याबाबत तहसीलदारांनी गंभीर दखल घेत योग्य कार्यवाही करण्याचे गट विकास अधिकारी यांना सूचित केले आहे.अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राज्यात १ डिसेंबर २०१८ पासून राबवण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार साधारण जानेवारी, फेब्रुवारीमध्ये या योजनेतील लाभार्थी शेतक-यांनी आपले अर्ज संबंधित शासकीय कर्मचाºयांकडे सुपूर्द केले. त्यातील काहींना या योजनेचा लाभ देखील प्राप्त झाला. मात्र महाड तालुक्यातील आडी गवळवाडी येथील शेतक-यांना या योजनेचा लाभच मिळाला नाही. या ग्रामपंचायतीमधील जवळपास ३२ शेतक-यांनी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले अर्ज दखल केले होते. मात्र यातील केवळ दोनच शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. ज्या शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही त्या शेतकºयांनी पुन्हा अर्ज करण्यासाठी प्रयत्न केले. अर्ज दाखल करण्याची तारीख २५ जून असून अर्ज आपल्याकडे नाहीत अशी उत्तरे तलाठी आणि ग्रामसेवकांकडून मिळत आहे. अर्ज या विहित वेळेत न मिळाल्यास अन्याय होण्याची भीती या शेतक-यांना आहे.याबाबत उर्वरित शेतक-यांनी ग्रामसेवक तायडे यांना विचारले असता त्यांनी तलाठ्यांकडे बोट दाखवले. मात्र हे काम ग्रामसेवकाकडे असल्याने आपला यात संबंध नाही असे उत्तर तलाठी पानसरे यांनी शेतकºयांना दिले. यामुळे या शेतकºयांनी थेट महाड सभापती दत्ताराम फळसकर यांची भेट घेतली. मात्र ग्रामसेवक तायडे याठिकाणी उपस्थित राहिले नाहीत.अखेर या ३२ शेतकºयांनी आपले निवेदन महाड तहसीलदार चंद्रसेन पवार यांना दिले.आडी गवळवाडी येथील शेतकºयांनी महाड तहसीलदार चंद्रसेन पवार यांना यामध्ये लक्ष घालावे अशी विनंती केली. तहसीलदार पवार यांनी तत्काळ महाड गट विकास अधिकारी प्रमोद गोडांबे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला आणि संबंधित ग्रामसेवकावर योग्य ती कार्यवाही व्हावी असे सूचित केले. पवार यांच्या या भूमिकेनंतर आडी गवळवाडी शेतकºयांनी गट विकास अधिकारी गोडांबे यांना देखील निवेदन दिले. यावेळी सरपंच विशाल चव्हाण, नथुराम कदम उपसरपंच, संतोष कांबळे, पांडुरंग कांबळे, सुनंदा खेडेकर, संतोष नटे, अंकिता महाडिक, सुषमा काते, ज्योती काते, आशा कांबळे, पार्वती मुरुडकर यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.आमच्या गावातील जवळपास ३२ शेतक-यांपैकी केवळ दोनच शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. याबाबत विचारणा केली असता ग्रामसेवक उत्तर देत नाही. शिवाय तलाठी देखील हे काम आपले नसल्याचे ग्रामस्थ विजय खेडेकर यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीRaigadरायगड