शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

आपत्ती निवारणासाठी दरडप्रवण गावे सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 02:44 IST

नैसर्गिक आपत्ती आल्यावर, ग्रामस्थांनी आपत्ती निवारणात्मक उपाययोजना आपापल्या स्तरावर हाती घेतल्यास जीवितहानी रोखण्यात अथवा कमी होण्यात यश येते

- जयंत धुळप अलिबाग : नैसर्गिक आपत्ती आल्यावर, ग्रामस्थांनी आपत्ती निवारणात्मक उपाययोजना आपापल्या स्तरावर हाती घेतल्यास जीवितहानी रोखण्यात अथवा कमी होण्यात यश येते, त्यामुळेच रायगड जिल्ह्यातील दरडप्रणव गावांतील ग्रामस्थ, तसेच सामाजिक संस्थांना आपत्ती निवारण प्रशिक्षण देण्याचा उपक्रम यंदा प्रथमच रायगड जिल्ह्यात हाती घेण्यात आल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे.रायगड जिल्ह्यातील दरडप्रणव पोलादपूर, महाड, माणगाव, तळा, रोहा, सुधागड, पनवेल, खालापूर आणि कर्जत या नऊ तालुक्यांतील गावांचे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण करण्यात आले. त्यात पोलादपूर तालुक्यात १५, महाड तालुक्यात ४९, तळा व माणगाव तालुक्यांत १४, रोहा व सुधागड तालुक्यांत १६ आणि पनवेल, कर्जत व खालापूर तालुक्यांत नऊ अशी १०३ गावे दरडप्रणव असल्याचे भूवैज्ञानिक सर्वेक्षण यंत्रणेने निश्चित केले.आपत्तीअंती स्थानिक समाज घटकांच्या माध्यमातूनच आपत्ती निवारण उपाययोजना कार्यान्वित करणे, या सूत्रानुसार या नऊ तालुक्यांतील दरडप्रणव गावांतील सरपंच, पोलीसपाटील, तलाठी, मुख्याध्यापक, शिक्षक आदी विविध प्रमुख समाज घटकांकरिता प्रशिक्षण, रायगड जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या माध्यमातून गेला महिनाभर करण्यात आले. प्रशिक्षण शिबिरांत पोलादपूर येथे ७५, महाड येथे २४५, माणगाव येथे ७०, रोहा येथे ८० आणि पनवेल येथे ४५ असे एकूण ५१५ विविध प्रमुख समाज घटक सहभागी झाले होते, असे पाठक यांनी पुढे सांगितले. प्रशिक्षणानंतर भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने शिफारस केल्यानुसार रचनात्मक, अरचनात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीस प्रारंभ केला असून, या प्रशिक्षणामुळे ग्रामस्थांना नवा आत्मविश्वास गवसला आहे.दरडी कोसळण्याच्या नैसर्गिक आपत्तीना आळा घालण्याकरिता भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात केलेल्या संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या अभ्यासानंतर ८४ गावे दरडप्रवण निश्चित केली होती. मात्र, यंदा केलेल्या सर्वेक्षणांती त्यामध्ये १९ गावांची वाढ होऊन आता दरडप्रणव गावांची संख्या १०३ झाली आहे. बेसुमार जंगलतोड, उत्खनन, डोंगराळ भागात झालेली बांधकामे यांच्यामुळे या दरडप्रवण गावांमध्ये वाढ झाल्याचा निष्कर्ष जिल्हा प्रशासनाचा आहे.>दरड कोसळण्यास महत्त्वाची कारणेकमी वेळेत ५०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस झाल्यास दरड कोसळण्याची शक्यता अधिकदरडप्रवण गावांमधील डोंगर उताराकडील डोंगर कापण्याचे प्रकारडोंगर उतारावर पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग नसणेझाडांची कत्तलग्रामस्थांचा सक्रिय सहभागनऊ तालुक्यांतील गावांचे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणसरपंच, पोलीस पाटील, तलाठी, मुख्याध्यापक, शिक्षक यांना प्रशिक्षणदरडप्रणव गावांच्या संख्येत १९ गावांची वाढ