शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

आपत्ती निवारणासाठी दरडप्रवण गावे सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 02:44 IST

नैसर्गिक आपत्ती आल्यावर, ग्रामस्थांनी आपत्ती निवारणात्मक उपाययोजना आपापल्या स्तरावर हाती घेतल्यास जीवितहानी रोखण्यात अथवा कमी होण्यात यश येते

- जयंत धुळप अलिबाग : नैसर्गिक आपत्ती आल्यावर, ग्रामस्थांनी आपत्ती निवारणात्मक उपाययोजना आपापल्या स्तरावर हाती घेतल्यास जीवितहानी रोखण्यात अथवा कमी होण्यात यश येते, त्यामुळेच रायगड जिल्ह्यातील दरडप्रणव गावांतील ग्रामस्थ, तसेच सामाजिक संस्थांना आपत्ती निवारण प्रशिक्षण देण्याचा उपक्रम यंदा प्रथमच रायगड जिल्ह्यात हाती घेण्यात आल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे.रायगड जिल्ह्यातील दरडप्रणव पोलादपूर, महाड, माणगाव, तळा, रोहा, सुधागड, पनवेल, खालापूर आणि कर्जत या नऊ तालुक्यांतील गावांचे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण करण्यात आले. त्यात पोलादपूर तालुक्यात १५, महाड तालुक्यात ४९, तळा व माणगाव तालुक्यांत १४, रोहा व सुधागड तालुक्यांत १६ आणि पनवेल, कर्जत व खालापूर तालुक्यांत नऊ अशी १०३ गावे दरडप्रणव असल्याचे भूवैज्ञानिक सर्वेक्षण यंत्रणेने निश्चित केले.आपत्तीअंती स्थानिक समाज घटकांच्या माध्यमातूनच आपत्ती निवारण उपाययोजना कार्यान्वित करणे, या सूत्रानुसार या नऊ तालुक्यांतील दरडप्रणव गावांतील सरपंच, पोलीसपाटील, तलाठी, मुख्याध्यापक, शिक्षक आदी विविध प्रमुख समाज घटकांकरिता प्रशिक्षण, रायगड जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या माध्यमातून गेला महिनाभर करण्यात आले. प्रशिक्षण शिबिरांत पोलादपूर येथे ७५, महाड येथे २४५, माणगाव येथे ७०, रोहा येथे ८० आणि पनवेल येथे ४५ असे एकूण ५१५ विविध प्रमुख समाज घटक सहभागी झाले होते, असे पाठक यांनी पुढे सांगितले. प्रशिक्षणानंतर भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने शिफारस केल्यानुसार रचनात्मक, अरचनात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीस प्रारंभ केला असून, या प्रशिक्षणामुळे ग्रामस्थांना नवा आत्मविश्वास गवसला आहे.दरडी कोसळण्याच्या नैसर्गिक आपत्तीना आळा घालण्याकरिता भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात केलेल्या संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या अभ्यासानंतर ८४ गावे दरडप्रवण निश्चित केली होती. मात्र, यंदा केलेल्या सर्वेक्षणांती त्यामध्ये १९ गावांची वाढ होऊन आता दरडप्रणव गावांची संख्या १०३ झाली आहे. बेसुमार जंगलतोड, उत्खनन, डोंगराळ भागात झालेली बांधकामे यांच्यामुळे या दरडप्रवण गावांमध्ये वाढ झाल्याचा निष्कर्ष जिल्हा प्रशासनाचा आहे.>दरड कोसळण्यास महत्त्वाची कारणेकमी वेळेत ५०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस झाल्यास दरड कोसळण्याची शक्यता अधिकदरडप्रवण गावांमधील डोंगर उताराकडील डोंगर कापण्याचे प्रकारडोंगर उतारावर पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग नसणेझाडांची कत्तलग्रामस्थांचा सक्रिय सहभागनऊ तालुक्यांतील गावांचे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणसरपंच, पोलीस पाटील, तलाठी, मुख्याध्यापक, शिक्षक यांना प्रशिक्षणदरडप्रणव गावांच्या संख्येत १९ गावांची वाढ