शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

आपत्ती निवारणासाठी दरडप्रवण गावे सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 02:44 IST

नैसर्गिक आपत्ती आल्यावर, ग्रामस्थांनी आपत्ती निवारणात्मक उपाययोजना आपापल्या स्तरावर हाती घेतल्यास जीवितहानी रोखण्यात अथवा कमी होण्यात यश येते

- जयंत धुळप अलिबाग : नैसर्गिक आपत्ती आल्यावर, ग्रामस्थांनी आपत्ती निवारणात्मक उपाययोजना आपापल्या स्तरावर हाती घेतल्यास जीवितहानी रोखण्यात अथवा कमी होण्यात यश येते, त्यामुळेच रायगड जिल्ह्यातील दरडप्रणव गावांतील ग्रामस्थ, तसेच सामाजिक संस्थांना आपत्ती निवारण प्रशिक्षण देण्याचा उपक्रम यंदा प्रथमच रायगड जिल्ह्यात हाती घेण्यात आल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे.रायगड जिल्ह्यातील दरडप्रणव पोलादपूर, महाड, माणगाव, तळा, रोहा, सुधागड, पनवेल, खालापूर आणि कर्जत या नऊ तालुक्यांतील गावांचे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण करण्यात आले. त्यात पोलादपूर तालुक्यात १५, महाड तालुक्यात ४९, तळा व माणगाव तालुक्यांत १४, रोहा व सुधागड तालुक्यांत १६ आणि पनवेल, कर्जत व खालापूर तालुक्यांत नऊ अशी १०३ गावे दरडप्रणव असल्याचे भूवैज्ञानिक सर्वेक्षण यंत्रणेने निश्चित केले.आपत्तीअंती स्थानिक समाज घटकांच्या माध्यमातूनच आपत्ती निवारण उपाययोजना कार्यान्वित करणे, या सूत्रानुसार या नऊ तालुक्यांतील दरडप्रणव गावांतील सरपंच, पोलीसपाटील, तलाठी, मुख्याध्यापक, शिक्षक आदी विविध प्रमुख समाज घटकांकरिता प्रशिक्षण, रायगड जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या माध्यमातून गेला महिनाभर करण्यात आले. प्रशिक्षण शिबिरांत पोलादपूर येथे ७५, महाड येथे २४५, माणगाव येथे ७०, रोहा येथे ८० आणि पनवेल येथे ४५ असे एकूण ५१५ विविध प्रमुख समाज घटक सहभागी झाले होते, असे पाठक यांनी पुढे सांगितले. प्रशिक्षणानंतर भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने शिफारस केल्यानुसार रचनात्मक, अरचनात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीस प्रारंभ केला असून, या प्रशिक्षणामुळे ग्रामस्थांना नवा आत्मविश्वास गवसला आहे.दरडी कोसळण्याच्या नैसर्गिक आपत्तीना आळा घालण्याकरिता भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात केलेल्या संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या अभ्यासानंतर ८४ गावे दरडप्रवण निश्चित केली होती. मात्र, यंदा केलेल्या सर्वेक्षणांती त्यामध्ये १९ गावांची वाढ होऊन आता दरडप्रणव गावांची संख्या १०३ झाली आहे. बेसुमार जंगलतोड, उत्खनन, डोंगराळ भागात झालेली बांधकामे यांच्यामुळे या दरडप्रवण गावांमध्ये वाढ झाल्याचा निष्कर्ष जिल्हा प्रशासनाचा आहे.>दरड कोसळण्यास महत्त्वाची कारणेकमी वेळेत ५०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस झाल्यास दरड कोसळण्याची शक्यता अधिकदरडप्रवण गावांमधील डोंगर उताराकडील डोंगर कापण्याचे प्रकारडोंगर उतारावर पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग नसणेझाडांची कत्तलग्रामस्थांचा सक्रिय सहभागनऊ तालुक्यांतील गावांचे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणसरपंच, पोलीस पाटील, तलाठी, मुख्याध्यापक, शिक्षक यांना प्रशिक्षणदरडप्रणव गावांच्या संख्येत १९ गावांची वाढ