शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

RDCC बँकेवर शेकापचा लाल बावटा, I.N.D.I.A च्या विजयाची मुहूर्तमेढ रायगडात!

By राजेश भोस्तेकर | Updated: September 17, 2023 13:49 IST

शेकापचे आमदार जयंत पाटील यांची विजयानंतर प्रतिक्रिया

राजेश भोस्तेकर, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग: विरोधकांनी मोर्चे बांधणी करूनही आमचा दणदणीत विजय झाला आहे. महा विकास आघाडी ही इंडिया आघाडीत विलीन झाली आहे. आम्हीही इंडिया आघाडीचे घटक असून ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणूक ही एकत्रित लढण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेवर मिळालेला विजय हा इंडियाचा पहिला विजय असून त्याची मुहूर्तमेढ रायगडमध्ये रोवली गेली आहे. जिल्हा बँकेत राजकारण न आणता तीस वर्ष सहकार्याच्या सोबतीने काम केल्याने हा विजय त्याचा असल्याचे मत शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी विजयानंतर व्यक्त केले आहे. 

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २०२३-२४ ते २०२८-२९ या पाच वर्षासाठी २१ संचालक मंडळासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. शेकाप, काँग्रेस, ठाकरे गट आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यात आली होती. २१ संचालक पैकी १८ संचालक हे बिनविरोध निवडून आले होते. तर तीन जागांसाठी शनिवारी १६ सप्टेंबर रोजी चार केंद्रात मतदान प्रक्रिया पूर्ण झाली होती. रविवारी अलिबाग ऍड दत्ता पाटील लॉ महाविद्यालयात मतमोजणी पार पडली. 

 इतर शेती सहकारी संस्था मतदार संघातून इंडिया आघाडी तर्फे आमदार बँकेचे माजी चेअरमन, आमदार जयंत पाटील तर भाजप तर्फे संतोष देशमुख यांच्यात लढत होती. महिला राखीव मतदार संघातून आघाडीच्या प्रिता चौलकर, मधुरा मलुटे तर भाजप तर्फे संगीता देशमुख, मनिषा पाठारे यांच्यात लढत आहे. आमदार जयंत पाटील हे ९४ मते घेऊन विजयी झाले तर विरोधक संतोष देशमुख यांना फक्त ५ मतावर समाधान मानावे लागले. प्रीती चौलकर याना ७०४ तर विरोधक संगीता देशमुख यांना २१ मते पडली. मधुरा मलुटे याना ६९९ तर मनिषा पाठारे  याना १७ मते पडली. तीनही जागेवर इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून आले. 

आर डी सी सी बँकेच्या माध्यमातून इंडिया आघाडीचा देशातील पहिलाच विजय झाला आहे. विजयी उमेदवारांची मिरवणूक अलिबाग शहरातून वाजत गाजत काढण्यात आली. यावेळी शेकापचा लाल झेंडा पुन्हा एकदा फडकताना पाहायला मिळाला. ठाकरे गटाचे हनुमंत जगताप हे सुद्धा या निवडणुकीत बिनविरोध निवडून आले आहे. यावेळी निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याचे आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.

इंडिया आघाडीची पंधरा दिवसांपूर्वीच बैठक झाली. या बैठकीत ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणूक एकत्रित लढण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे इंडियाच्या पहिल्याच विजयाची मुहूर्तमेढ ही रायगडात रोवली गेली आहे. बँकेची वाटचाल पाच हजार कोटींवर गेली आहे. पुढील काळात एकही कर्ज प्रकरण थकीत राहणार नाही असा प्रयत्न राहणार आहे. बँकेचा ओघ ७०० कोटी आहे. बँकेची १११ प्रकरणे थकीत आहेत. थकीत प्रकरणे मार्च अखेर पर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे. प्रशासन मध्ये आधुनिकीकरण करण्याचे काम केले आहे. कमीत कमी मनुष्यबळ पण काम अधिक हे धोरण अवलंबले आहे.-आमदार जयंत पाटील

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलRaigadरायगडbankबँक