शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

RDCC बँकेवर शेकापचा लाल बावटा, I.N.D.I.A च्या विजयाची मुहूर्तमेढ रायगडात!

By राजेश भोस्तेकर | Updated: September 17, 2023 13:49 IST

शेकापचे आमदार जयंत पाटील यांची विजयानंतर प्रतिक्रिया

राजेश भोस्तेकर, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग: विरोधकांनी मोर्चे बांधणी करूनही आमचा दणदणीत विजय झाला आहे. महा विकास आघाडी ही इंडिया आघाडीत विलीन झाली आहे. आम्हीही इंडिया आघाडीचे घटक असून ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणूक ही एकत्रित लढण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेवर मिळालेला विजय हा इंडियाचा पहिला विजय असून त्याची मुहूर्तमेढ रायगडमध्ये रोवली गेली आहे. जिल्हा बँकेत राजकारण न आणता तीस वर्ष सहकार्याच्या सोबतीने काम केल्याने हा विजय त्याचा असल्याचे मत शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी विजयानंतर व्यक्त केले आहे. 

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २०२३-२४ ते २०२८-२९ या पाच वर्षासाठी २१ संचालक मंडळासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. शेकाप, काँग्रेस, ठाकरे गट आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यात आली होती. २१ संचालक पैकी १८ संचालक हे बिनविरोध निवडून आले होते. तर तीन जागांसाठी शनिवारी १६ सप्टेंबर रोजी चार केंद्रात मतदान प्रक्रिया पूर्ण झाली होती. रविवारी अलिबाग ऍड दत्ता पाटील लॉ महाविद्यालयात मतमोजणी पार पडली. 

 इतर शेती सहकारी संस्था मतदार संघातून इंडिया आघाडी तर्फे आमदार बँकेचे माजी चेअरमन, आमदार जयंत पाटील तर भाजप तर्फे संतोष देशमुख यांच्यात लढत होती. महिला राखीव मतदार संघातून आघाडीच्या प्रिता चौलकर, मधुरा मलुटे तर भाजप तर्फे संगीता देशमुख, मनिषा पाठारे यांच्यात लढत आहे. आमदार जयंत पाटील हे ९४ मते घेऊन विजयी झाले तर विरोधक संतोष देशमुख यांना फक्त ५ मतावर समाधान मानावे लागले. प्रीती चौलकर याना ७०४ तर विरोधक संगीता देशमुख यांना २१ मते पडली. मधुरा मलुटे याना ६९९ तर मनिषा पाठारे  याना १७ मते पडली. तीनही जागेवर इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून आले. 

आर डी सी सी बँकेच्या माध्यमातून इंडिया आघाडीचा देशातील पहिलाच विजय झाला आहे. विजयी उमेदवारांची मिरवणूक अलिबाग शहरातून वाजत गाजत काढण्यात आली. यावेळी शेकापचा लाल झेंडा पुन्हा एकदा फडकताना पाहायला मिळाला. ठाकरे गटाचे हनुमंत जगताप हे सुद्धा या निवडणुकीत बिनविरोध निवडून आले आहे. यावेळी निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याचे आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.

इंडिया आघाडीची पंधरा दिवसांपूर्वीच बैठक झाली. या बैठकीत ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणूक एकत्रित लढण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे इंडियाच्या पहिल्याच विजयाची मुहूर्तमेढ ही रायगडात रोवली गेली आहे. बँकेची वाटचाल पाच हजार कोटींवर गेली आहे. पुढील काळात एकही कर्ज प्रकरण थकीत राहणार नाही असा प्रयत्न राहणार आहे. बँकेचा ओघ ७०० कोटी आहे. बँकेची १११ प्रकरणे थकीत आहेत. थकीत प्रकरणे मार्च अखेर पर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे. प्रशासन मध्ये आधुनिकीकरण करण्याचे काम केले आहे. कमीत कमी मनुष्यबळ पण काम अधिक हे धोरण अवलंबले आहे.-आमदार जयंत पाटील

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलRaigadरायगडbankबँक