शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
5
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
6
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
8
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
9
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
10
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
11
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
12
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
13
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
14
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
15
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
16
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
17
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
18
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
19
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
20
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार

रानसई धरणाची पातळी खालावली, उरणकरांवर भीषण पाणीटंचाईचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 02:28 IST

उरण तालुक्यातील सव्वा लाख लोकसंख्येच्या २६ ग्रामपंचायतींना पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या रानसई धरणाची पातळी प्रचंड प्रमाणात खालावली आहे.

- मधुकर ठाकूरउरण : उरण तालुक्यातील सव्वा लाख लोकसंख्येच्या २६ ग्रामपंचायतींना पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या रानसई धरणाची पातळी प्रचंड प्रमाणात खालावली आहे. धरणात २० मेपर्यंत पुरेल इतकाच पाण्याचा साठा शिल्लक आहे. १० दिवसांचाच पाण्याचा साठा शिल्लक असल्याने उरण तालुक्यातील नागरिकांवर भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यातच रानसई सहा आदिवासी वाड्यांना पाणीटंचाईने ग्रासले असून त्यापैकी दोन वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात असून टंचाईग्रस्त चिरनेर येथील दोन वाड्यांसाठी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी के लीअसल्याची माहिती उरण गटविकास अधिकारी नीलम गाडे यांनी दिली.फे ब्रुवारी, मार्च महिन्यापासूनच तालुक्यातील अनेक गावांना भीषण पाणीटंचाईने ग्रासले आहे. चाणजे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील करंजा गावात बारा पाडे असून गेल्या ३३ वर्षांपासून टंचाईने त्रस्त आहेत. गावातील नागरिकांना पाण्यासाठी १५ ते २० दिवसांपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. १५ ते २० दिवसांनंतरही फक्त एक तास मिळणारे पाणी अपुरे आणि दूषित असते. आलेले पाणी १५ दिवस पुरविण्यासाठी ड्रम, टाक्यामध्ये जमा करून ठेवले जाते. मात्र इतक्या दिवस साठवून ठेवण्यात आलेल्या पाण्यात जंतू, किडे जमा होतात. त्यामुळे साठवणूक केलेले पाणी दूषित होते. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. सरकार दरबारी उंबरठे झिजवून आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे करंजा येथील पाड्यांचा पाणीप्रश्न सुटला नाही. यामुळे कोंढरीपाडा येथील नागरिकांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकून निषेध व्यक्त केला होता, अशी माहिती येथील ग्रामस्थ विनायक पाटील यांनी दिली. तर करंजा गावातील पाणीटंचाई दूर करण्यात यावी, यासाठी जनवादी महिला संघटनेने उरण तहसीलदार कल्पना गोडे आणि गटविकास अधिकारी नीलम गाडे यांना भेट घेऊन निवेदन दिल्याची माहिती संजय ठाकूर यांनी दिली.सुमारे १०-१२ हजार लोकसंख्या असलेल्या केगाव ग्रा.पं.तील गावांनाही पाणीटंचाईने ग्रासले आहे. परिसरातील विहिरी, तलाव आणि बोअरवेल यांनी तळ गाठल्याने महिलांवर दूरवर जाऊन मिळेल तेथून पाणी आणावे लागत आहे. याआधी दोन दिवसाआड मिळणारे पाणी ६-७ दिवसानंतरही मिळेल क ी नाही याची शाश्वती राहिली नाही. पाण्याअभावी लग्न समारंभाबरोबरच आणि इतर कार्यक्रमांनाही फाटा देण्याची पाळी नागरिकांवर आली आहे. तसेच पाणीटंचाईच्या काळात लग्न जुळून आलीच तर त्या लग्नसराईसाठी सिलबंद बाटल्यांचे महागडे पाणी विकत घेण्याची पाळी यजमानांवर येते. एमआयडीसीकडूनच पुरेशा प्रमाणात, पुरेशा दाबाने आणि नियमित मागणीनुसार पाणीपुरवठा होत नसल्यानेच केगाववासीयांवर पाणीटंचाईचे सावट आल्याचे केगाव सरपंच राजेंद्र ठाकूर यांनी दिली. त्याशिवाय थेट विद्युत पंप लावून पाणी चोरी होत असल्याने पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होत आहे. केगावसाठी सध्या अडीच इंचाची असलेली पाइपलाइन सहा इंचापर्यंत वाढविण्यात यावी, याबाबत एमआयडीसी,लोकप्रतिनिधी, आमदार, खासदारांनाही साकडे घातले आहे. मात्र, त्यानंतरही मागणीकडे दुर्लक्षच होत असल्याने पाणीप्रश्न निकाली निघालेला नाही. मात्र, ग्रामपंचायत आणि एमआयडीसी परस्परांकडे बोटे दाखवून वेळ मारून नेत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातआहे.चिरनेर परिसरात अनेक गावांना सिडकोच्या हेटवणे धरणातून पाणीपुरवठा होत आहे. हेटवणे धरणातून पाणीपुरवठा होणाºया जलवाहिन्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी चोरी होत असल्याच्या तक्रारी आहेत. यामध्ये बिल्डर्स आणि टँकरमाफिया अधिक सक्रिय आहेत. या पाणी चोरीमध्ये सिडकोचे काही अधिकारीही सामील आहेत. आर्थिक फायद्यासाठी नागरिकांचे पाणी लांबविणाºया या अनधिकृत लॉबीमुळे चिरनेर परिसरातील काही गावांनाही येत्या काही दिवसात पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतील, अशी स्थिती आहे. राजिपच्या पुनाडे धरणातून उरण तालुक्यातील पूर्व भागातील पिरकोन, आवरे, सारडे, वशेणी, पाले, गोवठणे आदी दहा गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पुनाडे धरणाचीही पाण्याची पातळी खालावल्याने पुढील काही दिवसात या दहा गावांनाही पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.नागरिकांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी सध्या सिडकोच्या हेटवणे धरणातून दररोज सात एमएलडी पाणी घेतले जात असल्याची माहिती एमआयडीसी उरण विभागाचे उपअभियंता आर. डी. बिरंजे यांनी दिली. आठवड्यातील मंगळवार व शुक्रवार असे दोन दिवस पाणीपुरवठा खंडित करण्यात येत आहे.रानसईच्या सहा आदिवासी पाड्यांपैकी खैराची वाडी आणि भुºयाची वाडी अशा दोन वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर चिरनेर परिसरातील दोन वाड्यांची पाणीटंचाईची तक्रार असून त्यांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली असल्याची माहिती उरण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नीलम गाडे यांनी दिली. याव्यतिरिक्त तक्रार नसल्याचा दावा उरण पं. समितीकडून केला जात आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई