शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

गतवर्षीच्या तुलनेत पर्जन्यमानात वाढ

By admin | Updated: July 5, 2016 02:23 IST

यंदाच्या मान्सूनमध्ये ४ जुलैअखेर रायगड जिल्ह्यात एकूण १७ हजार १५९ मि.मी. पाऊस झाला असून जिल्ह्याचे हे सरासरी पर्जन्यमान यंदा १ हजार ७२.४५ मि.मी. आहे. गतवर्षी याच कालावधीत

- जयंत धुळप, अलिबाग

यंदाच्या मान्सूनमध्ये ४ जुलैअखेर रायगड जिल्ह्यात एकूण १७ हजार १५९ मि.मी. पाऊस झाला असून जिल्ह्याचे हे सरासरी पर्जन्यमान यंदा १ हजार ७२.४५ मि.मी. आहे. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात १४ हजार ४३५.४० मि.मी. पाऊस झाला होता. त्यावेळी सरासरी पर्जन्यमान ९०२.२१ मि.मी. होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्याच्या एकूण पर्जन्यमानात २ हजार ७२३.८० मि.मी.ने वाढ झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील एकूण २८ लघुपाटबंधारे धरणांपैकी ५० टक्के म्हणजे १४ धरणे तुडुंब भरुन वाहू लागली आहेत. २८ पैकी उर्वरित एक धरण ७५ टक्केपेक्षा अधिक, चार धरणे ५० ते ७५ टक्के, पाच धरणे २५ ते ५० टक्के तर चार धरणे २५ टक्क्यांपेक्षा कमी भरली असल्याची माहिती रायगड पाटबंधारे विभागाच्या कोलाड येथील कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.१०० टक्के भरलेल्या १४ लघुपाटबंधारे धरणांमध्ये, मुरुड तालुक्यातील फणसाड, तळा तालुक्यातील वावा, रोहा तालुक्यातील सुतारवाडी, सुधागड तालुक्यातील कोडगांव ,कवेळे आणि उन्हेरे, श्रीवर्धन तालुक्यातील कुडली, म्हसळा तालुक्यातील पाभरे आणि संदेरी, महाड तालुक्यातील खिंडवाडी, कोथुर्डे आणि खैरे तर खालापूर तालुक्यातील भिलवले या धरणांचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यातील या १४ धरणांमध्ये ४ जुलै रोजी किमान जलपातळी ५३ मीटर तर कमाल जलपातळी १४९ मीटर आहे. या सर्व धरणांची एकूण जलसंचय क्षमता ६८.२८६ दशलक्ष घनमीटर असून ४ जुलै रोजी या सर्व धरणांमध्ये संचित जलसाठा ४८.१९४ दशलक्ष घनमीटर झाला आहे. - पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर असलेल्या धरणांमध्ये आंबेघर (ता.पेण), श्रीगांव (ता. अलिबाग), घोटवडे (ता. सुधागड), ढोकशेत (ता. सुधागड), कार्ले (ता.श्रीवर्धन), रानवली (ता. श्रीवर्धन), वरंध (ता. महाड), साळोख (ता. कर्जत), अवसरे (ता.कर्जत), कलोते-मोकाशी (ता. खालापूर), डोणवत (ता. खालापूर), मोरबे (ता. पनवेल), बामणोली (ता. पनवेल), उसरण (ता. पनवेल) आणि पुनाडे (ता. उरण) यांचा समावेश आहे. अलिबाग- पेण मार्गावरील तीनवीरा धरण देखील पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागले आहे. पर्यटक आणि वर्षाविहारप्रेमींकरिता तीनवीरा धरण हे एक पर्वणीच ठरत आहे.माथेरानमध्ये सर्वाधिक १४४ मि.मी. पाऊसअलिबाग : रायगड जिल्ह्यात सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात माथेरान येथे जिल्ह्यातील सर्वाधिक १४४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. याच चोवीस तासात जिल्ह्यात एकू ण १२६६.७० मि.मी. पाऊस झाला असून हे सरासरी पर्जन्यमान ७९.१७ मि.मी. आहे. गतवर्षी याच दिवशी हा एकू णपाऊस १४,४३५.४० मि.मी. होता व त्यावेळी सरासरी पर्जन्यमान ९०२.२१ मि.मी. होते. श्रीवर्धन, म्हसळा, अलिबाग, उरण, महाड, पनवेल, मुरु ड, पोलादपूर, माणगांव या तालुक्यांमध्ये गेल्या चार दिवसापासून पावसाचा जोर होता मात्र सोमवारी पहाटेपासून जोर कमी झाला आहे. जिल्ह्यातील एकू णअपेक्षित पावसापैकी ३४.९५ टक्के पाऊस पूर्ण झाला आहे. जिल्ह्यातील सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास व गाढी या सहा प्रमुख नद्यांची जलपातळी नियंत्रणात आहे. त्यामुळे रस्त्यांवर साचलेले पाणी ओसरत आहे. या परिसरातील जनजीवनही पूर्वपदावर येत आहे. कोठेही पुराचा धोका नसल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाच्या सूत्रांनी दिली आहे.