शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

गतवर्षीच्या तुलनेत पर्जन्यमानात वाढ

By admin | Updated: July 5, 2016 02:23 IST

यंदाच्या मान्सूनमध्ये ४ जुलैअखेर रायगड जिल्ह्यात एकूण १७ हजार १५९ मि.मी. पाऊस झाला असून जिल्ह्याचे हे सरासरी पर्जन्यमान यंदा १ हजार ७२.४५ मि.मी. आहे. गतवर्षी याच कालावधीत

- जयंत धुळप, अलिबाग

यंदाच्या मान्सूनमध्ये ४ जुलैअखेर रायगड जिल्ह्यात एकूण १७ हजार १५९ मि.मी. पाऊस झाला असून जिल्ह्याचे हे सरासरी पर्जन्यमान यंदा १ हजार ७२.४५ मि.मी. आहे. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात १४ हजार ४३५.४० मि.मी. पाऊस झाला होता. त्यावेळी सरासरी पर्जन्यमान ९०२.२१ मि.मी. होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्याच्या एकूण पर्जन्यमानात २ हजार ७२३.८० मि.मी.ने वाढ झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील एकूण २८ लघुपाटबंधारे धरणांपैकी ५० टक्के म्हणजे १४ धरणे तुडुंब भरुन वाहू लागली आहेत. २८ पैकी उर्वरित एक धरण ७५ टक्केपेक्षा अधिक, चार धरणे ५० ते ७५ टक्के, पाच धरणे २५ ते ५० टक्के तर चार धरणे २५ टक्क्यांपेक्षा कमी भरली असल्याची माहिती रायगड पाटबंधारे विभागाच्या कोलाड येथील कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.१०० टक्के भरलेल्या १४ लघुपाटबंधारे धरणांमध्ये, मुरुड तालुक्यातील फणसाड, तळा तालुक्यातील वावा, रोहा तालुक्यातील सुतारवाडी, सुधागड तालुक्यातील कोडगांव ,कवेळे आणि उन्हेरे, श्रीवर्धन तालुक्यातील कुडली, म्हसळा तालुक्यातील पाभरे आणि संदेरी, महाड तालुक्यातील खिंडवाडी, कोथुर्डे आणि खैरे तर खालापूर तालुक्यातील भिलवले या धरणांचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यातील या १४ धरणांमध्ये ४ जुलै रोजी किमान जलपातळी ५३ मीटर तर कमाल जलपातळी १४९ मीटर आहे. या सर्व धरणांची एकूण जलसंचय क्षमता ६८.२८६ दशलक्ष घनमीटर असून ४ जुलै रोजी या सर्व धरणांमध्ये संचित जलसाठा ४८.१९४ दशलक्ष घनमीटर झाला आहे. - पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर असलेल्या धरणांमध्ये आंबेघर (ता.पेण), श्रीगांव (ता. अलिबाग), घोटवडे (ता. सुधागड), ढोकशेत (ता. सुधागड), कार्ले (ता.श्रीवर्धन), रानवली (ता. श्रीवर्धन), वरंध (ता. महाड), साळोख (ता. कर्जत), अवसरे (ता.कर्जत), कलोते-मोकाशी (ता. खालापूर), डोणवत (ता. खालापूर), मोरबे (ता. पनवेल), बामणोली (ता. पनवेल), उसरण (ता. पनवेल) आणि पुनाडे (ता. उरण) यांचा समावेश आहे. अलिबाग- पेण मार्गावरील तीनवीरा धरण देखील पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागले आहे. पर्यटक आणि वर्षाविहारप्रेमींकरिता तीनवीरा धरण हे एक पर्वणीच ठरत आहे.माथेरानमध्ये सर्वाधिक १४४ मि.मी. पाऊसअलिबाग : रायगड जिल्ह्यात सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात माथेरान येथे जिल्ह्यातील सर्वाधिक १४४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. याच चोवीस तासात जिल्ह्यात एकू ण १२६६.७० मि.मी. पाऊस झाला असून हे सरासरी पर्जन्यमान ७९.१७ मि.मी. आहे. गतवर्षी याच दिवशी हा एकू णपाऊस १४,४३५.४० मि.मी. होता व त्यावेळी सरासरी पर्जन्यमान ९०२.२१ मि.मी. होते. श्रीवर्धन, म्हसळा, अलिबाग, उरण, महाड, पनवेल, मुरु ड, पोलादपूर, माणगांव या तालुक्यांमध्ये गेल्या चार दिवसापासून पावसाचा जोर होता मात्र सोमवारी पहाटेपासून जोर कमी झाला आहे. जिल्ह्यातील एकू णअपेक्षित पावसापैकी ३४.९५ टक्के पाऊस पूर्ण झाला आहे. जिल्ह्यातील सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास व गाढी या सहा प्रमुख नद्यांची जलपातळी नियंत्रणात आहे. त्यामुळे रस्त्यांवर साचलेले पाणी ओसरत आहे. या परिसरातील जनजीवनही पूर्वपदावर येत आहे. कोठेही पुराचा धोका नसल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाच्या सूत्रांनी दिली आहे.