शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

गतवर्षीच्या तुलनेत पर्जन्यमानात वाढ

By admin | Updated: July 5, 2016 02:23 IST

यंदाच्या मान्सूनमध्ये ४ जुलैअखेर रायगड जिल्ह्यात एकूण १७ हजार १५९ मि.मी. पाऊस झाला असून जिल्ह्याचे हे सरासरी पर्जन्यमान यंदा १ हजार ७२.४५ मि.मी. आहे. गतवर्षी याच कालावधीत

- जयंत धुळप, अलिबाग

यंदाच्या मान्सूनमध्ये ४ जुलैअखेर रायगड जिल्ह्यात एकूण १७ हजार १५९ मि.मी. पाऊस झाला असून जिल्ह्याचे हे सरासरी पर्जन्यमान यंदा १ हजार ७२.४५ मि.मी. आहे. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात १४ हजार ४३५.४० मि.मी. पाऊस झाला होता. त्यावेळी सरासरी पर्जन्यमान ९०२.२१ मि.मी. होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्याच्या एकूण पर्जन्यमानात २ हजार ७२३.८० मि.मी.ने वाढ झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील एकूण २८ लघुपाटबंधारे धरणांपैकी ५० टक्के म्हणजे १४ धरणे तुडुंब भरुन वाहू लागली आहेत. २८ पैकी उर्वरित एक धरण ७५ टक्केपेक्षा अधिक, चार धरणे ५० ते ७५ टक्के, पाच धरणे २५ ते ५० टक्के तर चार धरणे २५ टक्क्यांपेक्षा कमी भरली असल्याची माहिती रायगड पाटबंधारे विभागाच्या कोलाड येथील कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.१०० टक्के भरलेल्या १४ लघुपाटबंधारे धरणांमध्ये, मुरुड तालुक्यातील फणसाड, तळा तालुक्यातील वावा, रोहा तालुक्यातील सुतारवाडी, सुधागड तालुक्यातील कोडगांव ,कवेळे आणि उन्हेरे, श्रीवर्धन तालुक्यातील कुडली, म्हसळा तालुक्यातील पाभरे आणि संदेरी, महाड तालुक्यातील खिंडवाडी, कोथुर्डे आणि खैरे तर खालापूर तालुक्यातील भिलवले या धरणांचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यातील या १४ धरणांमध्ये ४ जुलै रोजी किमान जलपातळी ५३ मीटर तर कमाल जलपातळी १४९ मीटर आहे. या सर्व धरणांची एकूण जलसंचय क्षमता ६८.२८६ दशलक्ष घनमीटर असून ४ जुलै रोजी या सर्व धरणांमध्ये संचित जलसाठा ४८.१९४ दशलक्ष घनमीटर झाला आहे. - पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर असलेल्या धरणांमध्ये आंबेघर (ता.पेण), श्रीगांव (ता. अलिबाग), घोटवडे (ता. सुधागड), ढोकशेत (ता. सुधागड), कार्ले (ता.श्रीवर्धन), रानवली (ता. श्रीवर्धन), वरंध (ता. महाड), साळोख (ता. कर्जत), अवसरे (ता.कर्जत), कलोते-मोकाशी (ता. खालापूर), डोणवत (ता. खालापूर), मोरबे (ता. पनवेल), बामणोली (ता. पनवेल), उसरण (ता. पनवेल) आणि पुनाडे (ता. उरण) यांचा समावेश आहे. अलिबाग- पेण मार्गावरील तीनवीरा धरण देखील पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागले आहे. पर्यटक आणि वर्षाविहारप्रेमींकरिता तीनवीरा धरण हे एक पर्वणीच ठरत आहे.माथेरानमध्ये सर्वाधिक १४४ मि.मी. पाऊसअलिबाग : रायगड जिल्ह्यात सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात माथेरान येथे जिल्ह्यातील सर्वाधिक १४४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. याच चोवीस तासात जिल्ह्यात एकू ण १२६६.७० मि.मी. पाऊस झाला असून हे सरासरी पर्जन्यमान ७९.१७ मि.मी. आहे. गतवर्षी याच दिवशी हा एकू णपाऊस १४,४३५.४० मि.मी. होता व त्यावेळी सरासरी पर्जन्यमान ९०२.२१ मि.मी. होते. श्रीवर्धन, म्हसळा, अलिबाग, उरण, महाड, पनवेल, मुरु ड, पोलादपूर, माणगांव या तालुक्यांमध्ये गेल्या चार दिवसापासून पावसाचा जोर होता मात्र सोमवारी पहाटेपासून जोर कमी झाला आहे. जिल्ह्यातील एकू णअपेक्षित पावसापैकी ३४.९५ टक्के पाऊस पूर्ण झाला आहे. जिल्ह्यातील सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास व गाढी या सहा प्रमुख नद्यांची जलपातळी नियंत्रणात आहे. त्यामुळे रस्त्यांवर साचलेले पाणी ओसरत आहे. या परिसरातील जनजीवनही पूर्वपदावर येत आहे. कोठेही पुराचा धोका नसल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाच्या सूत्रांनी दिली आहे.