शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

गतवर्षीच्या तुलनेत पर्जन्यमानात वाढ

By admin | Updated: July 5, 2016 02:23 IST

यंदाच्या मान्सूनमध्ये ४ जुलैअखेर रायगड जिल्ह्यात एकूण १७ हजार १५९ मि.मी. पाऊस झाला असून जिल्ह्याचे हे सरासरी पर्जन्यमान यंदा १ हजार ७२.४५ मि.मी. आहे. गतवर्षी याच कालावधीत

- जयंत धुळप, अलिबाग

यंदाच्या मान्सूनमध्ये ४ जुलैअखेर रायगड जिल्ह्यात एकूण १७ हजार १५९ मि.मी. पाऊस झाला असून जिल्ह्याचे हे सरासरी पर्जन्यमान यंदा १ हजार ७२.४५ मि.मी. आहे. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात १४ हजार ४३५.४० मि.मी. पाऊस झाला होता. त्यावेळी सरासरी पर्जन्यमान ९०२.२१ मि.मी. होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्याच्या एकूण पर्जन्यमानात २ हजार ७२३.८० मि.मी.ने वाढ झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील एकूण २८ लघुपाटबंधारे धरणांपैकी ५० टक्के म्हणजे १४ धरणे तुडुंब भरुन वाहू लागली आहेत. २८ पैकी उर्वरित एक धरण ७५ टक्केपेक्षा अधिक, चार धरणे ५० ते ७५ टक्के, पाच धरणे २५ ते ५० टक्के तर चार धरणे २५ टक्क्यांपेक्षा कमी भरली असल्याची माहिती रायगड पाटबंधारे विभागाच्या कोलाड येथील कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.१०० टक्के भरलेल्या १४ लघुपाटबंधारे धरणांमध्ये, मुरुड तालुक्यातील फणसाड, तळा तालुक्यातील वावा, रोहा तालुक्यातील सुतारवाडी, सुधागड तालुक्यातील कोडगांव ,कवेळे आणि उन्हेरे, श्रीवर्धन तालुक्यातील कुडली, म्हसळा तालुक्यातील पाभरे आणि संदेरी, महाड तालुक्यातील खिंडवाडी, कोथुर्डे आणि खैरे तर खालापूर तालुक्यातील भिलवले या धरणांचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यातील या १४ धरणांमध्ये ४ जुलै रोजी किमान जलपातळी ५३ मीटर तर कमाल जलपातळी १४९ मीटर आहे. या सर्व धरणांची एकूण जलसंचय क्षमता ६८.२८६ दशलक्ष घनमीटर असून ४ जुलै रोजी या सर्व धरणांमध्ये संचित जलसाठा ४८.१९४ दशलक्ष घनमीटर झाला आहे. - पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर असलेल्या धरणांमध्ये आंबेघर (ता.पेण), श्रीगांव (ता. अलिबाग), घोटवडे (ता. सुधागड), ढोकशेत (ता. सुधागड), कार्ले (ता.श्रीवर्धन), रानवली (ता. श्रीवर्धन), वरंध (ता. महाड), साळोख (ता. कर्जत), अवसरे (ता.कर्जत), कलोते-मोकाशी (ता. खालापूर), डोणवत (ता. खालापूर), मोरबे (ता. पनवेल), बामणोली (ता. पनवेल), उसरण (ता. पनवेल) आणि पुनाडे (ता. उरण) यांचा समावेश आहे. अलिबाग- पेण मार्गावरील तीनवीरा धरण देखील पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागले आहे. पर्यटक आणि वर्षाविहारप्रेमींकरिता तीनवीरा धरण हे एक पर्वणीच ठरत आहे.माथेरानमध्ये सर्वाधिक १४४ मि.मी. पाऊसअलिबाग : रायगड जिल्ह्यात सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात माथेरान येथे जिल्ह्यातील सर्वाधिक १४४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. याच चोवीस तासात जिल्ह्यात एकू ण १२६६.७० मि.मी. पाऊस झाला असून हे सरासरी पर्जन्यमान ७९.१७ मि.मी. आहे. गतवर्षी याच दिवशी हा एकू णपाऊस १४,४३५.४० मि.मी. होता व त्यावेळी सरासरी पर्जन्यमान ९०२.२१ मि.मी. होते. श्रीवर्धन, म्हसळा, अलिबाग, उरण, महाड, पनवेल, मुरु ड, पोलादपूर, माणगांव या तालुक्यांमध्ये गेल्या चार दिवसापासून पावसाचा जोर होता मात्र सोमवारी पहाटेपासून जोर कमी झाला आहे. जिल्ह्यातील एकू णअपेक्षित पावसापैकी ३४.९५ टक्के पाऊस पूर्ण झाला आहे. जिल्ह्यातील सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास व गाढी या सहा प्रमुख नद्यांची जलपातळी नियंत्रणात आहे. त्यामुळे रस्त्यांवर साचलेले पाणी ओसरत आहे. या परिसरातील जनजीवनही पूर्वपदावर येत आहे. कोठेही पुराचा धोका नसल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाच्या सूत्रांनी दिली आहे.