शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 23:51 IST

नवी मुंबई शहराला मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो.

नवी मुंबई : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. मागील दोन दिवसांपासून कोसळणा-या मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याची पातळीही वाढली आहे. त्यामुळे शहरवासीयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.नवी मुंबई शहराला मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणातून दिवसाला ४३0 एमएलडी इतके पाणी पुरविले जाते. या वर्षी संपूर्ण जून महिना कोरडा गेला. त्यामुळे महापालिकेने शहरात दहा टक्के पाणी कपात जाहीर केली. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचे जोरदार अगमन झाले. आठ दहा दिवस धो धो कोसळलेल्या पावसामुळे मोरबे धरणाच्या पातळीत काही प्रमाणात वाढ झाली. मात्र, त्यानंतर जुलै महिन्यात पावसाने पुन्हा दडी मारली. असे असले, तरी शेवटच्या आठवड्यात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. मागील तीन दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवार सकाळी ८.३0 ते शनिवार ८.३0 या चोवीस तासात धरण क्षेत्रात ३३0 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणाची पातळी जवळपास दोन मीटरने वाढली आहे. धरणाची पाणीसाठवण क्षमता ८८ मीटर इतकी आहे. सध्या ही पातळी ८१.७0 मीटरपर्यंत पोहोचली आहे. २५ जुलै रोजी ही पातळी ७९.४५ मीटर इतकी होती. पुढील काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास धरण भरायला वेळ लागणार नाही, असा विश्वास महापालिकेच्या संबंधित विभागाने व्यक्त केला आहे.मोरबे धरणाची पाणी साठवण क्षमता ८८ मीटर इतकी आहे. ही पातळी गाठण्यासाठी सरासरी ३000 मीमी पावसाची गरज असते. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारपर्यंत २0१७.६0 मीमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. धरण भरण्यासाठी आणखी साधारण १000 मीमी पावसाची गरज आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई