शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 23:51 IST

नवी मुंबई शहराला मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो.

नवी मुंबई : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. मागील दोन दिवसांपासून कोसळणा-या मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याची पातळीही वाढली आहे. त्यामुळे शहरवासीयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.नवी मुंबई शहराला मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणातून दिवसाला ४३0 एमएलडी इतके पाणी पुरविले जाते. या वर्षी संपूर्ण जून महिना कोरडा गेला. त्यामुळे महापालिकेने शहरात दहा टक्के पाणी कपात जाहीर केली. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचे जोरदार अगमन झाले. आठ दहा दिवस धो धो कोसळलेल्या पावसामुळे मोरबे धरणाच्या पातळीत काही प्रमाणात वाढ झाली. मात्र, त्यानंतर जुलै महिन्यात पावसाने पुन्हा दडी मारली. असे असले, तरी शेवटच्या आठवड्यात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. मागील तीन दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवार सकाळी ८.३0 ते शनिवार ८.३0 या चोवीस तासात धरण क्षेत्रात ३३0 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणाची पातळी जवळपास दोन मीटरने वाढली आहे. धरणाची पाणीसाठवण क्षमता ८८ मीटर इतकी आहे. सध्या ही पातळी ८१.७0 मीटरपर्यंत पोहोचली आहे. २५ जुलै रोजी ही पातळी ७९.४५ मीटर इतकी होती. पुढील काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास धरण भरायला वेळ लागणार नाही, असा विश्वास महापालिकेच्या संबंधित विभागाने व्यक्त केला आहे.मोरबे धरणाची पाणी साठवण क्षमता ८८ मीटर इतकी आहे. ही पातळी गाठण्यासाठी सरासरी ३000 मीमी पावसाची गरज असते. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारपर्यंत २0१७.६0 मीमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. धरण भरण्यासाठी आणखी साधारण १000 मीमी पावसाची गरज आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई