शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 23:51 IST

नवी मुंबई शहराला मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो.

नवी मुंबई : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. मागील दोन दिवसांपासून कोसळणा-या मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याची पातळीही वाढली आहे. त्यामुळे शहरवासीयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.नवी मुंबई शहराला मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणातून दिवसाला ४३0 एमएलडी इतके पाणी पुरविले जाते. या वर्षी संपूर्ण जून महिना कोरडा गेला. त्यामुळे महापालिकेने शहरात दहा टक्के पाणी कपात जाहीर केली. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचे जोरदार अगमन झाले. आठ दहा दिवस धो धो कोसळलेल्या पावसामुळे मोरबे धरणाच्या पातळीत काही प्रमाणात वाढ झाली. मात्र, त्यानंतर जुलै महिन्यात पावसाने पुन्हा दडी मारली. असे असले, तरी शेवटच्या आठवड्यात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. मागील तीन दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवार सकाळी ८.३0 ते शनिवार ८.३0 या चोवीस तासात धरण क्षेत्रात ३३0 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणाची पातळी जवळपास दोन मीटरने वाढली आहे. धरणाची पाणीसाठवण क्षमता ८८ मीटर इतकी आहे. सध्या ही पातळी ८१.७0 मीटरपर्यंत पोहोचली आहे. २५ जुलै रोजी ही पातळी ७९.४५ मीटर इतकी होती. पुढील काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास धरण भरायला वेळ लागणार नाही, असा विश्वास महापालिकेच्या संबंधित विभागाने व्यक्त केला आहे.मोरबे धरणाची पाणी साठवण क्षमता ८८ मीटर इतकी आहे. ही पातळी गाठण्यासाठी सरासरी ३000 मीमी पावसाची गरज असते. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारपर्यंत २0१७.६0 मीमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. धरण भरण्यासाठी आणखी साधारण १000 मीमी पावसाची गरज आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई