शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

पावसाने जिल्ह्याला झोडपले, माथेरान घाटामध्ये दरड कोसळल्याने चार तास वाहतूक ठप्प  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 03:46 IST

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. जिल्ह्यातील सावित्री, गाढी, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने किनारपट्टीवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अलिबाग - गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. जिल्ह्यातील सावित्री, गाढी, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने किनारपट्टीवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.सततच्या पावसामुळे माथेरान घाटामध्ये दरड कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीच हानी झाली नाही. मात्र, वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला याबाबतची माहिती मिळताच तेथे तातडीने संबंधित यंत्रणांच्या मदतीने रस्त्यात पडलेली दरड हटवण्यात आल्याचे जिल्हा आपत्ती विभागाचे सागर पाठक यांनी सांगितले.पेण तालुक्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये १३३८ मि.मी. पावसाची नोंद झाली, तसेच रविवारी सकाळपासून पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे पेण तालुक्यातील तळवली येथील गंगाराम वाघमारे आणि रामा पवार यांच्या घराचे पावसामुळे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे निगडेवाडी येथील श्रावण पवार यांच्याही घराचे नुकसान झाले. आंबेघर येथील समाजमंदिरालाही पावसाचा फटका बसल्याने नुकसान झाले आहे. याबाबतचा पंचनामा करण्यात आल्याची माहिती पेण तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली.रायगड जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी शनिवारी धोक्याची पातळी ओलांडली होती. मात्र, रविवारी त्यामध्ये घट झाल्याचे दिसून आले. ही आकडेवारी दुपारी १ वाजेपर्यंतची आहे.किनारी गावांना सतर्कतेचा इशारासोमवार ९ जुलैपर्यंत धुवाधार पाऊस कोसळणार आहे, त्यामुळे सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये सुमारे ७ ते २४ से.मी. पावसाची शक्यता असल्याने नदी, किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. या कालावधीत समुद्र खवळलेला असल्याने मासेमारीसाठी न जाण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.२४ तासांमध्ये झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.जिल्ह्यातील पर्जन्यमानअलिबाग ३७ मि.मी., पेण-८० मि.मी.,मुरु ड-९८ मि.मी., पनवेल-१३५.२० मि.मी., उरण-२२ मि.मी., कर्जत-२३१.४० मि.मी., खालापूर-२२१ मि.मी., माणगाव-२५० मि.मी., रोहा-८१ मि.मी., सुधागड-११५ मि.मी., तळा-१७१ मि.मी., महाड-२४४ मि.मी., पोलादपूर-१४० मि.मी., म्हसळा-१४२.८० मि.मी., श्रीवर्धन-५० मि.मी., माथेरान-११० मि.मी.माणगाव येथे सर्वाधिक २५० मि.मी.रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १३३.०९ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे, तसेच १ जूनपासून रविवारपर्यंत सरासरी १३८६.२९ मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.कालवा फुटल्याने माणगाव शहरात शिरले पुराचे पाणीर्माणगाव : माणगावच्या काळनदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरातील काही भागांत नदीचे पाणी शिरले असून, माणगावचा उतेखोल येथील कालवा फुटल्याने परिसरातील घरात पाणी शिरले.नदीपासून काही अंतरावर असलेल्या निकम स्कूल, माणगाव कोर्ट व विश्रामगृह तसेच अनेक इमारतींच्या परिसरात पाणी साचले आहे. तसेच कचेरी रोडवरील रेल्वे ब्रिज खाली पाणी शिरले.काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे कालवा फुटून माणगावमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती, त्या वेळी आपत्कालीन यंत्रणा कामी आली व लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले होते, त्या वेळीही घरात पाणी शिरले होते. आज नदीचे पाणी पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. कालवा काळप्रकल्प संबंधित पाटबंधारे विभागाने लक्ष देऊन या ठिकाणी असलेली गळती बंद केली असती तर कालवा फुटला नसता, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. उतेखोल कालवा पूल (सायपन) अत्यंत धोकादायक झाला आहे.जनजीवन विस्कळीतमुरु ड जंजिरा : मुरुड तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शहर, तसेच ग्रामीण भागात ठिकठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. रायगड जिल्ह्यात शनिवार सर्वच धुवाधार पाऊस पडला; परंतु याला मुरुड तालुका मात्र अपवाद राहिला. येथे ९८ मिलीमीटर एवढा पाऊस बरसला. रविवारी मात्र पावसाचा जोर वाढल्याने भाजी मार्केट व मासळी मार्केटमधील गर्दी ओसरून येथे शुकशुकाट पाहायला मिळाला.शहरातील गोलबंगला, मारु ती नाका, बाजारपेठ आदी सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. खारआंबोली ग्रामपंचायत हद्दीत एका घराचे पावसामुळे किरकोळ नुकसान असून, याबाबत पंचनामा करण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार रवींद्र सानप यांनी आहे.मुरुड तालुक्यात आतापर्यंत १३६४ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. सतत पडणाºया पावसामुळे पर्यटकांची संख्या येथे रोडावली आहे.समुद्रकिनारे सामसूम होते. हॉटेल व लॉजिंगचा व्यवसायसुद्धा मंदावला आहे. ऐतिहासिक सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला १५ आॅगस्टपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. संततधार पावसामुळे एसटी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. गाड्या खूप उशिराने मुरु ड आगारात परतत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या प्रवासात दीड तासांचा विलंब सहन करावा लागत आहे. पावसाच्या रिपरिपमुळे होड्या समुद्रात न गेल्याने सध्या मासळी बाजारात मासळीचा तुटवडा जाणवला.

टॅग्स :MatheranमाथेरानRainपाऊसRaigadरायगड