शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

सलग सुट्ट्यांमुळे रायगड पर्यटकांनी फुलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 02:31 IST

अलिबाग : ख्रिसमस आणि सरत्या इंग्रजी वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्याच्या रेवस-मांडवा-सासवने-किहिम-थळ-वरसोली-अलिबाग-आक्षी-नागाव-पालव-चौल-रेवदंडा-बारशिव-काशिद-नांदगाव-मुरूड-दिवेआगर-श्रीवर्धन या किनारपट्टीतील सर्व हॉटेल्स, रिसॉर्ट आणि घरगुती निवारे हाउसफुल्ल झाले.

विशेष प्रतिनिधी अलिबाग : ख्रिसमस आणि सरत्या इंग्रजी वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्याच्या रेवस-मांडवा-सासवने-किहिम-थळ-वरसोली-अलिबाग-आक्षी-नागाव-पालव-चौल-रेवदंडा-बारशिव-काशिद-नांदगाव-मुरूड-दिवेआगर-श्रीवर्धन या किनारपट्टीतील सर्व हॉटेल्स, रिसॉर्ट आणि घरगुती निवारे हाउसफुल्ल झाले. रविवारी रात्रीच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील किनारपट्टीतील छोट्या-मोठ्या हॉटेल्ससह रिसॉर्ट आणि घरगुती निवाºयांमध्ये दाखल पर्यटकांची संख्या दहा लाखांच्या वर गेल्याची माहिती किनारपट्टीतील विविध हॉटेल व्यावसायिक व पोलीस यंत्रणेशी संपर्क साधला असता ‘लोकमत’ला प्राप्त झाली आहे.मुंबई नगरीस अगदी खेटून असलेल्या आणि समुद्रमार्गे केवळ ४० मिनिटांच्या अंतरावर असलेल्या मांडवा जेट्टीवरून मोठ्या प्रमाणात पर्यटक मांडवा, सासवने, थळ, अलिबाग परिसरात आले आहेत. मांडवा परिसरात ५२ नोंदणीकृत हॉटेल्स व रिसॉर्ट असून ते पूर्णपणे हाउसफुल्ल झाले आहेत. मांडवा परिसरात रविवारी सर्वाधिक सुमारे १ लाख ७५ हजार पर्यटक संख्येची नोंद झाल्याचे मांडवा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे यांनी सांगितले. तर अलिबाग शहर परिसरातील ४ हजार ५०० हॉटेल्स व रिसॉर्ट व पर्यटक निवाºयांमध्ये पर्यटक दाखल झाले असून ५० हजार मुक्कामी तर तितकेच पर्यटक सकाळी येऊन संध्याकाळी मुंबईस परतत अशा एक लाखापेक्षा अधिक पर्यटकांनी अलिबागला हजेरी लावल्याचे अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी सांगितले.मुरूड तालुक्यातील काशिद येथे ९०, मुरूड येथे ४०, नांदगाव येथे ३५ हॉटेल्स व रिसॉर्ट व पर्यटक निवारे असून खासगी फार्महाउस ७० आहेत. या सर्व ठिकाणी पर्यटकांची तुडुंब गर्दी आहे. रविवारी सुमारे ४० हजार पर्यटक मुक्कामी तर सुमारे ५० ते ६० हजार पर्यटक दिवभराच्या पर्यटनार्थ आल्याचे मुरूडचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी सांगितले.रेवदंडा परिसरात सुमारे ८० हॉटेल्स, रिसॉर्ट व पर्यटक निवारे असून सुमारे ६० हजार पर्यटकांनी हजेरी लावली असल्याची माहिती रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश सकपाळ यांनी दिली आहे. श्रीवर्धनमधील ८० नोंदणीकृत हॉटेल्स व रिसॉर्ट व पर्यटक निवाºयांमध्ये ३ हजार पर्यटक मुक्कामी असून दिवसभरात सुमारे ४० हजार पर्यटक पर्यटनार्थ आल्याचे श्रीवर्धनचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी सांगितले. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आतापासूनच तरुणाई आणि पर्यटकांची जोरदार तयारी सुरू आहे. त्यासाठी तरुणाईत, पर्यटकांमध्ये पार्टी, नाचगाण्यावर थिरकण्याचे बेतही आखले जात आहेत.>किल्ला पाहण्यासाठी मुरूडमध्ये पर्यटकांची गर्दीनांदगाव/ मुरूड : जंजिरा किल्ला पाहण्यासाठी सोमवारी नाताळ सणाच्या सुट्टीमुळे पर्यटकांनी सकाळपासूनच तुफान गर्दी केली होती. उंद्रे हायस्कूलपर्यंत ते राजपुरी जेट्टीपर्यंत लांबच लांब रांगा दिसून आल्या. तिकीट खिडकीवर पर्यटकांची झुंबड दिसून आली. खोरा बंदरावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सलग तीन दिवसांच्या सुट्टीत पर्यटक मौजमजा करताना दिसून येत आहेत. मात्र शनिवारी एक ा पर्यटक महिलेला अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शनिवारी २३ डिसेंबर रोजी नाशिक येथील पर्यटक महिला गंगोत्री देवी (५५) या जंजिरा किल्ल्यावरून परतत असताना त्यांचा अपघात होऊन छातीची बरगडी फ्रॅक्चर झाल्या. जंजिरा किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून होडीत बसताना पाय घसरून त्या होडीच्या मधोमध पडल्याने छातीची बरगडी फ्रॅक्चर झाल्याचे निदर्शनास येत आहे.>मुंबई-पुणे मार्गावर वाहतूककोंडीरायगडच्या किनारपट्टीतील हॉटेल्स व रिसॉर्ट व पर्यटक निवाºयांचे आगाऊ बुकिंग गेल्या महिन्यापूर्वीच झाले असल्याने आयत्या वेळी आलेल्या पर्यटकांची मोठीच पंचाईत झाली होती.रविवारी अलिबागमध्ये काही पर्यटकांना अलिबाग बस स्थानकात बसून रात्र काढावी लागली तर काहींनी शहरातील नागरिकांना विनंती करून घराच्या व्हरांड्यात रात्र काढण्याचा निर्णय घेतला.अलिबाग, मुरूड, काशिद, रेवदंडा, नागाव परिसरातील हॉटेल्स व रिसॉर्ट व पर्यटक निवारे फुल्ल झाले असल्याने आपापल्या चारचाकी वाहनातून आलेल्या पर्यटकांनी संध्याकाळीच मुंबई-पुण्यास जाण्याचा निर्णय घेतला, परिणामी या मार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली होती. वडखळ ते अलिबाग या केवळ २० ते २५ मिनिटांच्या प्रवासाकरिता तब्बल एक ते दीड तास लागत होता.