शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
2
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
3
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
4
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
5
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
6
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
7
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
8
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
9
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
10
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
11
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
12
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
13
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
14
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
15
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
16
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
18
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
19
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
20
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!

Raigad: खोपटा -कोप्रोलीत ग्लोबिकाँन टर्मिनलच्या दुर्गंधीकडे  प्रदुषण मंडळाचे अक्षम्य दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 18:56 IST

Raigad: उरण येथील ग्लोबिकाँन टर्मिनल कंपनीकडून शेतजमीन आणि खाडीत रासायनिक मिश्रित दुषित पाणी सातत्याने सोडण्यात येत असल्याने मासे मृत्यूमुखी पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

- मधुकर ठाकूरउरण - येथील ग्लोबिकाँन टर्मिनल कंपनीकडून शेतजमीन आणि खाडीत रासायनिक मिश्रित दुषित पाणी सातत्याने सोडण्यात येत असल्याने मासे मृत्यूमुखी पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.तसेच नाशवंत मालाची विल्हेवाट लावण्याऐवजी मिळेल त्या ठिकाणी टाकून देत असल्याने परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरते.हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असताना मात्र  तक्रारीनंतरही महसूल आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त आहेत.त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी कारवाईसाठी आता रायगड जिल्हाधिकाऱ्यांनाच साकडे घातले आहे.

उरण तालुक्यातील कोप्रोली,पिरकोन व खोपटा -बांधपाडा या तीन ग्रामपंचायत हद्दीत ग्लोबिकाँन कंटेनर टर्मिनल आहे. या कंटेनर टर्मिनलमध्ये विविध प्रकारच्या मालाची मोठ्या प्रमाणावर हाताळणी केली जाते.मात्र या कंटेनर गोदामातून रासायनिक मिश्रित दुषित पाणी सातत्याने येथील खाडीत सोडण्यात येत आहे.कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता रासायनिक मिश्रित दुषित पाणी थेट शेत जमिनी आणि खाडीत सोडण्यात येत असल्याने वारंवार खाडीतील मासे मोठ्या प्रमाणावर मृत्युमुखी पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.त्याशिवाय नाशवंत मालाची विल्हेवाटही खाडीकिनाऱ्या परिसरात टाकून करीत आहेत.त्यामुळे खोपटा - कोप्रोली परिसरात पसरणाऱ्या नाशवंत मालाच्या उग्र वासाच्या भयानक दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

याप्रकरणी ग्रामपंचायत, ग्रामस्थांनी ग्लोबिकाँन टर्मिनलच्या विरोधात वारंवार उरण तहसीलदार,  महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ तक्रारी केल्या आहेत.मात्र त्याकडे महसूल व प्रदुषण विभागांच्या अधिकाऱ्यांकडून सातत्याने काणाडोळाच केला जात आहे.तक्रारीनंतर काही वेळा प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी फायद्यासाठी थातुरमातुर पाहणी, पंचनामे करून नोटीसही बजाविण्याची दिखाऊ कारवाईही करतात. मात्र हजारो नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेला प्रश्न निकाली निघत नसल्याने प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांबद्दल नागरिकांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे. याप्रकरणी त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी आता रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीव्दारे आपल्या व्यथा मांडल्या आहेत.

याप्रकरणी अधिक माहितीसाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधुनही  विभागीय अधिकारी सचिन आडकर यांनी  प्रतिसाद दिला नाही.

शेतजमीन आणि खाडीत रासायनिक मिश्रित दुषित पाणी सातत्याने सोडण्यात येत असल्याने मासे मृत्यूमुखी पडण्याच्या घटना वारंवार घडतात.तसेच  दुषित पाणी सोडून शेतजमिनीत नापीक करून स्वस्तात विकत घेण्यासाठी कंपनी व भांडवलदारांनी रचलेला हा कट असल्याचा गंभीर आरोप किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय ठाकूर यांनी केला आहे.

टॅग्स :Raigadरायगडpollutionप्रदूषण