शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

Raigad: खोपटा -कोप्रोलीत ग्लोबिकाँन टर्मिनलच्या दुर्गंधीकडे  प्रदुषण मंडळाचे अक्षम्य दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 18:56 IST

Raigad: उरण येथील ग्लोबिकाँन टर्मिनल कंपनीकडून शेतजमीन आणि खाडीत रासायनिक मिश्रित दुषित पाणी सातत्याने सोडण्यात येत असल्याने मासे मृत्यूमुखी पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

- मधुकर ठाकूरउरण - येथील ग्लोबिकाँन टर्मिनल कंपनीकडून शेतजमीन आणि खाडीत रासायनिक मिश्रित दुषित पाणी सातत्याने सोडण्यात येत असल्याने मासे मृत्यूमुखी पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.तसेच नाशवंत मालाची विल्हेवाट लावण्याऐवजी मिळेल त्या ठिकाणी टाकून देत असल्याने परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरते.हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असताना मात्र  तक्रारीनंतरही महसूल आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त आहेत.त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी कारवाईसाठी आता रायगड जिल्हाधिकाऱ्यांनाच साकडे घातले आहे.

उरण तालुक्यातील कोप्रोली,पिरकोन व खोपटा -बांधपाडा या तीन ग्रामपंचायत हद्दीत ग्लोबिकाँन कंटेनर टर्मिनल आहे. या कंटेनर टर्मिनलमध्ये विविध प्रकारच्या मालाची मोठ्या प्रमाणावर हाताळणी केली जाते.मात्र या कंटेनर गोदामातून रासायनिक मिश्रित दुषित पाणी सातत्याने येथील खाडीत सोडण्यात येत आहे.कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता रासायनिक मिश्रित दुषित पाणी थेट शेत जमिनी आणि खाडीत सोडण्यात येत असल्याने वारंवार खाडीतील मासे मोठ्या प्रमाणावर मृत्युमुखी पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.त्याशिवाय नाशवंत मालाची विल्हेवाटही खाडीकिनाऱ्या परिसरात टाकून करीत आहेत.त्यामुळे खोपटा - कोप्रोली परिसरात पसरणाऱ्या नाशवंत मालाच्या उग्र वासाच्या भयानक दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

याप्रकरणी ग्रामपंचायत, ग्रामस्थांनी ग्लोबिकाँन टर्मिनलच्या विरोधात वारंवार उरण तहसीलदार,  महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ तक्रारी केल्या आहेत.मात्र त्याकडे महसूल व प्रदुषण विभागांच्या अधिकाऱ्यांकडून सातत्याने काणाडोळाच केला जात आहे.तक्रारीनंतर काही वेळा प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी फायद्यासाठी थातुरमातुर पाहणी, पंचनामे करून नोटीसही बजाविण्याची दिखाऊ कारवाईही करतात. मात्र हजारो नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेला प्रश्न निकाली निघत नसल्याने प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांबद्दल नागरिकांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे. याप्रकरणी त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी आता रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीव्दारे आपल्या व्यथा मांडल्या आहेत.

याप्रकरणी अधिक माहितीसाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधुनही  विभागीय अधिकारी सचिन आडकर यांनी  प्रतिसाद दिला नाही.

शेतजमीन आणि खाडीत रासायनिक मिश्रित दुषित पाणी सातत्याने सोडण्यात येत असल्याने मासे मृत्यूमुखी पडण्याच्या घटना वारंवार घडतात.तसेच  दुषित पाणी सोडून शेतजमिनीत नापीक करून स्वस्तात विकत घेण्यासाठी कंपनी व भांडवलदारांनी रचलेला हा कट असल्याचा गंभीर आरोप किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय ठाकूर यांनी केला आहे.

टॅग्स :Raigadरायगडpollutionप्रदूषण