शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

Raigad: उरण एसटी स्थानकात पाण्याचा ठणठणाट : प्रवासी वाहतूकीत वाढ, मात्र प्रवाशांचा घसा कोरडाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 22:57 IST

Raigad: उरण एसटी बस स्थानकातून १६ मार्गावरील दररोज २० ते २२ हजारांहून प्रवासी वाहतूक होत आहे.मात्र प्रवासी वाहतूकीत वाढ झाली असताना मात्र बस स्थानकात  पाण्याची व्यवस्था नसल्याने  प्रवाशांचा घसा कोरडा पडतो आहे.

- मधुकर ठाकूर उरण : उरण एसटी बस स्थानकातून १६ मार्गावरील दररोज २० ते २२ हजारांहून प्रवासी वाहतूक होत आहे.मात्र प्रवासी वाहतूकीत वाढ झाली असताना मात्र बस स्थानकात  पाण्याची व्यवस्था नसल्याने  प्रवाशांचा घसा कोरडा पडतो आहे.

उरण स्थानकातुन एसटी महामंडळाच्या एकूण १६ मार्गांवर २५० गाड्यांच्या फेऱ्या होतात.या २५० फेऱ्यात दररोज २० ते २२ हजारांहून अधिक प्रवासी प्रवास करतात.मात्र प्रवासी संख्या वाढत चालली असताना मात्र प्रवाशांसाठी कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही.त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचा घसा कोरडा पडतो आहे.उरण स्थानकातच पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट जाणवत असल्याने गरीब सामान्य  प्रवाशांना बाहेरून बाटलीचे महागडे खरेदी करावे लागते.या अतिरिक्त खर्चाच्या भारामुळे प्रवासी वर्गात असंतोष निर्माण झाला आहे.

उरण स्थानकातून दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांमध्ये वाढ होत चालली आहे.मागील आर्थिक वर्षात एप्रिल २०२२ पर्यंत प्रवाशांची संख्या १ लाख २७ हजार ६५६ होती.त्यामध्ये २२-२३ या आर्थिक वर्षात प्रवासी संख्या वाढून  ३ लाख ९१ हजार ६६७ वर पोहचली आहे. मात्र या स्थानकात प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. चाणजे ग्रामपंचायतीकडून दिड इंच व्यासाचे पाण्याचे कनेक्शन देण्यात आले आहे.मात्र बस स्थानक आणिवर्कशॉप येथील दोन्ही वॉटर कुलर मशिन अनेक महिन्यांपासून बंद पडल्या आहेत.नवीन दोन वॉटर कुलर मशिनची मागणी आहे.मागील वेळाही काही स्वयंसेवी संस्थांकडून वॉटर कुलर मशिनची व्यवस्था करण्यात आली होती.यावेळीही अशा स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मदतीची अपेक्षा आहे. - सतीश मालचे -उरण एसटी डेपो व्यवस्थापकसध्या कडकडीत रणरणत्या उन्हात एसटी प्रवाशांची पाण्याविना तडफड सुरू आहे. त्यामुळे उरणच्या एस टी स्थानकात पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी अमित पाटील आणि इतर प्रवाशांकडून केली जात आहे.

टॅग्स :Raigadरायगडstate transportएसटी