शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

दासगाव दरडग्रस्तांचे प्रश्न प्रलंबितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 07:24 IST

महाड तालुक्यात २००५मध्ये अनेक गावांमध्ये दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली होती. दासगावमध्ये दरड कोसळून ४८ लोकांचे बळी गेले होते. तर ३८ घरे जमीनदोस्त झाली होती.

दासगाव : महाड तालुक्यात २००५मध्ये अनेक गावांमध्ये दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली होती. दासगावमध्ये दरड कोसळून ४८ लोकांचे बळी गेले होते. तर ३८ घरे जमीनदोस्त झाली होती. या दरडग्रस्तांना दासगावमध्येच मुंबई-गोवा महामार्गालगत पत्र्याचे शेड बनवून राहण्याची सोय करण्यात आली होती. गेली ११ वर्षे हे दरडग्रस्त नागरिक आजही त्या पत्रा शेडमध्येच राहत आहेत. चार वर्षांपूर्वी शासनाने या पत्रा शेडचीच जागा दरडग्रस्तांसाठी संपादित करत १३१ प्लॉट तयार केले. या ठिकाणी या लोकांना शासनाने घर बांधण्यासाठी ९५ हजारांचा निधीही मंजूर केला. मात्र, शासनाकडून वारंवार या दरडग्रस्तांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आजही दरडग्रस्त घरांची समस्या, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, वीजसमस्या, सांडपाणी प्रश्न, अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या सर्व समस्या दूर करण्यासाठी महाड-पोलादपूरचे आ. भरत गोगावले यांनी संबंधित सर्व खात्यांच्या अधिकाºयांची बुधवारी याच पत्राशेडच्या ठिकाणी बैठक लावून या ठिकाणच्या समस्या दूर करता येतील, यावर चर्चा केली. त्या वेळी या नवीन वसाहतीला गणेशनगर नावही देण्यात आले असून, गोगावले यांच्या हस्ते याचे अनावरण करण्यात आले.२००५मध्ये दासगावात दरड कोसळून नुकसान झाले होते. त्यानंतर या परिसरातील दरडग्रस्तांना मुंबई-गोवा महामार्गालगत पत्र्याचे निवारा शेड बनवून राहण्याची सोय केली. गेली ११ वर्षे हे नागरिक या शेडमध्ये नरकयातना भोगत आहेत. यांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. चार वर्षांपूर्वी आ. भरत गोगावले यांच्या प्रयत्नाने तात्पुरता निवारा पत्र्याच्या शेडच्या ठिकाणची जागा पुनर्वसनासाठी निश्चित केली. त्या ठिकाणी घर बांधण्यासाठी या दरडग्रस्तांना शासनाने प्रत्येक घराला ९५ हजारांचे अनुदानही मंजूर केले. मात्र, मंजुरीनंतर प्लॉट नागरिकांच्या ताब्यात मिळाले; परंतु पैसे मिळण्यासाठी अनेक निकष असल्याने या ठिकाणच्या दरडग्रस्तांना आपली घरे बांधणे शक्य झाले नाही. काहींनी मात्र आपल्या खिशातील पैसा घालून घरे बांधली; पण शासनाच्या पैशांवर अवलंबून असलेल्या नागरिकांची घरे आजही बांधली गेलेली नाहीत. येथे पिण्याचे पाणी, वीज, गटारे यांचा अभाव तसेच अपुºया निवाºयाअभावी होणारा त्रास, अशा गेली ११ वर्षे नरकयातना भोगत आहेत. मात्र, या समस्या दूर करण्यासाठी महाड पोलादपूरचे आ. भरत गोगावले यांनी संबंधित अधिकाºयांची बुधवारी एक बैठक या पत्रा शेडच्या ठिकाणी आयोजित क रून यावर कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत चर्चा केली.या बैठकीसाठी महाडचे तहसीलदार, प्रांत कार्यालय प्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, महावितरण अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, दासगावचे सरपंच, उपसरपंच व दासगाव, दाभोळचे ग्रामसेवक, तलाठी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.१२००५मध्ये दासगावच्या दरडीमध्ये ३८ घरे जमीनदोस्त झाली. आजूबाजूच्या या परिसराला धोका असल्याने इतरही त्या ठिकाणच्या रहिवाशांना हलवून दरडग्रस्तांसोबत त्याच्याही राहण्याचा बंदोबस्त त्या वेळी पत्रा शेडमध्ये करण्यात आला. सध्याच्या परिस्थितीत शासनाने चार वर्षांपूर्वी त्याच ठिकाणची जागा संपादित करून १३१ प्लॉट तयार केले.२दरडग्रस्त तसेच इतर धोकादायक स्थितीत असलेल्या दासगावमधील नागरिकांना वाटप करण्यात आले. २८ प्लॉट आजही शासनाकडे या ठिकाणी शिल्लक आहेत. या वाटपानंतर ९५ दरडग्रस्तांनी आपली घरे बांधण्यास सुरुवात केली. घरबांधणीसाठी शासनाकडून ९५ हजारांचा निधी जाहीर झाला होता. मात्र, त्यामध्ये जोपर्यंत बांधकाम सुरू होत नाही, तोपर्यंत पैसे दिले जात नाही.३या ९५ दरडग्रस्तांना पहिला हप्ता २० हजारांचा मिळाला. मात्र, तेवढ्या रकमेत जोताही पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे अनेकांनी आपल्या खिशातील पैसे खर्च केल्यामुळे २७ घरांचे बांधकाम पूर्ण झाले. तर शेवटच्या टप्प्यात ६ घरे आहेत. २३ जणांनी जोते बांधले; पण पैशाअभावी पुढे काही केले नाही. ९५ दरडग्रस्तांना २० हजारांची पहिल्या हप्त्याची रक्कम मिळाली.४५३ जणांना दुसºया हप्त्याची २० हजारांची रक्कम मिळाली. तर २८ घरांना १५ हजारांचा तिसरा हप्ता मिळाला आहे. आजपर्यंत २७ घरे बांधून झालेली आहेत; पण त्यांना पूर्ण पैसे मिळाले नाहीत. त्यासाठी शासन दरबारी फे ºया मारत आहेत. त्यामुळे उर्वरित कामे राहिलेल्या दरडग्रस्तांच्या घरांचे काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.वसाहतीचे नामकरणदरडग्रस्तांसाठी होणाºया नवीन वसाहतीला गणेशनगर असे नवीन नाव देऊन नामकरण करण्यात आले आहे. या वेळी नामफलकाचे अनावरण आ. भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले.गेली ११ वर्षे येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. वहूर, दासगाव नळपाणी पुरवठा योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येतो.मात्र, कोतुर्डे धरणातून येणारे हे पाणी आटल्यानंतर एप्रिल-मे या दोन महिन्यांत ही योजना ठप्प होते. अशा वेळी एकमेव आधार असणारी येथील विहीरही ताण वाढल्यावर कोरडी पडते.त्यानंतर मात्र येथे कोणताच पाण्याचा स्रोत उपलब्ध होत नाही. पावसाळ्यापूर्वीचे दोन महिने पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागते. त्यामुळे या वसाहतीसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्याची गरज आहे.२००५मध्ये दासगावात दरड कोसळून नुकसान झाले होते. त्यानंतर या परिसरातील दरडग्रस्तांना मुंबई-गोवा महामार्गालगत पत्र्याचे निवारा शेड बनवून राहण्याची सोय केली.गेली ११ वर्षे हे नागरिक याशेडमध्ये नरकयातना भोगतआहेत. यांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडून दुर्लक्ष करण्यातआले आहे.

टॅग्स :Raigadरायगड