शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
2
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
3
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
4
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
5
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
6
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
7
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
8
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
9
मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
10
नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले
11
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च
12
Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
13
अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल
14
Vastu Tips: श्रीमंतांचं घर जणू आरसेमहल; कारण आरसे योग्य दिशेला लावण्याने वाढते संपत्ती!
15
अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट
16
बायकोने रचला हत्येचा कट, मित्र अन् बॉयफ्रेंडने दिली साथ! नवऱ्याच्या कार अपघातामागचं सत्य ऐकून बसेल धक्का
17
अ‍ॅथलीट फौजा सिंग हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अमृतपाल सिंगला अटक; पोलिसांनी फॉर्च्युनर कार जप्त केली
18
सुचित्रा बांदेकरांचं टीव्हीवर पुनरागमन, हिंदी मालिकेत झळकणार; 'आई कुठे...' फेम मिलिंद गवळीही मुख्य भूमिकेत
19
लंडन-न्यू यॉर्क विसरा! 'हे' आहे जगातील सर्वात महागडं शहर, आपल्या मुंबईचंही यादीत नाव!
20
देशातील 'ही' सर्वात मोठी बँक पहिल्यांदाच देणार बोनस शेअर्स; डिविडंडही मिळणार, १९ जुलै महत्त्वाचा दिवस

पाणी शुद्धता अहवालावर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 02:52 IST

आरोग्याच्या समस्या उद्भवण्याचे प्रमुख कारण ‘दूषित पाणी’ हे आहे.

- जयंत धुळप अलिबाग : आरोग्याच्या समस्या उद्भवण्याचे प्रमुख कारण ‘दूषित पाणी’ हे आहे. त्यामुळे दरमहिन्याला जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील एकूण ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून जलस्रोतांचे नमुने संकलित करण्यात येतात. हे पाण्याचे नमुने अलिबाग येथील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा आणि कर्जत, पेण, रोहा, माणगाव आणि महाड या उप विभागीय आरोग्य प्रयोगशाळेत अणुजीव तपासणीकरिता पाठविण्यात येतात. मात्र जुलै २०१८ या महिन्यात कर्जत, खालापूर, महाड, माणगाव, तळा आणि उरण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून जलनमुने आले नसल्याने या सहा तालुक्यांतील एकूण २८ जलनमुने चाचणीचा अहवाल जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून देण्यात आलेला नाही. परिणामी या सहा तालुक्यांतील पाणी नमुने तपासणी अहवालांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.कर्जत तालुक्यातील आंबिवली, कडाव, कळंब, खांडस, नेरळ, खालापूर तालुक्यातील चौक, खालापूर, वावोशी, महाड तालुक्यातील बिरवाडी, चिंभावे, दासगाव, पाचाड, वरंध, विन्हेरे, माणगाव तालुक्यातील इंदापूर, गोरेगाव, नांदवी, निजामपूर, साई, शिरवली, म्हसळा तालुक्यातील खामगाव, पनवेल तालुक्यात आजिवली व आपटा, पेणमध्ये जिते व कामार्ले, सुधागडमध्ये पाली, तळा तालुक्यात तळा व उरण तालुक्यातील कोप्रोली अशा एकूण २८ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या क्षेत्रातील पाणी नमुने प्रयोगशाळेत पोहोचले नसल्याने येथील अहवाल जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेने निरंक दाखविले आहेत.शासनाच्या निर्णयानुसार, आता जिल्ह्यातील सर्व ८०७ ग्रामपंचायतींमध्ये ‘जलसुरक्षक’ नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले आहे. पाणी नमुने घेवून ते प्रयोगशाळेत पाठविणे, चाचणीचे अहवाल आल्यावर पाणी शुद्धीकरण करणे गरजेचे असल्यास त्यासाठीची प्रक्रिया ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पूर्ण करुन जलस्रोत शुद्ध करणे, पाण्याची गुणवत्ता राखणे ही कामे ‘जलसुरक्षक’ यांच्या माध्यमातून करण्यात येत असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागातील नंदकुमार गायकर यांनी दिली.पाणी व स्वच्छता विभाग, ‘जलसुरक्षक’ आणि जिल्हा आरोग्य अधिकारी समन्वय आवश्यक‘जलसुरक्षक’ यांनी पाणी नमुने तपासणीकरिता दिले किंवा नाहीत, त्यांनी दिलेल्या पाणी नमुन्यांचे परीक्षण अहवाल काय आले, दूषित पाणी नमुन्यांच्या स्रोत शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली किंवा नाही याबाबतची कोणतीही माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र, पाणी व स्वच्छता विभाग आणि जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय येथे उपलब्ध होत नाही. परिणामी जिल्ह्यातील पाणी नमुने तपासणीचा संकलित अहवाल उपलब्ध होत नसल्याचे दिसून आले. ‘जलसुरक्षक’ यांचा समन्वय या तीनही यंत्रणांशी नसल्याने जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील २८ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या हद्दीतील पाण्याच्या शुद्धतेबाबत प्रश्नचिन्ह उभे रहात आहे.दरमहिन्याला जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील एकूण ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून जलस्रोतांचे नमुने संकलित करण्यात येतात>पाणी नमुन्यांचा अहवाल पंचायत समितीकडेजिल्ह्यातील कर्जत, खालापूर, महाड, माणगाव, तळा आणि उरण या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा पाणी नमुने तपासणी अहवाल जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेच्या अहवालात निरंक दिसत आहे. त्या ठिकाणचे पाणी नमुने ‘जलसुरक्षक’ यांच्या माध्यमातून देण्यात आलेले असणार. त्यांनी दिलेल्या पाणी नमुने तपासणी अहवाल संबंधित पंचायत समित्यांकडे येतो, तो आमच्याकडे येत नसल्याचे रायगड जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई यांनी दिली आहे.