शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

पाणी शुद्धता अहवालावर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 02:52 IST

आरोग्याच्या समस्या उद्भवण्याचे प्रमुख कारण ‘दूषित पाणी’ हे आहे.

- जयंत धुळप अलिबाग : आरोग्याच्या समस्या उद्भवण्याचे प्रमुख कारण ‘दूषित पाणी’ हे आहे. त्यामुळे दरमहिन्याला जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील एकूण ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून जलस्रोतांचे नमुने संकलित करण्यात येतात. हे पाण्याचे नमुने अलिबाग येथील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा आणि कर्जत, पेण, रोहा, माणगाव आणि महाड या उप विभागीय आरोग्य प्रयोगशाळेत अणुजीव तपासणीकरिता पाठविण्यात येतात. मात्र जुलै २०१८ या महिन्यात कर्जत, खालापूर, महाड, माणगाव, तळा आणि उरण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून जलनमुने आले नसल्याने या सहा तालुक्यांतील एकूण २८ जलनमुने चाचणीचा अहवाल जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून देण्यात आलेला नाही. परिणामी या सहा तालुक्यांतील पाणी नमुने तपासणी अहवालांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.कर्जत तालुक्यातील आंबिवली, कडाव, कळंब, खांडस, नेरळ, खालापूर तालुक्यातील चौक, खालापूर, वावोशी, महाड तालुक्यातील बिरवाडी, चिंभावे, दासगाव, पाचाड, वरंध, विन्हेरे, माणगाव तालुक्यातील इंदापूर, गोरेगाव, नांदवी, निजामपूर, साई, शिरवली, म्हसळा तालुक्यातील खामगाव, पनवेल तालुक्यात आजिवली व आपटा, पेणमध्ये जिते व कामार्ले, सुधागडमध्ये पाली, तळा तालुक्यात तळा व उरण तालुक्यातील कोप्रोली अशा एकूण २८ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या क्षेत्रातील पाणी नमुने प्रयोगशाळेत पोहोचले नसल्याने येथील अहवाल जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेने निरंक दाखविले आहेत.शासनाच्या निर्णयानुसार, आता जिल्ह्यातील सर्व ८०७ ग्रामपंचायतींमध्ये ‘जलसुरक्षक’ नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले आहे. पाणी नमुने घेवून ते प्रयोगशाळेत पाठविणे, चाचणीचे अहवाल आल्यावर पाणी शुद्धीकरण करणे गरजेचे असल्यास त्यासाठीची प्रक्रिया ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पूर्ण करुन जलस्रोत शुद्ध करणे, पाण्याची गुणवत्ता राखणे ही कामे ‘जलसुरक्षक’ यांच्या माध्यमातून करण्यात येत असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागातील नंदकुमार गायकर यांनी दिली.पाणी व स्वच्छता विभाग, ‘जलसुरक्षक’ आणि जिल्हा आरोग्य अधिकारी समन्वय आवश्यक‘जलसुरक्षक’ यांनी पाणी नमुने तपासणीकरिता दिले किंवा नाहीत, त्यांनी दिलेल्या पाणी नमुन्यांचे परीक्षण अहवाल काय आले, दूषित पाणी नमुन्यांच्या स्रोत शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली किंवा नाही याबाबतची कोणतीही माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र, पाणी व स्वच्छता विभाग आणि जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय येथे उपलब्ध होत नाही. परिणामी जिल्ह्यातील पाणी नमुने तपासणीचा संकलित अहवाल उपलब्ध होत नसल्याचे दिसून आले. ‘जलसुरक्षक’ यांचा समन्वय या तीनही यंत्रणांशी नसल्याने जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील २८ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या हद्दीतील पाण्याच्या शुद्धतेबाबत प्रश्नचिन्ह उभे रहात आहे.दरमहिन्याला जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील एकूण ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून जलस्रोतांचे नमुने संकलित करण्यात येतात>पाणी नमुन्यांचा अहवाल पंचायत समितीकडेजिल्ह्यातील कर्जत, खालापूर, महाड, माणगाव, तळा आणि उरण या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा पाणी नमुने तपासणी अहवाल जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेच्या अहवालात निरंक दिसत आहे. त्या ठिकाणचे पाणी नमुने ‘जलसुरक्षक’ यांच्या माध्यमातून देण्यात आलेले असणार. त्यांनी दिलेल्या पाणी नमुने तपासणी अहवाल संबंधित पंचायत समित्यांकडे येतो, तो आमच्याकडे येत नसल्याचे रायगड जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई यांनी दिली आहे.