शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

संरक्षक बंधारे फाेडून सागरी उधाणाचे खारेपाणी घूसले माेठे शहापूर गावच्या भातशेती जमिनीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 17:15 IST

अलिबाग, पेण आणि पनवेल तालुक्यांतील समुद्र उधाण संरक्षक बंधाऱ्यांच्या डागडूजी आणि दूरुस्तीचे काम खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाने गेल्या २० वर्षात केलेच नसल्याने प्रारंभ झालेली समुद्र सरक्षक बंधारे सागरी उधाणाच्या भरतीने फूटण्याची समस्या आणि खारेपाणी जवळच्या भातशेती जमीनीत घूसून

जयंत धुळप

रायगड: अलिबाग, पेण आणि पनवेल तालुक्यांतील समुद्र उधाण संरक्षक बंधाऱ्यांच्या डागडूजी आणि दूरुस्तीचे काम खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाने गेल्या २० वर्षात केलेच नसल्याने प्रारंभ झालेली समुद्र सरक्षक बंधारे सागरी उधाणाच्या भरतीने फूटण्याची समस्या आणि खारेपाणी जवळच्या भातशेती जमीनीत घूसून त्या जमीन नापीक हाेण्याची समस्या आता अत्यंत उग्रस्वरुप धारण करु लागली असून चिंताग्रस्त शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट निमार्ण झाली आहे. गुरुवारी रात्री पाैष कृ.तृतियेच्या दिवशी रात्री सागरी उधाणाच्यावेळी माेठे शहरापूर गावाच्या पूर्व-पश्चिम बाजू कडील समुद्र संरक्षक बंधाऱ्यांस एकूण १० ठिकाणी माेठी भगदाडे (खांडी) पडून उधाणाचे खारेपाणी या ३०० एकर भातशेतीत घूसून पूढे माेठे शहापूर गावांतील २५ तर धाकटे शहापूर गावांतील १७ घरांच्या पाया पर्यत पाेहाेचून या सर्व घरांच्या भाेवती समुद्रासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

१० ठिकाणी संरक्षक बंधाऱ्यास माेठी भगदाडे, २० मत्स्य तलावांतील मासे वाहून जावून ३० लाखाचे नुकसान

शासनाच्या खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाच्या सरखार बंधाऱ्यास चार ठिकाणी, पांडेलेशिल संरक्षक बंधाऱ्यास दाेन ठिकाणी, लेहरीकाेठा बंधाऱ्यस एका ठिकाणी तर भंगारकाेठा संरक्षक बंधाऱ्यास एक ठिकाणी व अन्य दाेन अशा एकून १० ठिकाणी संरक्षक बंधाऱ्यास माेठी भगदाडे पडून हे खारेपाणी गावांतील वस्तीपर्यत घूसले आहे. १०० वर्ष जून्या जि.प.शाळा ईमारतीला देखील खाऱ्यापाण्याचा वेढा पडला असल्याची माहिती श्रमिक मु्क्ता दलाचे समन्वयक तथा शहापूर मधील शेतकरी राजन भगत यांनी लाेकमत शी बाेलताना दिली आहे.

शहापूर-धेरंड गावे ही जिताडा, काेळंबी आणि खाेल या माशांच्या शेती व संवर्धनाकरीता सुप्रसिध्द आहेत. या मत्य संवर्धनाकरिता या गावांमध्ये घरटी एक मत्य तलाव असे तलाव आहेत. दरम्यान गुरुवारी रात्रीच्या या उधाणाचे खारेपाणी धाकटे शहापूर गावांतील एकूण २० मत्स्य तलावांत घूसुन पूढे वाहात गेल्याने तयार मासळी वाहून गेल्याने, मस्यशेतकऱ्यांचे माेठे आर्थिक नुसकान झाले आहे. मत्स शेतीच्या नुकसानीचा एकूण आकडा सूमारे ३० लाखाच्या घरात पाेहाेचला असल्याचे ग्रामस्थांनी सांगीतले.

बारा तास उलटून गेले तरी शासकीय कर्मचारी वा अधिकारी फिरकलेला नाही

बारा तास उलटून गेले तरी काेणत्याही शासकीय विभागाचा काेणताही कर्मचारी वा अधिकारी अद्याप या परिसरात फिरकलेला नाही. माेठे शहापूर गावांत शेतकऱ्यानी संध्याकाळी बैठक बाेलवाली असून त्यात पूढील दिशा निश्चित करण्यात येईल असे भगत यांनी अखेरीस सांगीतले.

टॅग्स :RaigadरायगडFarmerशेतकरी