शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

संरक्षक बंधारे फाेडून सागरी उधाणाचे खारेपाणी घूसले माेठे शहापूर गावच्या भातशेती जमिनीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 17:15 IST

अलिबाग, पेण आणि पनवेल तालुक्यांतील समुद्र उधाण संरक्षक बंधाऱ्यांच्या डागडूजी आणि दूरुस्तीचे काम खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाने गेल्या २० वर्षात केलेच नसल्याने प्रारंभ झालेली समुद्र सरक्षक बंधारे सागरी उधाणाच्या भरतीने फूटण्याची समस्या आणि खारेपाणी जवळच्या भातशेती जमीनीत घूसून

जयंत धुळप

रायगड: अलिबाग, पेण आणि पनवेल तालुक्यांतील समुद्र उधाण संरक्षक बंधाऱ्यांच्या डागडूजी आणि दूरुस्तीचे काम खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाने गेल्या २० वर्षात केलेच नसल्याने प्रारंभ झालेली समुद्र सरक्षक बंधारे सागरी उधाणाच्या भरतीने फूटण्याची समस्या आणि खारेपाणी जवळच्या भातशेती जमीनीत घूसून त्या जमीन नापीक हाेण्याची समस्या आता अत्यंत उग्रस्वरुप धारण करु लागली असून चिंताग्रस्त शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट निमार्ण झाली आहे. गुरुवारी रात्री पाैष कृ.तृतियेच्या दिवशी रात्री सागरी उधाणाच्यावेळी माेठे शहरापूर गावाच्या पूर्व-पश्चिम बाजू कडील समुद्र संरक्षक बंधाऱ्यांस एकूण १० ठिकाणी माेठी भगदाडे (खांडी) पडून उधाणाचे खारेपाणी या ३०० एकर भातशेतीत घूसून पूढे माेठे शहापूर गावांतील २५ तर धाकटे शहापूर गावांतील १७ घरांच्या पाया पर्यत पाेहाेचून या सर्व घरांच्या भाेवती समुद्रासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

१० ठिकाणी संरक्षक बंधाऱ्यास माेठी भगदाडे, २० मत्स्य तलावांतील मासे वाहून जावून ३० लाखाचे नुकसान

शासनाच्या खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाच्या सरखार बंधाऱ्यास चार ठिकाणी, पांडेलेशिल संरक्षक बंधाऱ्यास दाेन ठिकाणी, लेहरीकाेठा बंधाऱ्यस एका ठिकाणी तर भंगारकाेठा संरक्षक बंधाऱ्यास एक ठिकाणी व अन्य दाेन अशा एकून १० ठिकाणी संरक्षक बंधाऱ्यास माेठी भगदाडे पडून हे खारेपाणी गावांतील वस्तीपर्यत घूसले आहे. १०० वर्ष जून्या जि.प.शाळा ईमारतीला देखील खाऱ्यापाण्याचा वेढा पडला असल्याची माहिती श्रमिक मु्क्ता दलाचे समन्वयक तथा शहापूर मधील शेतकरी राजन भगत यांनी लाेकमत शी बाेलताना दिली आहे.

शहापूर-धेरंड गावे ही जिताडा, काेळंबी आणि खाेल या माशांच्या शेती व संवर्धनाकरीता सुप्रसिध्द आहेत. या मत्य संवर्धनाकरिता या गावांमध्ये घरटी एक मत्य तलाव असे तलाव आहेत. दरम्यान गुरुवारी रात्रीच्या या उधाणाचे खारेपाणी धाकटे शहापूर गावांतील एकूण २० मत्स्य तलावांत घूसुन पूढे वाहात गेल्याने तयार मासळी वाहून गेल्याने, मस्यशेतकऱ्यांचे माेठे आर्थिक नुसकान झाले आहे. मत्स शेतीच्या नुकसानीचा एकूण आकडा सूमारे ३० लाखाच्या घरात पाेहाेचला असल्याचे ग्रामस्थांनी सांगीतले.

बारा तास उलटून गेले तरी शासकीय कर्मचारी वा अधिकारी फिरकलेला नाही

बारा तास उलटून गेले तरी काेणत्याही शासकीय विभागाचा काेणताही कर्मचारी वा अधिकारी अद्याप या परिसरात फिरकलेला नाही. माेठे शहापूर गावांत शेतकऱ्यानी संध्याकाळी बैठक बाेलवाली असून त्यात पूढील दिशा निश्चित करण्यात येईल असे भगत यांनी अखेरीस सांगीतले.

टॅग्स :RaigadरायगडFarmerशेतकरी