शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

उरणमधील सेफ्टी झोन रद्द करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राकडे सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 03:58 IST

मागील २७ वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि उरणमधील ४५ हजार कुटुंबीयांंवर टांगती तलवार असलेला सेफ्टी झोन आरक्षण रद्द करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या मार्फत मंजुरीसाठी बुधवार, १४ आॅगस्टला केंद्राकडे पाठविण्यात आला आहे.

- मधुकर ठाकूरउरण : मागील २७ वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि उरणमधील ४५ हजार कुटुंबीयांंवर टांगती तलवार असलेला सेफ्टी झोन आरक्षण रद्द करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या मार्फत मंजुरीसाठी बुधवार, १४ आॅगस्टला केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. सर्वपक्षीय घर व जमीन बचाव समिती आणि सेनेचे आ. मनोहर भोईर यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. याबाबत पत्रकारांना माहिती देण्यासाठी उरण नगरपरिषद कार्यालयात गुरूवारी पत्रकार परिदषेचे आयोजन करण्यात आले होते.उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा, नागाव, केगाव, म्हातवली आदी ग्रामपंचायती आणि उरण शहरातील मोरा, भवरा, बोरीपाखाडी आदी हद्दीतील जागेवर येथील भारतीय नौदलाने सेफ्टी झोनचे आरक्षण टाकले आहे. १६ मे १९९२ मध्ये नौदलाने टाकलेल्या सेफ्टी झोनच्या आरक्षणाच्या कचाट्यात सुमारे ४२८ हेक्टरमधील शेतकरी आणि नागरिकांच्या जमिनी आल्या आहेत. मुळातच हे आरक्षण करताना नौदल आणि शासनाने येथे आधीपासून वास्तव्य करून असलेल्या शेतकरी व नागरिकांना कोणत्याही प्रकारची माहिती दिली नव्हती. त्याशिवाय आरक्षित केलेल्या सेफ्टी झोन जमिनीच्या मोबदल्यात मागील २७ वर्षांत जागामालकांना कोणत्याही प्रकारच्या नोटिसा अथवा एकही रक्कम अदा केलेला नाही, तसेच या जागेचा मागील २७ वर्षांत कोणत्याही कामासाठी वापर करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे सेफ्टी झोनमधील हजारो शेतकरी, नागरिकांनी आपल्या मालकीच्याच जागेवर घरे बांधली आहेत. काहींनी वाढत्या कुटुंबांच्या गरजेपोटी घरे बांधली आहेत. मात्र, सेफ्टी झोनमधील घरे अनधिकृत ठरविण्यात आली आहेत.उरण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष नागराज शेठ यांनी सेफ्टी झोनमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयाने सेफ्टी झोनमधील बांधकामे पाडण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाने दिलेल्या कारवाईच्या आदेशानंतरच सेफ्टी झोनविरोधात खऱ्या अर्थाने जन आंदोलनाला सुरुवात झाली. न्यायालयात शासनानेही सेफ्टी झोनचे आरक्षण बेकायदेशीर आणि नियमबाह्य असल्याचे मान्य केले. शासनाच्या नरमाईच्या धोरणामुळे न्यायालयाकडून सेफ्टी झोनधारकांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे. त्यानंतर सेफ्टी झोनचे आरक्षण रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव २७ वर्षांनंतर राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठविण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार घर व जमीन बचाव समितीच्या मागणीचा प्रस्ताव आमदार मनोहर भोईर यांच्या सहकार्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी करून हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राकडे पाठविण्याच्या सूचना संबंधित आधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर हा प्रस्ताव राज्याच्या युडीडी विभागाने बुधवारी मंजुरीसाठी संरक्षण मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे.शासकीय इमारतीही कारवाईच्या कक्षेततालुक्यातील हनुमान कोळीवाडा, नागाव, केगाव, म्हातवली आदी ग्रामपंचायती आणि उरण शहरातील मोरा, भवरा, बोरीपाखाडी येथील ४५ हजार घरे आणि उरण तहसील, पोलीस ठाणे, न्यायालय, उरण नगरपालिका कार्यालये आदी शासकीय इमारतीही सेफ्टी झोनमधील कारवाईच्या कक्षेत आल्या, त्यामुळे आंदोलनाचीही धार चांगलीच वाढली. न्यायालयीन आणि विविध शासकीय पातळीवर लढा देण्यासाठी सर्वपक्षीय घर व जमीन बचाव समितीही गठित करण्यात आली. बचाव समितीने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याने शासनालाही जाग आली आहे.

टॅग्स :RaigadरायगडMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार