शहरं
Join us  
Trending Stories
1
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
2
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
4
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
5
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
6
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
7
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
8
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
9
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
10
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
11
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
12
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
13
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
14
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
15
Nashik Crime: मैत्रिणीने कॅफेमध्ये बोलावून घेतलं अन् हल्लेखोरांना केला 'मेसेज'; नाशिकमध्ये तरुणाची कॅफेमध्ये कोयत्याने हत्या
16
आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा
17
नाशिक हादरलं! कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे अन् सुरक्षेचे १२ वाजवून १२ तासांत दोन खून
18
Israel attack Yemen: इस्रायलचा येमेनवर मोठा हवाई हल्ला, राजधानी सना हादरली, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर पलटवार
19
Post Office च्या 'या' स्कीममध्ये ₹१०,००० च्या गुंतवणूकीवर मिळेल ₹१,१३,६५८ चं गॅरंटीड रिटर्न, पटापट चेक करा डिटेल्स
20
रोज रात्री बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करायची अन् नवऱ्याच्या चुगल्या सांगायची, पण झाली अशी चूक की...

तीन वेळा भूमिपूजन, तरी नळपाणी योजना बासनात; म्हसळ्यात यंदाही पाणीटंचाईची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 23:28 IST

संघर्ष समिती ऐन हिवाळ्यात आंदोलनाच्या पवित्र्यात; टँकर पुरवठ्यातही घोळ

-उदय कळस म्हसळा : म्हसळा नगरपंचायत हद्दीत गेल्या चार-पाच वर्षांपासून मार्च ते जून या काळात भीषण पाणीटंचाईची समस्या उद्भवते. टंचाईवर मात करण्यासाठी नळ पाणी योजना मंजूर करण्यात आली. या योजनेचे भूमिपूजनही एकदा, दोनदा नव्हे, तर तीन वेळा करण्यात आले. मात्र, त्यानंतर योजना कार्यान्वित करण्यात संबंधित प्रशासनाला अपयश आले आहे.

नळपाणी योजनेच्या पाठपुराव्याकडे दुर्लक्ष करून तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांकडून, अनावश्यक विंधण विहिरी खणून त्यातील दूषित पाण्याचा पुरवठा शहरातील बहुतांशी भागात केला गेला. त्यामुळे शहरात व तालुक्यातील नागरिकांचे आरोग्यही बिघडले आहे.यंदा समाधानकारक पाऊस झाला असला तरी मार्च ते जून या महिन्यांदरम्यान पाणीटंचाई होईल, असे अभ्यासपूर्ण विधान म्हसळा नगरपंचायतचे मुख्याधिकारी मनोज उकिरडे यांनी म्हसळा नगराध्यक्ष निवडीनंतर घेतलेल्या पत्रकार भेटीदरम्यान केले. या वेळी नवनिर्वाचित नगराध्यक्षा जयश्री कापर याही उपस्थित होत्या. गतवर्षी टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी म्हसळा नगरपंचायतीने १६ लाख रुपये खर्च केल्याची माहितीही मुख्याधिकारी यांनी या वेळी दिली.

शहरातील भीषण पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी म्हसळा पाणी संघर्ष समिती स्थापन करून गतवर्षी १० मे रोजी पाणीटंचाईबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे ठोस उपाययोजना करण्याबाबत निवेदन दिले होते. याबाबत ठोस कार्यवाही न केल्यास तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला होता.

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नळपाणी योजना कार्यान्वित करण्याऐवजी शहरात टँकरने पाणीपुरवठा केला गेला. त्यामध्ये मुख्याधिकारी यांचे अर्थपूर्ण राजकारण असल्याचे आरोप होत असून याच्या सखोल चौकशीची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. नगरपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांना शुद्ध, पुरेसे आणि पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करण्याचे शासनाचे निर्देश असल्याने ते पूर्ण करण्याच्या मागणीसाठी पाणी संघर्ष समिती अध्यक्ष सुशील यांच्या नेतृत्त्वाखाली नागरिकांनी १४ मे २०१९ रोजी मोर्चाही काढला होता.

या वेळी आंदोलकांना शांत करण्यासाठी नायब तहसीलदार के. टी. भिंगारे यांनी पुढील वर्षी पाणीटंचाई न होण्यासाठी म्हसळा नगरपंचायत सर्वोतोपरी प्रयत्न करेल, असे आश्वासन दिले होते. मात्र, मुख्याधिकारी उकिरडे यांनी यंदाही पाणीटंचाईची शक्यता वर्तवल्याने ऐन हिवाळ्यातच पाण्यासाठी आंदोलनाचे संकेत पाणी संघर्ष समिती म्हसळाकडून मिळाले आहेत.

म्हसळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी केलेल्या विधानानुसार जर यंदाही पाणीटंचाई होणार असेल, तर पाणी संघर्ष समितीच्या सदस्यांसमवेत चर्चा करून पुढील आंदोलनाचा निर्णय घेण्यात येईल.- सुशील यादव, अध्यक्ष पाणी संघर्ष समिती, म्हसळा

टॅग्स :water shortageपाणीकपातRaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्र