शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

तीन वेळा भूमिपूजन, तरी नळपाणी योजना बासनात; म्हसळ्यात यंदाही पाणीटंचाईची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 23:28 IST

संघर्ष समिती ऐन हिवाळ्यात आंदोलनाच्या पवित्र्यात; टँकर पुरवठ्यातही घोळ

-उदय कळस म्हसळा : म्हसळा नगरपंचायत हद्दीत गेल्या चार-पाच वर्षांपासून मार्च ते जून या काळात भीषण पाणीटंचाईची समस्या उद्भवते. टंचाईवर मात करण्यासाठी नळ पाणी योजना मंजूर करण्यात आली. या योजनेचे भूमिपूजनही एकदा, दोनदा नव्हे, तर तीन वेळा करण्यात आले. मात्र, त्यानंतर योजना कार्यान्वित करण्यात संबंधित प्रशासनाला अपयश आले आहे.

नळपाणी योजनेच्या पाठपुराव्याकडे दुर्लक्ष करून तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांकडून, अनावश्यक विंधण विहिरी खणून त्यातील दूषित पाण्याचा पुरवठा शहरातील बहुतांशी भागात केला गेला. त्यामुळे शहरात व तालुक्यातील नागरिकांचे आरोग्यही बिघडले आहे.यंदा समाधानकारक पाऊस झाला असला तरी मार्च ते जून या महिन्यांदरम्यान पाणीटंचाई होईल, असे अभ्यासपूर्ण विधान म्हसळा नगरपंचायतचे मुख्याधिकारी मनोज उकिरडे यांनी म्हसळा नगराध्यक्ष निवडीनंतर घेतलेल्या पत्रकार भेटीदरम्यान केले. या वेळी नवनिर्वाचित नगराध्यक्षा जयश्री कापर याही उपस्थित होत्या. गतवर्षी टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी म्हसळा नगरपंचायतीने १६ लाख रुपये खर्च केल्याची माहितीही मुख्याधिकारी यांनी या वेळी दिली.

शहरातील भीषण पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी म्हसळा पाणी संघर्ष समिती स्थापन करून गतवर्षी १० मे रोजी पाणीटंचाईबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे ठोस उपाययोजना करण्याबाबत निवेदन दिले होते. याबाबत ठोस कार्यवाही न केल्यास तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला होता.

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नळपाणी योजना कार्यान्वित करण्याऐवजी शहरात टँकरने पाणीपुरवठा केला गेला. त्यामध्ये मुख्याधिकारी यांचे अर्थपूर्ण राजकारण असल्याचे आरोप होत असून याच्या सखोल चौकशीची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. नगरपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांना शुद्ध, पुरेसे आणि पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करण्याचे शासनाचे निर्देश असल्याने ते पूर्ण करण्याच्या मागणीसाठी पाणी संघर्ष समिती अध्यक्ष सुशील यांच्या नेतृत्त्वाखाली नागरिकांनी १४ मे २०१९ रोजी मोर्चाही काढला होता.

या वेळी आंदोलकांना शांत करण्यासाठी नायब तहसीलदार के. टी. भिंगारे यांनी पुढील वर्षी पाणीटंचाई न होण्यासाठी म्हसळा नगरपंचायत सर्वोतोपरी प्रयत्न करेल, असे आश्वासन दिले होते. मात्र, मुख्याधिकारी उकिरडे यांनी यंदाही पाणीटंचाईची शक्यता वर्तवल्याने ऐन हिवाळ्यातच पाण्यासाठी आंदोलनाचे संकेत पाणी संघर्ष समिती म्हसळाकडून मिळाले आहेत.

म्हसळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी केलेल्या विधानानुसार जर यंदाही पाणीटंचाई होणार असेल, तर पाणी संघर्ष समितीच्या सदस्यांसमवेत चर्चा करून पुढील आंदोलनाचा निर्णय घेण्यात येईल.- सुशील यादव, अध्यक्ष पाणी संघर्ष समिती, म्हसळा

टॅग्स :water shortageपाणीकपातRaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्र