शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनदी प्रदूषित होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 01:31 IST

लब्धी गार्डन प्रकल्पाबाबत तक्रार : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास पत्र

कांता हाबळे

नेरळ : कर्जत येथून वाहत नेरळकडे येत असताना दहिवली गावाजवळ उल्हासनदीच्या तीरावर असलेले लब्धी गार्डन प्रदूषित पाणी सोडत असल्याची तक्रार उल्हासनदी बचाव मोहिमेचे कार्यकर्ते केशव बबन तरे यांनी लेखी पत्र देऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी, नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग रायगड, तहसीलदार यांच्याकडे केली आहे. दरम्यान, त्या ठिकाणी जमीन विकसित करीत असलेल्या विकासकाने आपल्या सोसायटीमधील एक लीटर पाणीदेखील उल्हासनदीमध्ये जाणार नाही याची काळजी घेण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उल्हासनदी प्रदूषणाचा विषय सध्यातरी सुटला आहे.

लब्धी गार्डन्स हा रहिवासी प्रकल्प नेरळपासून चार कि.मी. अंतरावर उल्हासनदीच्या किनारी दहिवली गावाजवळ साधारणत: दहा एकरमध्ये बांधण्यात आला असून, सद्यस्थितीत पाच फेजमध्ये ५०० कुटुंब या ठिकाणी स्थायिक होणार आहेत. ५०० कुटुंबीय म्हणजे अंदाजे २५००-३००० लोकसंख्या नव्याने राहायला येऊ शकते. हा प्रकल्प बारमाही वाहती असलेल्या उल्हासनदीच्या पात्रापासून हाकेच्या अंतरावर असून या रहिवासी संकुलातील सांडपाण्याचा प्रश्न येथील स्थानिक रहिवासी म्हणून ही गंभीर बाब आम्हाला वाटत आहे. कारण, हे सांडपाणी उल्हासनदीत सोडण्याचा प्रयत्न लब्धी गार्डन या विकासकाकडून सुरू आहे. दहिवली गावापासून ते नदीपर्यंतच्या सर्व जागेवर लब्धी गार्डन या विकासकाद्वारे व्यावसायिक दृष्टिकोनातून गृहप्रकल्प उभा केला जात आहे, असे के शव तरे यांनी सांगितले.पूर्वी या संकुलालगत एक नैसर्गिक ओढा होता जो शेती आणि गावातील गोळा होणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा नदीपात्रात वाहून नेत होता; परंतु आता या ओढ्याच्या अर्ध्या भागात संरक्षण भिंत बांधली असून तो अरुंद करण्यात आला आहे, तसेच संकुलातील सांडपाण्याला वाट करून देण्यासाठी दोन मोठ्या भूमिगत पाइपलाइन टाकल्या असून, संकुलातील सांडपाणी या ओढ्यात सोडले जाणार असून पुढे ते पाणी ओढ्या मार्गाने नदीत मिसळणार आहे. पावसाच्या पाण्याच्या आडून हे सांडपाणी ग्रामीण भागातील जनतेच्या पाण्यात विरजणच असणार आहे. ही बाब अतिशय गंभीर असून कोणत्याही नियमांचे पालन न करता हा प्रकार सुरू असून, हा प्रकार निदर्शनास आणण्याचा प्रयत्न तक्रारकर्ते केशव तरे यांनी केला आहे. आजघडीला या नदीमुळे जवळपास ४८ गावांना पिण्याच्या पाण्याचे एकमेव साधन असताना जर हे सांडपाणी नदीमध्ये सोडले तर बारमाही वाहती नदी दूषित होऊ शकते. असे असताना आज कर्जत-नेरळ परिसरात नदीकिनारी सुरू असलेले रहिवासी संकुल नदीचे आकर्षण दाखवून ग्राहकांना आकर्षित करत असून कालांतराने या नैसर्गिक स्रोताचीही विदारक अवस्था होण्यास विलंब लागणार नाही.लब्धी गार्डन या विकासकाने संकुलातील सांडपाणी पाइपलाइनद्वारे ओढ्यात सोडून ते पुढे नदीला मिळणार अशी व्यवस्था करत, कायदा हातात घेऊन नैसर्गिक स्रोत दूषित करण्याचा डाव असून तो वेळीच थांबला पाहिजे, अशी मागणी केली आहे. कायद्यानुसार नदीपात्रालगत जे रहिवासी अथवा बांधकाम होत आहे त्यांच्या सांडपाण्याची व्यवस्था ही अंतर्गत असावी, हा नियम आहे.आम्ही आमच्या प्रकल्पात सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प तयार केला आहे. आमच्या सोसायटीमधील एक लीटर पाणीदेखील आम्ही बाहेर सोडत नसून पाच लाख लीटर क्षमता असलेला हा प्रकल्प आहे. दुसरीकडे आमच्या येथे केवळ १०० कुटुंब राहत आहेत. त्याच वेळी सर्व ५०० कुटुंब राहायला आली तरी एक थेंब पाणी बाहेर सोडले जाणार नाही. दुसरीकडे ज्या उल्हासनदीमध्ये पाणी सोडले असा गैरसमज केला जात असून, आम्हीदेखील त्याच उल्हासनदीचे पाणी पितो मग तेथेच कसे काय सांडपाणी सोडणार? सध्या आम्ही प्रक्रिया केलेले पाणी बगिचा आणि बांधकामासाठी वापरत आहोत.- विकास जैन,संचालक, लब्धी गार्डनआमचे एकमेव पाण्याचे साधन असलेली नैसर्गिक संपदा म्हणून उल्हासनदी असताना ती दूषित करण्याचा जो डाव आहे तो विकासकाने वेळीच थांबवावा, तसेच प्रत्येक नागरिकाने, तरुणांनी आपल्या आजूबाजूला जागरूकतेने लक्ष ठेवून असे प्रकार निदर्शनास आणले पाहिजेत. आम्ही या संदर्भात पत्र पाठवून संबंधित विभागास तक्रार केली आहे, अपेक्षा आहे की यावर वेळीच योग्य ती कारवाई करून हा प्रकार थांबविला पाहिजे.- केशव तरे, माजी अध्यक्ष, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती 

टॅग्स :Raigadरायगडraigad-pcरायगडriverनदी