शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

कोरेगाव भीमाबाबत पंतप्रधान काहीच बोलले नाहीत - अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 01:43 IST

भारतात कोरेगाव भीमा येथे एवढी मोठी घटना घडली. भारत देशाने नोंद घेतली. संपूर्ण मीडियाने दखल घेतली, पण पंतप्रधानांनी कोरेगाव भीमाबाबत एकही स्टेटमेंट दिले नाही, असे उद्गार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विधिमंडळातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी काढले.

माणगाव : भारतात कोरेगाव भीमा येथे एवढी मोठी घटना घडली. भारत देशाने नोंद घेतली. संपूर्ण मीडियाने दखल घेतली, पण पंतप्रधानांनी कोरेगाव भीमाबाबत एकही स्टेटमेंट दिले नाही, असे उद्गार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विधिमंडळातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी काढले.माणगाव येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी झाले. या वेळी आयोजित जाहीर सभेत ते बोेलत होते. सर्व जनतेला कोरेगाव-भीमा येथे नक्की काय झाले याबाबत माहिती जाणून घ्यावयाची असताना पंतप्रधान काहीच बोलत नाहीत. फक्त चाय पे बात बोलत आहेत. आदिवासी बांधव, मागासवर्गीय जनतेचे हाल झाले आहेत. भाजपा-शिवसेना युती ही फेकू व खोटारडे सरकार आहे. या सरकारच्या काळात जनतेचा प्रचंड भ्रमनिरास झाला. नोटाबंदी झाल्यामुळे विकासदर घटला आहे, अशी जोरदार टीका अजित पवार यांनी केली. दिलेला शब्द पाळायचा असतो हे आम्हाला राजकीय जीवनात शरद पवारांनी शिकवले. शिवसेना-भाजपा सरकारने कोकणावर अन्याय केला आहे. शेतक ºयांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. विजेच्या संदर्भातील प्रश्न बिकट झाले आहेत. उद्धव ठाकरे भाजपावर टीका करतात, पण सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत करत नाहीत. मेक इन इंडियाच्या नावाखाली अनेक प्रकल्प पंतप्रधानांनी गुजरातला पळविले आहेत. या काळात समाजाचा कोणताही घटक समाधानी नाही. शेतकरी समाधानी नाहीत. त्यांच्या मालाला योग्य किंमत मिळत नाही. ऊस उत्पादक, कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. हे सरकार सत्तेवर आल्यावर त्यांनी १०० दिवसांत महागाई कमी होणार असे सांगितले होते. सत्ता येऊन १००० दिवस झाले अजून महागाई कमी झालेली नाही. गॅस सिलिंडरचे भाव वाढल्याने महिला वर्ग नाराज आहे. आमच्या काळातील कित्येक योजना आहेत त्या योजनांची फक्त नावे या सरकारने बदलली आहेत. शेतकºयांचे पेकाट या सरकारने मोडले आहे. या मुख्यमंत्र्यांना शाश्वत शेती काय समजणार? कोरेगाव भीमा घटना का घडली, सरकारचा कुठेच धाक राहिला नाही. समाजाला उच्च न्यायालयाने सांगितले असतानाही अजून शिक्षणात आरक्षण दिलेले नाही, असे सांगत येणाºया काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे ताकद उभी करा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.माणगाव नगर पंचायत हद्दीतील नाना-नानी पार्क, दत्तनगर रस्ता, उतेखोलवाडी रस्ता, कचेरी रोड रस्ता, नाट्यगृह अशा सहा कोटी रु पयांच्या विकासकामांचा शुभारंभ सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार यांच्या हस्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या वेळी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, युवा नेते अनिकेत तटकरे, आ. अनिल तटकरे, माणगाव नगराध्यक्ष आनंदशेठ यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर, गोरेगाव सरपंच झुबेर अब्बासी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रभाकर उभारे आदींसह माणगाव नगर पंचायतीचे सर्व नगरसेवक व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.माणगावमध्ये वातानुकूलित नाट्यगृह होणारमाणगाव नगर पंचायत निवडणुकीदरम्यान आ. तटकरे यांनी माणगावकरांना अभिवचने दिली होती त्याची पूर्तता होताना आनंद वाटतो आहे. केंद्रात व राज्यात भाजपा व शिवसेना सत्तेवर आहे. या सरकारने जनतेला दिलेली आश्वासने पाळलेली दिसत नाहीत. गुजरातने त्यांना नाकारले. समविचारी पक्षांनी एकत्रित निवडणुका लढवल्या असत्या तर गुजरातचे चित्र आज वेगळे असते. राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच जनतेचा विचार केला आहे. शहराचा विकास म्हणजे केवळ रस्ता, वीज, पाणी हे नाही.शहराचा सांस्कृतिक, साहित्यिक दर्जा उंचावला पाहिजे, त्यातून चांगले कवी, संपादक, लेखक यांचे विचार सर्वांना ऐकायला मिळावेत हा उद्देश नजरेसमोर ठेवून आ. तटकरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे माणगावात साडेतीन कोटींचे नाट्यगृह होईल. ते प्रशस्त, वातानुकूलित असेल. त्यामध्ये चांगला हॉल, त्यामध्ये ५०० आसन खुर्च्या, पार्किंगची व्यवस्था असे हे नाट्यगृह होणार आहे, असे अजित पवार म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार