शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

ताडवाडी-मोरेवाडीसाठी नळपाणी योजना अद्याप कागदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 00:59 IST

रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश हवेत विरले : उद्भव कुठे असावा, यासाठी रखडले काम

कांता हाबळे

नेरळ : कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायतीमधील ताडवाडी आणि मोरेवाडीमध्ये नेहमीप्रमाणे पाणीटंचाई सुरू झाली आहे. त्या दोन्ही वाड्यांसाठी पावसाळ्यापूर्वी नळपाणी योजना कार्यान्वित करावी, असे आदेश रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी आॅक्टोबर २०१७ मध्ये दिले होते. त्यानंतर या ठिकाणी गतवर्षी जिल्हा परिषदेने नळपाणी योजना मंजूर केली होती. मात्र, ही नळपाणी योजना आजही कागदावरच आहे. डिसेंबर २०१७ मध्ये या नळपाणी योजनेची घोषणा रायगड जिल्हा परिषदेच्या लघु-पाटबंधारे विभागाने केली होती. दरम्यान, नळपाणी योजनेचा उद्भव कुठे असावा, यासाठी या दोन्ही टंचाईग्रस्त गावांची नळपाणी योजना रखडली असून येथील आदिवासी महिलांना पाण्यासाठी डोक्यावर हांडे घेऊन जावे लागत आहे.

पाथरज ग्रामपंचायतमधील सात पाड्यांची बनलेली ताडवाडी ही कर्जत तालुक्यातील मोठी आदिवासीवाडी समजली जाते. तर त्या शेजारी असलेली मोरेवाडी हीदेखील ताडवाडीच्या विहिरीवर अवलंबून असलेली आदिवासीवाडी आहे. त्या दोन्ही आदिवासीवाड्यांमधील महिलांना जानेवारी महिन्यापासूनरात्र विहिरीवर काढावी लागते. गतवर्षी त्याबाबत माध्यमांनी दखल घेतल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जिल्हा परिषदेला सूचित केल्यानंतर जिल्हा परिषद लघु-पाटबंधारे विभागाने २७ लाख रुपयांची तरतूद दुरुस्तीसाठी केली होती. मात्र, स्थानिक आदिवासी लोकांनी आम्हाला दुरुस्ती नको तर नवीन पाणी योजना पाहिजे आणि त्या योजनेचा उद्भव हा बांगरवाडी मातीच्या बंधाºयाचा असावा, अशी मागणी केली होती.

त्यानंतर रायगड जिल्हा परिषदेच्या लघु-पाटबंधारे विभागाने त्या ठिकाणी नळपाणी योजनेसाठी मंजूर करण्यात आलेल्या २७ लाखांचा निधी थांबवून ठेवला. जानेवारी २०१८ मध्ये अंदाजपत्रक तयार करताना नवीन नळपाणी योजना ही बनगरवाडी येथे असलेल्या मातीच्या बंधाºयातील उद्भव निश्चित करण्यात आला. त्यासाठी नव्याने तयार झालेले अंदाजपत्रक हे एप्रिल २०१८ मंजूर झाले नाही. त्या वेळी नव्याने केलेले अंदाजपत्रक हे ६७ लाखांचे बनले होते. मात्र, बांगरवाडी येथील मातीचा बंधारा हा जुना असून तेथील पाण्याचा काही भरवसा नसल्याने आमसभेत त्यावर पुन्हा चर्चा झाली. मोरेवाडी तसेच ताडवाडीसाठी नळपाणी योजना करताना ती डोंगरपाडा येथील पाझर तलावाच्या पाण्यावर करण्याची सूचना आमदार सुरेश लाड यांनी केली. त्यामुळे आता ९३ लाख रुपयांचे नवीन अंदाजपत्रक तयार झाले असून ताडवाडी आणि मोरेवाडीसाठी डोंगरपाडा पाझर तलावाच्या पाण्यावर नळपाणी योजना करण्याचे निश्चित झाले आहे.पाण्यासाठी भटकं तीताडवाडी आणि मोरेवाडी या दोन्ही वाडीतील लोकांसाठी तेथे असलेल्या दोन्ही विहिरी कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत. त्या वेळी शेजारी असलेल्या मोरेवाडी येथील महिलांची बांगरवाडी मातीच्या धरणावर पाण्यासाठी जाण्याची भटकंती सुरू झाली आहे. त्यामुळे गतवर्षी मंजूर झालेली नळपाणी योजना आता प्रत्यक्षात आली असती तर दोन्ही आदिवासीवाड्यांतील लोकांना पाण्यासाठी विहिरीवर रात्र काढण्याची वेळ आली नसती. त्यात पाथरज ग्रामपंचायत गेल्या तीन महिन्यांपासून त्या ठिकाणी असलेल्या विहिरीमध्ये टँकरचे पाणी टाकत असल्याने सध्या तरी ताडवाडी आणि मोरेवाडीला पाणी मिळत आहे.बांगरवाडी येथील मातीचा बंधारा शासनाचा नाही, त्यात त्या बंधाºयांची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे पहिल्यापासून मागणी असलेल्या डोंगरपाडा पाझर तलावाच्या पाण्यावर नळपाणी योजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा निवडणूक आल्याने योजनेला अंतिम मंजुरी मिळाली नव्हती, आता त्यांना गती मिळाली असून, योजना महिनाभरात सुरू होईल.- रेखा दिसले, सदस्य, रायगड जिल्हा परिषदताडवाडी आणि मोरेवाडी येथील नळपाणी योजनेची दुरुस्ती करण्यासाठी निधी मंजूर आहे. मात्र, स्थानिक लोकांनी उद्भव बदलण्याची सूचना केल्याने सर्व अंदाजपत्रक नव्याने करायची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे अद्याप कामाला सुरुवात झाली नाही.- डी. आर. कांबळे,उपअभियंता, लघु-पाटबंधारे विभाग

टॅग्स :Raigadरायगड