शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

पळसदरी धरणाला तडे, नागरिक भयभीत, धरण फुटल्यास जीवितहानी होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 07:01 IST

कर्जत तालुक्यातील पळसदरी येथे रेल्वेने बांधलेल्या १०५ वर्षे जुन्या असलेल्या रेल्वेच्या धरणाला तडे गेले आहेत. यामुळे हे धरण फुटून मोठी दुर्घटना होण्याची भीती असल्याने येथील नागरिक चिंतेत आहेत.

- अजय कदममाथेरान : कर्जत तालुक्यातील पळसदरी येथे रेल्वेने बांधलेल्या १०५ वर्षे जुन्या असलेल्या रेल्वेच्या धरणाला तडे गेले आहेत. यामुळे हे धरण फुटून मोठी दुर्घटना होण्याची भीती असल्याने येथील नागरिक चिंतेत आहेत.१९१२मध्ये या धरणाची निर्मिती रेल्वे प्रशासनामार्फत कर्जत तालुक्यातील पळसदरी या गावी केली गेली होती. त्या काळी वाफेच्या इंजिनाला पाणी पुरविण्यासाठी या धरणाचा उपयोग होत होता. १९९० मध्ये वाफेचे इंजिन बंद केल्याने रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने या धरणाचे पाणी कर्जत शहराला पुरविण्यास सुरुवात केली; परंतु काही वर्षांतच कर्जत नगरपरिषदेने आपला स्वतंत्र पाणीपुरवठा केल्यामुळे या धरणाकडे रेल्वे प्रशासनाने पूर्ण दुर्लक्ष केले. त्यामुळे धरणाच्या भिंतीला झाडेझुडपे वाढल्याने धरणाला तडे जाऊन ते फुटण्याची भीती येथील स्थानिकांनी व्यक्त केली आहे.मुंबई-पुण्यापासून पळसदरी हे गाव जवळ असल्याने, तसेच येथे स्वामी समर्थांचा मठ असल्याने येथे पर्यटकांची सतत मांदियाळी असते. पावसाळ्यात येथील हिरवीगार वनराई व धबधब्यांमुळे हे धरण परिसर नेहमी पर्यटकांमुळे बहरलेले असतात. धरण बांधल्यापासून यातील गाळ न काढल्यामुळे पोहण्यासाठी उतरलेले पर्यटक गाळात अडकल्याने त्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी धरणाच्या बाजूला देखभालीसाठी रेल्वे प्रशासनाने गार्ड नियुक्त केले होते. त्यामुळे येथे कोणीही पोहण्यासाठी येत नव्हते. त्या गार्डना राहण्यासाठी धरणाच्या बाजूला खोल्या व गार्डन होते; परंतु सध्या येथे आता कोणीही राहत नसून गार्ड रूम व गार्डनची पूर्ण वाताहत होऊन तळीराम व गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला आहे.पळसदरी येथील ग्रामस्थ अ‍ॅड. राजेंद्र निगुडकर, अमित घाटगे, अ‍ॅड. सचिन दरेकर, नारायण दरेकर, शैलेश निगुडकर यांनी चिंता व्यक्त करून, या धरणाची डागडुजी रेल्वे प्रशासनाने त्वरित करावी, अशी मागणी केली आहे.ब्रिटिशकालीन हे पळसदरी धरण १९१२मध्ये रेल्वे प्रशासनाने बांधले. १०५ वर्षे उलटूनही अजूनही हे धरण साफ केले गेले नाही. यातील गाळ न काढल्यामुळे पर्यटकांच्या मृत्यूमध्ये वाढ होत आहे. तसेच बांधावर झाडेझुडपे वाढल्यामुळे बांधाला तडा गेला आहे. भविष्यात जर बांध फुटला, तर कर्जत-खोपोली, कर्जत-पुणे रेल्वेमार्ग तसेच आवळस, आकुरले, शिरसे, मुद्रे आणि कर्जत या गावांना धोका पोहोचू शकतो. याची सर्वस्वी जबाबदारी ही रेल्वे प्रशासनाची राहील.- अ‍ॅड. राजेंद्र निगुडकर, स्थानिक

टॅग्स :DamधरणWaterपाणी