शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

पळसदरी धरणाला तडे, नागरिक भयभीत, धरण फुटल्यास जीवितहानी होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 07:01 IST

कर्जत तालुक्यातील पळसदरी येथे रेल्वेने बांधलेल्या १०५ वर्षे जुन्या असलेल्या रेल्वेच्या धरणाला तडे गेले आहेत. यामुळे हे धरण फुटून मोठी दुर्घटना होण्याची भीती असल्याने येथील नागरिक चिंतेत आहेत.

- अजय कदममाथेरान : कर्जत तालुक्यातील पळसदरी येथे रेल्वेने बांधलेल्या १०५ वर्षे जुन्या असलेल्या रेल्वेच्या धरणाला तडे गेले आहेत. यामुळे हे धरण फुटून मोठी दुर्घटना होण्याची भीती असल्याने येथील नागरिक चिंतेत आहेत.१९१२मध्ये या धरणाची निर्मिती रेल्वे प्रशासनामार्फत कर्जत तालुक्यातील पळसदरी या गावी केली गेली होती. त्या काळी वाफेच्या इंजिनाला पाणी पुरविण्यासाठी या धरणाचा उपयोग होत होता. १९९० मध्ये वाफेचे इंजिन बंद केल्याने रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने या धरणाचे पाणी कर्जत शहराला पुरविण्यास सुरुवात केली; परंतु काही वर्षांतच कर्जत नगरपरिषदेने आपला स्वतंत्र पाणीपुरवठा केल्यामुळे या धरणाकडे रेल्वे प्रशासनाने पूर्ण दुर्लक्ष केले. त्यामुळे धरणाच्या भिंतीला झाडेझुडपे वाढल्याने धरणाला तडे जाऊन ते फुटण्याची भीती येथील स्थानिकांनी व्यक्त केली आहे.मुंबई-पुण्यापासून पळसदरी हे गाव जवळ असल्याने, तसेच येथे स्वामी समर्थांचा मठ असल्याने येथे पर्यटकांची सतत मांदियाळी असते. पावसाळ्यात येथील हिरवीगार वनराई व धबधब्यांमुळे हे धरण परिसर नेहमी पर्यटकांमुळे बहरलेले असतात. धरण बांधल्यापासून यातील गाळ न काढल्यामुळे पोहण्यासाठी उतरलेले पर्यटक गाळात अडकल्याने त्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी धरणाच्या बाजूला देखभालीसाठी रेल्वे प्रशासनाने गार्ड नियुक्त केले होते. त्यामुळे येथे कोणीही पोहण्यासाठी येत नव्हते. त्या गार्डना राहण्यासाठी धरणाच्या बाजूला खोल्या व गार्डन होते; परंतु सध्या येथे आता कोणीही राहत नसून गार्ड रूम व गार्डनची पूर्ण वाताहत होऊन तळीराम व गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला आहे.पळसदरी येथील ग्रामस्थ अ‍ॅड. राजेंद्र निगुडकर, अमित घाटगे, अ‍ॅड. सचिन दरेकर, नारायण दरेकर, शैलेश निगुडकर यांनी चिंता व्यक्त करून, या धरणाची डागडुजी रेल्वे प्रशासनाने त्वरित करावी, अशी मागणी केली आहे.ब्रिटिशकालीन हे पळसदरी धरण १९१२मध्ये रेल्वे प्रशासनाने बांधले. १०५ वर्षे उलटूनही अजूनही हे धरण साफ केले गेले नाही. यातील गाळ न काढल्यामुळे पर्यटकांच्या मृत्यूमध्ये वाढ होत आहे. तसेच बांधावर झाडेझुडपे वाढल्यामुळे बांधाला तडा गेला आहे. भविष्यात जर बांध फुटला, तर कर्जत-खोपोली, कर्जत-पुणे रेल्वेमार्ग तसेच आवळस, आकुरले, शिरसे, मुद्रे आणि कर्जत या गावांना धोका पोहोचू शकतो. याची सर्वस्वी जबाबदारी ही रेल्वे प्रशासनाची राहील.- अ‍ॅड. राजेंद्र निगुडकर, स्थानिक

टॅग्स :DamधरणWaterपाणी