शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजातीय विवाहाचा टक्का वाढला, मात्र अनुदान रखडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 05:21 IST

१ कोटी २० लाखांचा निधी अपेक्षित : समाज कल्याण विभागाकडे २०० प्रस्ताव

आविष्कार देसाई

अलिबाग : समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करून राजकारण करणारे अनेक जण आपल्याला पाहायला मिळतात. धार्मिक द्वेष पसरवून माणसांना माणसांपासून तोडण्याचे काम सुरू असतानाच भावी पिढी मात्र चालीरीती आणि खुळचट परंपरांना छेद देत आंतरजातीय विवाहाला प्राधान्य देताना दिसत आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत आंतरजातीय विवाहाचे प्रमाण तब्बल ६४ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येते. परंतु २०१८ हे वर्ष संपत आले तरी, आंतरजातीय विवाह करणाऱ्यांसाठी देण्यात येणारे एकूण १ कोटी २० लाख रुपयांचे अनुदान अद्याप न आल्याने सुमारे २०० प्रस्ताव समाज कल्याण विभागाकडे रखडले आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असणाºया समाज कल्याण विभागामार्फत विविध योजना आखण्यात आल्या आहेत. समाजातील उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या योजनांचा उपयोग केला जातो. त्यातीलच आंतरजातीय विवाह आर्थिक साह्य योजना आहे. उच्च समाजातील अथवा घटकातील व्यक्तीने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यासह अन्य जातीमध्ये विवाह केल्यास नववधूंना ५० हजार रुपयांचे अर्थसाह्य करण्यात येते. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचा ५०-५० टक्के हिस्सा असतो. दरवर्षी सुमारे १ कोटी २० लाख रुपयांचे अनुदान समाज कल्याण विभागामार्फत लाभार्थ्यांना देण्यात येते.२०१७ या वर्षी आंतरजातीय विवाह करून योजनेचा लाभ घेण्यासाठी सुमारे १२२ लाभार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे. अर्थसाह्य योजनेमुळे नवदाम्पत्याला संसाराची सुरुवात करताना येणाºया अडचणींवर मात करता येते. योजनेचा लाभ अलीकडेच मोठ्या प्रमाणात घेताना दिसून येत आहे.समाज कल्याण विभागात लाभार्थींच्या चकरा२०१८ या वर्षामध्ये तब्बल २०० प्रस्ताव समाज कल्याण विभागाकडे आले आहेत. परंतु डिसेंबर महिना संपत आला तरी अद्यापही अनुदानाची रक्कम जमा न झाल्याने २०० प्रस्ताव रखडल्याचे दिसून येते. अर्थसाह्य लवकरात लवकर मिळविण्यासाठी लाभार्थी सातत्याने समाज कल्याण विभागाच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र अनुदानाची रक्कमच जमा न झाल्याने त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे.अनुदान मिळणार आहे म्हणून आंतरजातीय विवाह केला नाही, परंतु सरकार मदत करत असेल आणि त्याचा हातभार संसाराला लागत असेल तर ते चांगलेच आहे. त्यामुळे सरकारने लाभार्थ्यांना तातडीने अनुदानाची रक्कम देणे गरजेचे असल्याचे आंतरजातीय विवाह केलेल्या एका दाम्पत्याने ‘लोकमत’ला सांगितले.यंदा एक कोटी २० लाख रुपयांच्या अनुदानाची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्याचा प्रत्येकी ५० टक्क्यांचा हिस्सा अद्यापही आलेला नाही. सरकारकडून तो लवकरच प्राप्त होईल. आजची पिढी जातीय जोखडात अडकून पडायला तयार नाही आणि त्यामुळेच आंतरजातीय विवाह करण्याच्या आकडेवारीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ६४ टक्क्यांनी वाढ होत असल्याचे प्रस्तावांच्या संख्येवरून स्पष्ट होते.- गजानन लेंडी, अधिकारी, समाज कल्याण विभाग

टॅग्स :marriageलग्न